शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
2
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
3
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
4
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
5
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
6
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
7
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
8
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
9
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
10
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
11
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
12
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
13
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
14
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
15
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
16
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
17
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
18
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
19
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
20
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद

जिल्ह्यात पाचवी ते दहावीच्या ९० शाळा अद्याप बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:30 IST

कोरोनामुळे राज्यभरातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. आता टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यात येत आहेत. सुरुवातीला नववी ते बारावीपर्यंतचे ...

कोरोनामुळे राज्यभरातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. आता टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यात येत आहेत. सुरुवातीला नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले. त्यानंतर २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. शाळा सुरू करताना कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे. त्यामुळे शाळा निर्जंतुकीकरण करणे, कोरोना टेस्ट यासह विद्यार्थ्यांना मास्क व शारीरिक अंतर पाळणे यासंदर्भात मार्गदर्शन करणे आदी कामे शाळा प्रशासनाला करावी लागत आहेत. त्यामुळे अद्याप पूर्ण क्षमतेने शाळा सुरू झाल्या नसल्याचे पाहावयास मिळत आहेत. काही शाळांनी अद्याप प्रस्ताव सादर केले नाहीत, तर काही शाळांचे प्रस्ताव नाकरण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील उर्वरित शाळा कधी सुरू होणार याकडे पालकांसह, विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

शाळा बंद असल्याची कारणे

कोरोनानंतर शाळा सुरू करण्यासाठी प्रशासनाने काही नियम व अटी घालून दिल्या आहेत. त्यानुसार शाळांना शिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर करावे लागतात. या प्रस्तावांची पाहणी करून शिक्षण विभाग शाळा सुरू करण्यासंदर्भात शाळा प्रशासनाला सूचना करतात. मात्र, जिल्ह्यातील काही शाळांनी अद्याप प्रस्ताव सादर केले नाहीत, तर काही शाळांच्या प्रस्तावात त्रुटी असल्याने शिक्षण विभागाने हे प्रस्ताव फेटाळले आहेत.

एकही शिक्षक, कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह नाही

शाळा सुरू करण्याअगोदर शिक्षक व कर्मचाऱ्यांना कोरोना टेस्ट करण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार शाळा सुरू झालेल्या शिक्षकांनी कोरोना टेस्ट करून घेतल्या आहेत. मात्र, यामध्ये एकही शिक्षक व कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला नाही.

जिल्ह्यातील शाळांची सद्य:स्थिती

पाचवी ते दहावीपर्यंतच्या शाळा

३०४

--------

सुरू झालेल्या शाळा

२४१

----------

विद्यार्थी संख्या

एकूण संख्या

१२२५७५

-------

उपस्थित विद्यार्थी

९३९७०

प्रतिक्रिया

शाळा सुरू करण्यासंदर्भात शाळा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. त्यानुसार शालेय व्यवस्थापन समितीचा प्रस्ताव व शिक्षकांच्या आरटीपीसीआर टेस्टचा अहवाल आल्यानंतर प्रस्तावांची छाननी केली जात आहे, तसेच परिपूर्ण प्रस्ताव मान्यतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येत आहेत. त्यांच्या मान्यतेनंतरच शाळा सुरू करण्यात येत आहेत.

-पी.बी. पावसे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

-----------