शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या तक्रारीनंतर अमित शाहांकडून रवींद्र चव्हाणांची पाठराखण; "पक्षबांधणी सुरूच ठेवा..."
2
२० दिवसापूर्वीच थार घेतलेली, कोकणात फिरण्यासाठी निघाले होते, चौघांचा मृतदेह सापडला, दोनजण बेपत्ता; ओळख पटली, नाव आली समोर
3
इंग्रज ढासळले...! ब्रिटिश इंडियन्स, उद्योजक ब्रिटन सोडू लागले! अब्जाधीश हरमन नरुला दुबईला स्थायिक होणार
4
“मनसेचा आघाडीचा प्रस्ताव नाही, आम्हाला महाराष्ट्र धर्म शिकवू नये”; काँग्रेस नेत्यांचे उत्तर
5
निवडणूक न लढताच 'जीन्स-शर्ट'मधील तरुणाने घेतली मंत्रिपदाची शपथ! कोण आहेत दीपक प्रकाश?
6
IND vs SA: रोहित-विराट पुन्हा संघात दिसणार, बुमराह बाहेर जाणार; 'या' खेळाडूचाही पत्ता कट?
7
IIT दिल्लीमध्ये देशातील पहिल्या ‘Gen-Z पोस्ट ऑफिस’ची सुरुवात; Wifi, QR द्वारे पार्सल बुकिंग
8
"आता मैदान मोकळं, बघू कोण येतंय!"; संरक्षणातील पोलिसांना परत पाठवत जरांगेंचे आव्हान
9
Tesla Model Y सेफ्टी टेस्टमध्ये 'Pass' की 'Fail'? 5-स्टार रेटिंगमध्ये किती पॉइंट्स मिळाले? जाणून घ्या
10
“बिहारने जंगलराज नाकारून विकासाला मत दिले”; शिंदेंनी केले PM मोदी-नितीश कुमारांचे अभिनंदन
11
Metaचे मोठे पाऊल! WhatsApp मध्ये लवकरच येणार 'हे' जबरदस्त फीचर; वारंवार लॉग-इन करण्याची कटकट संपणार
12
मुलांच्या भविष्यासाठी सोने की SIP? 'या' दोन्ही पर्यायांचे फायदे-तोटे समजून घ्या आणि योग्य गुंतवणूक निवडा!
13
...त्यामुळे सर्व छोट्या मोठ्या कुरुबरी अमित शाह यांना जाऊन सांगितल्या जातात; काँग्रेसचा टोला
14
जम्मूमध्ये 'काश्मीर टाईम्स'च्या कार्यालयावर SIA चा मोठा छापा; AK-47 च्या गोळ्या आणि ग्रेनेडचा लिव्हर जप्त!
15
बाजारात तेजीचा डबल धमका! निफ्टी वर्षभरानंतर २६,२०० पार, गुंतवणूकदारांची ६८,००० कोटींची कमाई
16
Red Fort Blast: दिल्लीतील स्फोट प्रकरणात आणखी चार प्रमुख आरोपींना अटक, एनआयएची मोठी कारवाई
17
सप्तपदी झाले, डीजेवर नाचली, पाठवणीच्या वेळी पसार, नवरदेव म्हणतो, "जमीन गहाण ठेवून लग्न..."
18
दिल्ली दंगल सूनियोजित कट होता; उमर खालिद-शरजील इमामच्या जामिनास पोलिसांचा विरोध
19
अ‍ॅसिड हल्ल्यातील 'ममता'चा अखेर मृत्यू; फेसबुकवर वेदना मांडणाऱ्या आईची दोन मुले झाली पोरकी
20
नेपाळमध्ये पुन्हा एकदा Gen-Z रस्त्यावर उतरले, मोठा गोंधळ सुरू; कर्फ्यू लागू
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पाचवी ते दहावीच्या ९० शाळा अद्याप बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:30 IST

कोरोनामुळे राज्यभरातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. आता टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यात येत आहेत. सुरुवातीला नववी ते बारावीपर्यंतचे ...

कोरोनामुळे राज्यभरातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. आता टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यात येत आहेत. सुरुवातीला नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले. त्यानंतर २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. शाळा सुरू करताना कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे. त्यामुळे शाळा निर्जंतुकीकरण करणे, कोरोना टेस्ट यासह विद्यार्थ्यांना मास्क व शारीरिक अंतर पाळणे यासंदर्भात मार्गदर्शन करणे आदी कामे शाळा प्रशासनाला करावी लागत आहेत. त्यामुळे अद्याप पूर्ण क्षमतेने शाळा सुरू झाल्या नसल्याचे पाहावयास मिळत आहेत. काही शाळांनी अद्याप प्रस्ताव सादर केले नाहीत, तर काही शाळांचे प्रस्ताव नाकरण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील उर्वरित शाळा कधी सुरू होणार याकडे पालकांसह, विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

शाळा बंद असल्याची कारणे

कोरोनानंतर शाळा सुरू करण्यासाठी प्रशासनाने काही नियम व अटी घालून दिल्या आहेत. त्यानुसार शाळांना शिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर करावे लागतात. या प्रस्तावांची पाहणी करून शिक्षण विभाग शाळा सुरू करण्यासंदर्भात शाळा प्रशासनाला सूचना करतात. मात्र, जिल्ह्यातील काही शाळांनी अद्याप प्रस्ताव सादर केले नाहीत, तर काही शाळांच्या प्रस्तावात त्रुटी असल्याने शिक्षण विभागाने हे प्रस्ताव फेटाळले आहेत.

एकही शिक्षक, कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह नाही

शाळा सुरू करण्याअगोदर शिक्षक व कर्मचाऱ्यांना कोरोना टेस्ट करण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार शाळा सुरू झालेल्या शिक्षकांनी कोरोना टेस्ट करून घेतल्या आहेत. मात्र, यामध्ये एकही शिक्षक व कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला नाही.

जिल्ह्यातील शाळांची सद्य:स्थिती

पाचवी ते दहावीपर्यंतच्या शाळा

३०४

--------

सुरू झालेल्या शाळा

२४१

----------

विद्यार्थी संख्या

एकूण संख्या

१२२५७५

-------

उपस्थित विद्यार्थी

९३९७०

प्रतिक्रिया

शाळा सुरू करण्यासंदर्भात शाळा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. त्यानुसार शालेय व्यवस्थापन समितीचा प्रस्ताव व शिक्षकांच्या आरटीपीसीआर टेस्टचा अहवाल आल्यानंतर प्रस्तावांची छाननी केली जात आहे, तसेच परिपूर्ण प्रस्ताव मान्यतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येत आहेत. त्यांच्या मान्यतेनंतरच शाळा सुरू करण्यात येत आहेत.

-पी.बी. पावसे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

-----------