शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानच्या उप पंतप्रधानांचे मोठे विधान
3
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
4
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
5
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
6
Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या
7
दर गुरुवारी काय काम करतो हाफिज सईद?; लश्करच्या माजी दहशतवाद्याचा मोठा खुलासा
8
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
9
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
10
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
11
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
12
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी
13
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
14
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
15
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
16
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
17
"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
18
Narasimha Jayanti 2025: नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या १५०० वर्ष जुन्या नृसिंह मंदिराबद्दल!
19
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
20
आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 

१३५ धोकादायक इमारतींमध्ये २५० रहिवासी; काहींनी ठेवले भाडेकरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:22 IST

हिंगोली शहरात गतवर्षी पाऊस नसतानाही एका इमारतीच्या भिंतीचा भाग कोसळून दोन जण जखमी झाले होते. यंदा आता पावसाळ्याला प्रारंभ ...

हिंगोली शहरात गतवर्षी पाऊस नसतानाही एका इमारतीच्या भिंतीचा भाग कोसळून दोन जण जखमी झाले होते. यंदा आता पावसाळ्याला प्रारंभ झाला आहे. अनेक इमारती धोकादायक असल्याने त्या कधी पडतील, याचा नेम नाही. मागील अनेक वर्षांपासून पालिका नोटीस देते, मात्र इमारतीला काही धोका झाला नाही म्हणून ती पाडण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याचे दिसून येत आहे. यात अनेकांनी आर्थिक अडचणीपोटी इमारत रिकामी करून इतरत्र वास्तव्य केले. मात्र ही इमारत पाडली नाही. तर काहींनी आता या इमारतीत भाडेकरू ठेवले. कमी रकमेत जागा मिळत असल्याने भाडेकरूही जीव धोक्यात घालून अशा ठिकाणी राहात असल्याचे दिसत आहे. तर काही ठिकाणी मालक स्वत: राहतात.

हिंगोली शहराजवळून वाहणाऱ्या कयाधू नदीच्या पूररेषेत मोडणाऱ्या ७६० घरांनाही नोटीस दिली आहे. यात महादेववाडी, बावणखोली, आजम कॉलनी, खाजा कॉलनी, शिवराजनगर भागातील अनेक घरे या पूररेषेच्या डेंजर झोनमध्ये आहेत. कयाधूला जास्त पूर आला की, या घरांना धोका संभवतो. या नागरिकांनाही दरवर्षी नोटिसा दिल्यानंतरही त्यांच्यावर काही फरक पडत नाही.

ज्या इमारतीला नोटीस दिली ती भावाची आहे. त्याचा धोकादायक भाग उतरवून घेतला आहे. ती पूर्ण पाडायला सांगितली आहे. भाऊ किंवा कोणीच तेथे राहात नाही.

-मोहन रोडे, हेमराज गल्ली

आम्ही राहातो तो भाग सुरक्षित वाटतो. मात्र समोरच्या भागात गळती आहे. वरचा मजला मोडकळीस आला आहे. भाड्याने राहात होतो. मात्र आता इतरत्र जाण्याची तयारी सुरू आहे.

एच.व्ही. गवई, काप्रतवार कॉलनी

आमच्या इमारतीचा धोकादायक भाग तेवढा उतरवून घेतला. इतरत्र कुठे जाणार? आहे तो भाग सुरक्षित आहे. तर यंदा बाजूचे बांधकाम होत असून आम्हीही डागडुजी करणार आहोत.

रजनीश तिवारी, जुने शहर

धोकादायक इमारती १३५

इमारतींत राहणाऱ्यांची संख्या २५०

वारंवार दिल्या नोटिसा

याबाबत उपमुख्याधिकारी उमेश हेंबाडे म्हणाले, नगरपालिकेकडून वारंवार नोटिसा दिल्या जातात. यंदाही १३५ घरमालकांना नोटिसा दिल्या आहेत. दुर्घटना घडल्यास घरमालक जबाबदार राहील, असे स्पष्टपणे म्हटले आहे.

इमारत पडल्यास जबाबदार कोण?

गेल्यावर्षी चांगला पावसाळा झाल्याने मोठ्या शहरात अनेक दुर्घटना घडल्या. दुर्दैवाने हिंगोलीत असा प्रकार घडल्यावर याला जबाबदार कोण? हा प्रश्न आहे. पालिकेने नोटिसा देऊन स्पष्टपणे आपली बाजू बळकट करून ठेवली आहे.