शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

जिल्ह्यात ८१ टक्के खरिपाची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:20 IST

जिल्ह्यात खरीप हंगामाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी सोयाबीनसारख्या पिकांची पेरणी करण्यास सुरुवात केली होती. मात्र ...

जिल्ह्यात खरीप हंगामाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी सोयाबीनसारख्या पिकांची पेरणी करण्यास सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर पावसाने पाठ फिरविल्याने पेरणीला ब्रेक लागला होता. पंधरा ते वीस दिवसांच्या कालावधीनंतर पुन्हा पावसाचे आगमन झाले होते. त्यामुळे पुन्हा पेरणीला गती आली. आतापर्यंत जिल्ह्यात ८१.७९ टक्के खरिपाची पेरणी झाली आहे. यात सर्वाधिक पेरणी सोयाबीन पिकाची झाली असून, सर्वसाधारण पेरणी क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यामुळे सोयाबीनची पेरणीची टक्केवारी १५२.३३ वर पोहोचली आहे. सोयाबीनला मिळालेला भाव लक्षात घेता, शेतकऱ्यांनी कापसाचे क्षेत्र कमी करून सोयाबीनचा पेरा केला. हळद पिकाखालील क्षेत्रही यावर्षी दहा टक्क्यांनी वाढले असून, आतापर्यंत ४९७६३ हेक्टर क्षेत्रावर हळदीची लागवड करण्यात आली. त्यानंतर ज्वारी ९.५३ टक्के, खरीप मका ४१.८५, तूर ६८.७२, मूग २३. ८१, उडीद ३५.५२, तिळाची ३.६६ टक्के पेरणी झाली असून, कापसाची ३६.६९ टक्के लागवड झाली आहे. यावर्षी मूग, उडीद पिकाचा पेरा कमी झालेला आढळून येत आहे. शेतकरी आंतरपीक म्हणून या पिकाला पसंती देत आहेत.

हिंगोली तालुक्यात सर्वाधिक पेरणी

जिल्ह्यात ८१.७९ टक्के पेरणी पूर्ण झाली असली, तरी यामध्ये सर्वाधिक पेरणी हिंगोली तालुक्यात झाली आहे. त्यानंतर सेनगाव तालुक्यात ९४.८४ टक्के, कळमनुरी ९२.३० टक्के, औंढा ७०.७५ टक्के, तर वसमत तालुक्यात ४२.४५ टक्के पेरणी झाली आहे.