शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

वाहनचालकांविरुद्ध कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:36 IST

दारूविक्री करणाऱ्या विरुद्ध कारवाई हिंगोली : जिल्ह्यात अवैध दारूविक्री करणाऱ्या विरुद्ध सर्व पाेलीस ठाण्यांतर्गत विशेष मोहीम राबविली जात आहे. ...

दारूविक्री करणाऱ्या विरुद्ध कारवाई

हिंगोली : जिल्ह्यात अवैध दारूविक्री करणाऱ्या विरुद्ध सर्व पाेलीस ठाण्यांतर्गत विशेष मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत दारूविक्री करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.

४ जानेवारी रोजी दारूबंदी कायद्यांतर्गत वसमत ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत एका ठिकाणी छापा मारण्यात आला. आरोपीकडून ९.७२ लीटर दारू अशी एकूण ७ हजार ८६० रुपयांचा अवैध दारूचा साठा जप्त करण्यात आला. आराेपीविरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

पिकांना थंडी पोषक

हिंगोली : जिल्ह्यात दाेन ते तीन दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. ही थंडी रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकांना पोषक असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सध्या रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा या पिकांची उगवण चांगली असून शेतकरी आनंदीत असल्याचे दिसून येत आहे.

खंडित वीज पुरवठ्यास शेतकरी वैतागले

पुसेगाव : सेनगाव तालुक्यातील पुसेगावसह परिसरात विजेचा लपंडाव वाढला आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने रब्बी हंगाम चांगला आहे. पिकांची उगवण चांगली आहे. विहिरींना पाणीही भरपूर प्रमाणात आहे; परंतु मागील १५-२० दिवसांपासून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बागायती पिकांसह कोरडवाहू पिकांनाही पाणी देणे शक्य होत आहे. महावितरणने वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

ग्रा.पं. निवडणुकीची रणधुमाळी सुरू

हिंगोली : जिल्ह्यात ४९५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका घोषित करण्यात आल्या आहेत. यात काही बिनविरोधही झाले आहे. सध्या काही गावांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी पाहावयास मिळत आहे. माजी आमदार, विद्यमान जि.प. सदस्य यांच्या गावातील निवडणुका लक्षवेधी ठरणार आहेत.

बसस्थानकातील गिट्टी उखडली

हिंगोली : शहरातील नव्या बसस्थानकाचे बांधकाम रखडले आहे. प्रवाशांना तात्पुरत्या स्वरूपात बसस्थानक उभारण्यात आले आहे. प्रवाशांना धुळीतच बसून बसची वाट पहावी लागत आहे. संबंधित विभागाने या बाबीचे दखल घेऊन प्रवाशांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

गुंडा पाटी ते करंजी रस्त्याची दुरवस्था

करंजी : वसमत तालुक्यातील गुंडा पाटी ते करंजी या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. हा पाच किलोमीटर रस्ता गेल्या अनेक महिन्यांपासून उखडला असून, जागोजागी या रस्त्यावर खड्डे पडले आहे. साधी सायकलसुद्धा या रस्त्यावरून चालवता येत नाही. वरिष्ठांनी याची दखल घेेऊन हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा, अशी मागणी या भागातील ग्रामस्थांनी केली आहे.

पीक विमा वितरित करण्याची मागणी

हिंगोली : जिल्ह्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने साेयाबीन, कापूस, तूर, उडीद या पिकांचे आतोनात नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांकडे ॲड्राइड माेबाइल नसल्याने विमा कंपनीकडे ते तक्रार करू शकत नाही. यामुळे विमा कंपनीकडून या शेतकऱ्यांवर अन्यायच होत आहे. तेव्हा सर्व शेतकऱ्यांना सरसकट विमा देण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.