शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्या मोदी मुंबईत तर दिल्लीत ठरणार शिंदेंचं भवितव्य; सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी, शिवसेना कुणाची?
2
म्हणे, कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तीनं सांगितलं!; सरन्यायाधीश हल्ला प्रकरणात 'त्या' वकिलाचं विधान
3
जबरदस्त फिचर! नंबरशिवाय तुमचे WhatsApp काम करेल, लवकरच अपडेट होणार
4
‘मविआ’सोबत न घेण्याच्या हर्षवर्धन सपकाळांचा निर्णय, मनसेची पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले...
5
चालत्या कारच्या छतावर जोडप्याचे खुल्लम खुल्ला प्रेम, व्हिडिओ व्हायरल झाल्याने लोकांमध्ये संतापाची लाट
6
Lifelesson: प्रेमानंद महाराजांच्या 'या' ३ सूचना, तुमच्या मनाला उभारी देतील हे नक्की!
7
"धर्मांतरणासाठी सुरू होती परदेशी फंडिंग...", छांगूर बाबाविरोधातील चार्जशीटमध्ये ATS चे मोठे दावे!
8
Cough Syrup : भयंकर! कफ सिरपमध्ये शाई, पेंटमधील केमिकलचा वापर? मुलांच्या औषधामागचं 'विषारी' सत्य
9
GST कपातीनंतर ₹८ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये येतील अनेक भारी कार्स, खरेदीचा विचार करत असाल तर पाहा नावं
10
अमेरिकेला बंदर, कराचीमध्ये तुर्कीला जमीन; पाकिस्तानच्या नवीन युतीमुळे भारतासमोर आव्हान
11
"४ लाख महिलांवर गँगरेप, स्वत:च्याच लोकांवर बॉम्बस्फोट.."; UN मध्ये भारताने पाकिस्तानला फटकारलं
12
दिल्लीचा प्रसिद्ध लाल किल्ला होत चालला आहे काळा! शास्त्रज्ञांनी सांगितले कारण; म्हणाले...
13
समंथाशी घटस्फोटानंतर कशी झाली शोभिताची एन्ट्री? नागा चैतन्यने अख्खी लव्हस्टोरी सांगितली
14
Gold Silver Price: ₹१.४५ लाखांपर्यंत पोहोचू शकतो सोन्याचा भाव, काय आहे यातील तेजीचं कारण? जाणून घ्या
15
विवाहित गर्लफ्रेंडला संपवलं, घरातच पुरलं अन् त्यावर खाट ठेवून झोपत होता प्रियकर! कसा पकडला गेला?
16
आठवड्याची सुरुवात गजकेसरी योगाने; करिअर, कमाईत ६ राशींना मिळणार भरघोस फायदे!
17
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट 'जावेद हबीब' अडचणीत! आतापर्यंत २० एफआयआर, पोलिसांनी कारवाई सुरू केली; नेमकं प्रकरण काय?
18
'घरी ये ना गं...', वारंवार बोलवूनही पत्नी परत येईना; विरहाने कंटाळलेल्या शेतकरी पतीने उचललं टोकाचं पाऊल!
19
"माझं डोकं अजूनही ठणकतंय, पण...", अपघातानंतर विजय देवराकोंडाची पोस्ट, चाहत्यांना दिले हेल्थ अपडेट
20
PPF बनेल रिटर्न मशीन, १ रुपयाही खर्च केल्याशिवाय दरवर्षी कमवाल ₹२.८८ लाखांचं व्याज; पाहा कमाईचं सिक्रेट

१३५ धोकादायक इमारतींमध्ये २५० रहिवासी; काहींनी ठेवले भाडेकरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:22 IST

हिंगोली शहरात गतवर्षी पाऊस नसतानाही एका इमारतीच्या भिंतीचा भाग कोसळून दोन जण जखमी झाले होते. यंदा आता पावसाळ्याला प्रारंभ ...

हिंगोली शहरात गतवर्षी पाऊस नसतानाही एका इमारतीच्या भिंतीचा भाग कोसळून दोन जण जखमी झाले होते. यंदा आता पावसाळ्याला प्रारंभ झाला आहे. अनेक इमारती धोकादायक असल्याने त्या कधी पडतील, याचा नेम नाही. मागील अनेक वर्षांपासून पालिका नोटीस देते, मात्र इमारतीला काही धोका झाला नाही म्हणून ती पाडण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याचे दिसून येत आहे. यात अनेकांनी आर्थिक अडचणीपोटी इमारत रिकामी करून इतरत्र वास्तव्य केले. मात्र ही इमारत पाडली नाही. तर काहींनी आता या इमारतीत भाडेकरू ठेवले. कमी रकमेत जागा मिळत असल्याने भाडेकरूही जीव धोक्यात घालून अशा ठिकाणी राहात असल्याचे दिसत आहे. तर काही ठिकाणी मालक स्वत: राहतात.

हिंगोली शहराजवळून वाहणाऱ्या कयाधू नदीच्या पूररेषेत मोडणाऱ्या ७६० घरांनाही नोटीस दिली आहे. यात महादेववाडी, बावणखोली, आजम कॉलनी, खाजा कॉलनी, शिवराजनगर भागातील अनेक घरे या पूररेषेच्या डेंजर झोनमध्ये आहेत. कयाधूला जास्त पूर आला की, या घरांना धोका संभवतो. या नागरिकांनाही दरवर्षी नोटिसा दिल्यानंतरही त्यांच्यावर काही फरक पडत नाही.

ज्या इमारतीला नोटीस दिली ती भावाची आहे. त्याचा धोकादायक भाग उतरवून घेतला आहे. ती पूर्ण पाडायला सांगितली आहे. भाऊ किंवा कोणीच तेथे राहात नाही.

-मोहन रोडे, हेमराज गल्ली

आम्ही राहातो तो भाग सुरक्षित वाटतो. मात्र समोरच्या भागात गळती आहे. वरचा मजला मोडकळीस आला आहे. भाड्याने राहात होतो. मात्र आता इतरत्र जाण्याची तयारी सुरू आहे.

एच.व्ही. गवई, काप्रतवार कॉलनी

आमच्या इमारतीचा धोकादायक भाग तेवढा उतरवून घेतला. इतरत्र कुठे जाणार? आहे तो भाग सुरक्षित आहे. तर यंदा बाजूचे बांधकाम होत असून आम्हीही डागडुजी करणार आहोत.

रजनीश तिवारी, जुने शहर

धोकादायक इमारती १३५

इमारतींत राहणाऱ्यांची संख्या २५०

वारंवार दिल्या नोटिसा

याबाबत उपमुख्याधिकारी उमेश हेंबाडे म्हणाले, नगरपालिकेकडून वारंवार नोटिसा दिल्या जातात. यंदाही १३५ घरमालकांना नोटिसा दिल्या आहेत. दुर्घटना घडल्यास घरमालक जबाबदार राहील, असे स्पष्टपणे म्हटले आहे.

इमारत पडल्यास जबाबदार कोण?

गेल्यावर्षी चांगला पावसाळा झाल्याने मोठ्या शहरात अनेक दुर्घटना घडल्या. दुर्दैवाने हिंगोलीत असा प्रकार घडल्यावर याला जबाबदार कोण? हा प्रश्न आहे. पालिकेने नोटिसा देऊन स्पष्टपणे आपली बाजू बळकट करून ठेवली आहे.