शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
2
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
3
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
4
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
5
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
6
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
7
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
8
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
9
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
10
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
11
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
12
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
13
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
14
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
15
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
16
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
17
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
18
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
19
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
20
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी

जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ८७ टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:31 IST

हिंगोली: जिल्ह्यात तीन दिवस पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत जून ते सप्टेंबर या मान्सून ...

हिंगोली: जिल्ह्यात तीन दिवस पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत जून ते सप्टेंबर या मान्सून कालावधीतील होणाऱ्या एकूण पावसाच्या सरासरी ८७.०२ टक्के पाऊस झाला. गतवर्षी याच कालावधीत १२०.४८ टक्के पाऊस झाला होता.

जिल्ह्यात मागील महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे नदी-नाल्यांना पाणी आले होते. त्यानंतर जवळपास एक महिना पावसाने पाठ फिरविल्याने पिके सुकत चालली होती. मात्र पुन्हा मान्सून पावसाने हजेरी लावली. सलग तीन दिवस कुठे रिमझिम तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने पिकांना दिलासा मिळाला. ढगाळ वातावरण व रिमझिम पावसामुळे सूर्यदर्शनही झाले नव्हते. शनिवारीही जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस झाला. दरम्यान, जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या मान्सून कालावधीत वार्षिक सरासरीच्या ८७.०२ टक्के पाऊस झाला. यात सर्वाधिक पाऊस औंढा तालुक्यात झाला असून त्याची टक्केवारी १०५.५८ टक्के आहे. त्यानंतर कळमनुरी ९३.८४, सेनगाव ८४.२५, वसमत ८१.९८ तर हिंगोली तालुक्यात ७८.५२ टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत २३.४६ टक्के पाऊस कमी झाला आहे. गतवर्षी याच कालावधीत १२०.४८ टक्के पाऊस झाला होता.

रविवारी १२ मिमी पाऊस

जिल्ह्यात रविवारपर्यंतच्या मागील ४८ तासात १२.३० मिमी पाऊस झाला. यात हिंगोली तालुक्यात १.३० मिमी., कळमनुरी ४२.७०, वसमत ८.६०, औंढा ६.०० सेनगाव ३.१० मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, रविवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यात आकाश कोरडे दिसून येत होते.