शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळात 'भरोसा सेल' मुळे २४१ जोडप्यांचा जुळला संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:29 IST

हिंगोली : संशय, पाश्चिमात्य संस्कृती, मोबाईल आदी कारणावरून विवाहित जोडप्यांमध्ये वादाचे प्रकार वाढत आहेत. यातून जोडप्यासह त्यांच्या पाल्यांनाही परिणामाला ...

हिंगोली : संशय, पाश्चिमात्य संस्कृती, मोबाईल आदी कारणावरून विवाहित जोडप्यांमध्ये वादाचे प्रकार वाढत आहेत. यातून जोडप्यासह त्यांच्या पाल्यांनाही परिणामाला सामोरे जावे लागत आहे. मात्र योग्य समूपदेशन केल्यास पुढील दुष्परीणाम टाळता येतात हे भरोसा सेलने दाखवून दिले आहे. योग्य समूपदेशन केल्याने वर्षरात २४१ जोडप्यांचे संसार जुळविण्यात भरोसा सेलला यश आले आहे.

मागील वर्षभरापासून कोरोना आजाराने कहर केला आहे. कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनही करण्यात आला होता. सध्याही संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे अनेकांच्या हातचा रोजगार गेला असून विवाहित जोडप्यांमध्ये वाद निर्माण होत आहेत. त्यात संशय, मोबाईलचा वापर, व्यसन, पाश्चिमात्य संस्कृती, पैशाची मागणी, शारिरीक व मानसिक त्रास आदी कारणांची भर पडत आहे. वाद विकोपाला पोहचत असल्याने पाल्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहेत. शेवटी अशी प्रकरणे घटस्फोटापर्यंत जात आहेत. घटस्फोटानंतर याचे परिणाम जोडप्यासह लहान मुलांनाही भोगावे लागतात. त्यामुळे अशी प्रकरणे उद्भवू नयेत, जोडप्यांमध्ये वाद झाला तरी समुपदेशनाने त्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न येथील पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात उभारलेल्या भरोसा सेलच्या माध्यमातून केला जात आहे. दोघांनाही एकत्र बोलावून वादाची कारणे शोधून तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात येत आहे. दोघामध्ये तडजोड घडवून त्यांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळेच जानेवारी ते डिसेंबर २०२० या काळात १६१ जोडप्यांचे संसार जुळविण्यात भरोसा सेलला यश आले आहे. तसेच जानेवारी ते मार्च २०२१ या तीन महिन्याच्या काळात ८० जोडप्यांचे संसार जुळविण्यात यश आले आहे. सध्या ही जोडपी आनंदाने नांदत असून त्यांच्यात कोणतेही वाद होत नसल्याचे सांगण्यात आले.

तीन महिन्यात ८० जोडप्यांना एकत्र आणण्यात यश

पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भरोसा सेल स्थापन करण्यात आला आहे. भरोसा सेलकडे मागील तीन महिन्यात १७२ प्रकरणे समूपदेशनासाठी आली होती. त्यातील ८० प्रकरणात तडजोड करण्यात भरोसा सेलला यश आले आहे. यासाठी सेवानिवृत्त न्यायाधीश पी.व्ही. खिल्लारे, स.पो.नि. विशाखा धुळे, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. दीपक खिल्लारे, वैद्यकीय सल्लागार डॉ. मेघा सुळे, समुपदेशक अमोल वायवळ, संरक्षण अधिकारी नितीन मकासरे, बालसमुपदेशक सचिन पठाडे, विधी सल्लागार मंगल भोजनकर, काजल हनमणे, पोलीस कर्मचारी शेख इस्माईल, सुनिता शिंदे, वर्षा शिंदे, स्वाती डोलारे, शिल्पा फटाले आदींनी पुढाकार घेतला आहे.

संचारबंदीमुळे समूपदेशनाचे काम थांबले

जिल्ह्यात कोरोनाच्या अनुषंगाने संचारबंदी लागू आहे. या काळात जोडप्यांना मुख्यालयी येण्यात येणाऱ्या अडचणी तसेच कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता समुपदेशनात अडथळा निर्माण होत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी काही दिवस समूपदेशनासाठी जोडप्यांना तारखा दिल्या नाहीत.

संशय, पाश्चिमात्य संस्कृती, व्यसन, मोबाईलचा वापर आदी कारणांमुळे विवाहित जोडप्यांमध्ये वाद होऊन प्रकरणे घटस्फोटापर्यंत जात आहेत. वर्षभरात २४१ जोडप्यांचा संसार जुळविण्यात भरोसा सेलला यश आले आहे.

- विशाखा धुळे, सपोनि. भरोसा सेल

फोटो : ६