शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

कोरोना काळात 'भरोसा सेल' मुळे २४१ जोडप्यांचा जुळला संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:29 IST

हिंगोली : संशय, पाश्चिमात्य संस्कृती, मोबाईल आदी कारणावरून विवाहित जोडप्यांमध्ये वादाचे प्रकार वाढत आहेत. यातून जोडप्यासह त्यांच्या पाल्यांनाही परिणामाला ...

हिंगोली : संशय, पाश्चिमात्य संस्कृती, मोबाईल आदी कारणावरून विवाहित जोडप्यांमध्ये वादाचे प्रकार वाढत आहेत. यातून जोडप्यासह त्यांच्या पाल्यांनाही परिणामाला सामोरे जावे लागत आहे. मात्र योग्य समूपदेशन केल्यास पुढील दुष्परीणाम टाळता येतात हे भरोसा सेलने दाखवून दिले आहे. योग्य समूपदेशन केल्याने वर्षरात २४१ जोडप्यांचे संसार जुळविण्यात भरोसा सेलला यश आले आहे.

मागील वर्षभरापासून कोरोना आजाराने कहर केला आहे. कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनही करण्यात आला होता. सध्याही संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे अनेकांच्या हातचा रोजगार गेला असून विवाहित जोडप्यांमध्ये वाद निर्माण होत आहेत. त्यात संशय, मोबाईलचा वापर, व्यसन, पाश्चिमात्य संस्कृती, पैशाची मागणी, शारिरीक व मानसिक त्रास आदी कारणांची भर पडत आहे. वाद विकोपाला पोहचत असल्याने पाल्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहेत. शेवटी अशी प्रकरणे घटस्फोटापर्यंत जात आहेत. घटस्फोटानंतर याचे परिणाम जोडप्यासह लहान मुलांनाही भोगावे लागतात. त्यामुळे अशी प्रकरणे उद्भवू नयेत, जोडप्यांमध्ये वाद झाला तरी समुपदेशनाने त्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न येथील पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात उभारलेल्या भरोसा सेलच्या माध्यमातून केला जात आहे. दोघांनाही एकत्र बोलावून वादाची कारणे शोधून तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात येत आहे. दोघामध्ये तडजोड घडवून त्यांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळेच जानेवारी ते डिसेंबर २०२० या काळात १६१ जोडप्यांचे संसार जुळविण्यात भरोसा सेलला यश आले आहे. तसेच जानेवारी ते मार्च २०२१ या तीन महिन्याच्या काळात ८० जोडप्यांचे संसार जुळविण्यात यश आले आहे. सध्या ही जोडपी आनंदाने नांदत असून त्यांच्यात कोणतेही वाद होत नसल्याचे सांगण्यात आले.

तीन महिन्यात ८० जोडप्यांना एकत्र आणण्यात यश

पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भरोसा सेल स्थापन करण्यात आला आहे. भरोसा सेलकडे मागील तीन महिन्यात १७२ प्रकरणे समूपदेशनासाठी आली होती. त्यातील ८० प्रकरणात तडजोड करण्यात भरोसा सेलला यश आले आहे. यासाठी सेवानिवृत्त न्यायाधीश पी.व्ही. खिल्लारे, स.पो.नि. विशाखा धुळे, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. दीपक खिल्लारे, वैद्यकीय सल्लागार डॉ. मेघा सुळे, समुपदेशक अमोल वायवळ, संरक्षण अधिकारी नितीन मकासरे, बालसमुपदेशक सचिन पठाडे, विधी सल्लागार मंगल भोजनकर, काजल हनमणे, पोलीस कर्मचारी शेख इस्माईल, सुनिता शिंदे, वर्षा शिंदे, स्वाती डोलारे, शिल्पा फटाले आदींनी पुढाकार घेतला आहे.

संचारबंदीमुळे समूपदेशनाचे काम थांबले

जिल्ह्यात कोरोनाच्या अनुषंगाने संचारबंदी लागू आहे. या काळात जोडप्यांना मुख्यालयी येण्यात येणाऱ्या अडचणी तसेच कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता समुपदेशनात अडथळा निर्माण होत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी काही दिवस समूपदेशनासाठी जोडप्यांना तारखा दिल्या नाहीत.

संशय, पाश्चिमात्य संस्कृती, व्यसन, मोबाईलचा वापर आदी कारणांमुळे विवाहित जोडप्यांमध्ये वाद होऊन प्रकरणे घटस्फोटापर्यंत जात आहेत. वर्षभरात २४१ जोडप्यांचा संसार जुळविण्यात भरोसा सेलला यश आले आहे.

- विशाखा धुळे, सपोनि. भरोसा सेल

फोटो : ६