शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पाचवी ते दहावीच्या ९० शाळा अद्याप बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:30 IST

कोरोनामुळे राज्यभरातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. आता टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यात येत आहेत. सुरुवातीला नववी ते बारावीपर्यंतचे ...

कोरोनामुळे राज्यभरातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. आता टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यात येत आहेत. सुरुवातीला नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले. त्यानंतर २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. शाळा सुरू करताना कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे. त्यामुळे शाळा निर्जंतुकीकरण करणे, कोरोना टेस्ट यासह विद्यार्थ्यांना मास्क व शारीरिक अंतर पाळणे यासंदर्भात मार्गदर्शन करणे आदी कामे शाळा प्रशासनाला करावी लागत आहेत. त्यामुळे अद्याप पूर्ण क्षमतेने शाळा सुरू झाल्या नसल्याचे पाहावयास मिळत आहेत. काही शाळांनी अद्याप प्रस्ताव सादर केले नाहीत, तर काही शाळांचे प्रस्ताव नाकरण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील उर्वरित शाळा कधी सुरू होणार याकडे पालकांसह, विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

शाळा बंद असल्याची कारणे

कोरोनानंतर शाळा सुरू करण्यासाठी प्रशासनाने काही नियम व अटी घालून दिल्या आहेत. त्यानुसार शाळांना शिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर करावे लागतात. या प्रस्तावांची पाहणी करून शिक्षण विभाग शाळा सुरू करण्यासंदर्भात शाळा प्रशासनाला सूचना करतात. मात्र, जिल्ह्यातील काही शाळांनी अद्याप प्रस्ताव सादर केले नाहीत, तर काही शाळांच्या प्रस्तावात त्रुटी असल्याने शिक्षण विभागाने हे प्रस्ताव फेटाळले आहेत.

एकही शिक्षक, कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह नाही

शाळा सुरू करण्याअगोदर शिक्षक व कर्मचाऱ्यांना कोरोना टेस्ट करण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार शाळा सुरू झालेल्या शिक्षकांनी कोरोना टेस्ट करून घेतल्या आहेत. मात्र, यामध्ये एकही शिक्षक व कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला नाही.

जिल्ह्यातील शाळांची सद्य:स्थिती

पाचवी ते दहावीपर्यंतच्या शाळा

३०४

--------

सुरू झालेल्या शाळा

२४१

----------

विद्यार्थी संख्या

एकूण संख्या

१२२५७५

-------

उपस्थित विद्यार्थी

९३९७०

प्रतिक्रिया

शाळा सुरू करण्यासंदर्भात शाळा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. त्यानुसार शालेय व्यवस्थापन समितीचा प्रस्ताव व शिक्षकांच्या आरटीपीसीआर टेस्टचा अहवाल आल्यानंतर प्रस्तावांची छाननी केली जात आहे, तसेच परिपूर्ण प्रस्ताव मान्यतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येत आहेत. त्यांच्या मान्यतेनंतरच शाळा सुरू करण्यात येत आहेत.

-पी.बी. पावसे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

-----------