शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
2
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
4
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...
5
ITR ची डेडलाईन ४५ दिवसांनी का वाढवली? १२ लाखांपर्यंतचा 'नो टॅक्स' आता नाही, पुढच्या वर्षी
6
आयकर कायद्याचा चेहरामोहरा बदलणार? अर्थमंत्र्यांनी सादर केले नवे विधेयक, 'हे' मोठे बदल तुमच्यासाठी महत्त्वाचे!
7
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
8
ICC Womens World Cup 2025 : युवराज सिंगच्या साक्षीनं हरमनप्रीत कौरनं दिला शब्द; आम्ही...
9
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
10
‘काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भाजपाच काँग्रेसयुक्त झाला; भाजपाकडे नेतृत्व, कार्यकर्त्यांचा अभाव,’’ हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला   
11
AUS vs SA: एकेकाळी 'मुंबई इंडियन्स'कडून खेळणाऱ्या फलंदाजांने मोडला सूर्यकुमार यादवचा विश्वविक्रम
12
“सगळीकडे हीच चर्चा, मतचोरीविरोधात जनता राहुल गांधींसोबत, संपूर्ण देश म्हणणे ऐकतोय”: काँग्रेस
13
आई दुसऱ्यांकडे काम करायची, वडील विटा उचलायचे; २२ व्या वर्षी लेक देशातील सर्वात तरुण IPS
14
VIDEO: महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
15
Viral Video: मध्यरात्री शौचालयासाठी बाहेर पडला, अचानक समोर दिसला बिबट्या, पहारेकरीसोबत असं घडलं की...
16
‘माझी पत्नी बाहेरच्या लोकांना घरी बोलावते’, व्हिडीओमध्ये सांगून पतीनं उचललं भयानक पाऊल...  
17
बर्फाळ टेकडीवर वसलाय 'हा' छोटासा देश! स्वतःचा झेंडा, ध्वज आणि पासपोर्टची सुविधा देखील उपलब्ध; तुम्हाला माहितीये का?
18
१२ लाखांपर्यंतची करसवलत रद्द होणार का? नव्या आयकर विधेयकावरुन सरकारने केला खुलासा
19
Gold Silver Price 11 August: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅम GOLD साठी किती खर्च करावा लागणार?
20
"जोपर्यंत लोकांच्या मनात निवणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील तोपर्यंत...’’, शशी थरूर यांचं विधान  

१३५ धोकादायक इमारतींमध्ये २५० रहिवासी; काहींनी ठेवले भाडेकरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:22 IST

हिंगोली शहरात गतवर्षी पाऊस नसतानाही एका इमारतीच्या भिंतीचा भाग कोसळून दोन जण जखमी झाले होते. यंदा आता पावसाळ्याला प्रारंभ ...

हिंगोली शहरात गतवर्षी पाऊस नसतानाही एका इमारतीच्या भिंतीचा भाग कोसळून दोन जण जखमी झाले होते. यंदा आता पावसाळ्याला प्रारंभ झाला आहे. अनेक इमारती धोकादायक असल्याने त्या कधी पडतील, याचा नेम नाही. मागील अनेक वर्षांपासून पालिका नोटीस देते, मात्र इमारतीला काही धोका झाला नाही म्हणून ती पाडण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याचे दिसून येत आहे. यात अनेकांनी आर्थिक अडचणीपोटी इमारत रिकामी करून इतरत्र वास्तव्य केले. मात्र ही इमारत पाडली नाही. तर काहींनी आता या इमारतीत भाडेकरू ठेवले. कमी रकमेत जागा मिळत असल्याने भाडेकरूही जीव धोक्यात घालून अशा ठिकाणी राहात असल्याचे दिसत आहे. तर काही ठिकाणी मालक स्वत: राहतात.

हिंगोली शहराजवळून वाहणाऱ्या कयाधू नदीच्या पूररेषेत मोडणाऱ्या ७६० घरांनाही नोटीस दिली आहे. यात महादेववाडी, बावणखोली, आजम कॉलनी, खाजा कॉलनी, शिवराजनगर भागातील अनेक घरे या पूररेषेच्या डेंजर झोनमध्ये आहेत. कयाधूला जास्त पूर आला की, या घरांना धोका संभवतो. या नागरिकांनाही दरवर्षी नोटिसा दिल्यानंतरही त्यांच्यावर काही फरक पडत नाही.

ज्या इमारतीला नोटीस दिली ती भावाची आहे. त्याचा धोकादायक भाग उतरवून घेतला आहे. ती पूर्ण पाडायला सांगितली आहे. भाऊ किंवा कोणीच तेथे राहात नाही.

-मोहन रोडे, हेमराज गल्ली

आम्ही राहातो तो भाग सुरक्षित वाटतो. मात्र समोरच्या भागात गळती आहे. वरचा मजला मोडकळीस आला आहे. भाड्याने राहात होतो. मात्र आता इतरत्र जाण्याची तयारी सुरू आहे.

एच.व्ही. गवई, काप्रतवार कॉलनी

आमच्या इमारतीचा धोकादायक भाग तेवढा उतरवून घेतला. इतरत्र कुठे जाणार? आहे तो भाग सुरक्षित आहे. तर यंदा बाजूचे बांधकाम होत असून आम्हीही डागडुजी करणार आहोत.

रजनीश तिवारी, जुने शहर

धोकादायक इमारती १३५

इमारतींत राहणाऱ्यांची संख्या २५०

वारंवार दिल्या नोटिसा

याबाबत उपमुख्याधिकारी उमेश हेंबाडे म्हणाले, नगरपालिकेकडून वारंवार नोटिसा दिल्या जातात. यंदाही १३५ घरमालकांना नोटिसा दिल्या आहेत. दुर्घटना घडल्यास घरमालक जबाबदार राहील, असे स्पष्टपणे म्हटले आहे.

इमारत पडल्यास जबाबदार कोण?

गेल्यावर्षी चांगला पावसाळा झाल्याने मोठ्या शहरात अनेक दुर्घटना घडल्या. दुर्दैवाने हिंगोलीत असा प्रकार घडल्यावर याला जबाबदार कोण? हा प्रश्न आहे. पालिकेने नोटिसा देऊन स्पष्टपणे आपली बाजू बळकट करून ठेवली आहे.