शहरं
Join us  
Trending Stories
1
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
2
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
3
बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार
4
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
5
रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण
6
'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र
7
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
8
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
9
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
10
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
11
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
12
"सत्यनारायण पूजेसाठी दिवसभर उपवास अन् नंतर...", शेफालीचा पती पराग त्यागीने दिली माहिती
13
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
14
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
15
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
16
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
17
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
18
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
19
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
20
Paresh Rawal : "आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?

कोरोना काळात 'भरोसा सेल' मुळे २४१ जोडप्यांचा जुळला संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:29 IST

हिंगोली : संशय, पाश्चिमात्य संस्कृती, मोबाईल आदी कारणावरून विवाहित जोडप्यांमध्ये वादाचे प्रकार वाढत आहेत. यातून जोडप्यासह त्यांच्या पाल्यांनाही परिणामाला ...

हिंगोली : संशय, पाश्चिमात्य संस्कृती, मोबाईल आदी कारणावरून विवाहित जोडप्यांमध्ये वादाचे प्रकार वाढत आहेत. यातून जोडप्यासह त्यांच्या पाल्यांनाही परिणामाला सामोरे जावे लागत आहे. मात्र योग्य समूपदेशन केल्यास पुढील दुष्परीणाम टाळता येतात हे भरोसा सेलने दाखवून दिले आहे. योग्य समूपदेशन केल्याने वर्षरात २४१ जोडप्यांचे संसार जुळविण्यात भरोसा सेलला यश आले आहे.

मागील वर्षभरापासून कोरोना आजाराने कहर केला आहे. कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनही करण्यात आला होता. सध्याही संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे अनेकांच्या हातचा रोजगार गेला असून विवाहित जोडप्यांमध्ये वाद निर्माण होत आहेत. त्यात संशय, मोबाईलचा वापर, व्यसन, पाश्चिमात्य संस्कृती, पैशाची मागणी, शारिरीक व मानसिक त्रास आदी कारणांची भर पडत आहे. वाद विकोपाला पोहचत असल्याने पाल्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहेत. शेवटी अशी प्रकरणे घटस्फोटापर्यंत जात आहेत. घटस्फोटानंतर याचे परिणाम जोडप्यासह लहान मुलांनाही भोगावे लागतात. त्यामुळे अशी प्रकरणे उद्भवू नयेत, जोडप्यांमध्ये वाद झाला तरी समुपदेशनाने त्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न येथील पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात उभारलेल्या भरोसा सेलच्या माध्यमातून केला जात आहे. दोघांनाही एकत्र बोलावून वादाची कारणे शोधून तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात येत आहे. दोघामध्ये तडजोड घडवून त्यांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळेच जानेवारी ते डिसेंबर २०२० या काळात १६१ जोडप्यांचे संसार जुळविण्यात भरोसा सेलला यश आले आहे. तसेच जानेवारी ते मार्च २०२१ या तीन महिन्याच्या काळात ८० जोडप्यांचे संसार जुळविण्यात यश आले आहे. सध्या ही जोडपी आनंदाने नांदत असून त्यांच्यात कोणतेही वाद होत नसल्याचे सांगण्यात आले.

तीन महिन्यात ८० जोडप्यांना एकत्र आणण्यात यश

पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भरोसा सेल स्थापन करण्यात आला आहे. भरोसा सेलकडे मागील तीन महिन्यात १७२ प्रकरणे समूपदेशनासाठी आली होती. त्यातील ८० प्रकरणात तडजोड करण्यात भरोसा सेलला यश आले आहे. यासाठी सेवानिवृत्त न्यायाधीश पी.व्ही. खिल्लारे, स.पो.नि. विशाखा धुळे, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. दीपक खिल्लारे, वैद्यकीय सल्लागार डॉ. मेघा सुळे, समुपदेशक अमोल वायवळ, संरक्षण अधिकारी नितीन मकासरे, बालसमुपदेशक सचिन पठाडे, विधी सल्लागार मंगल भोजनकर, काजल हनमणे, पोलीस कर्मचारी शेख इस्माईल, सुनिता शिंदे, वर्षा शिंदे, स्वाती डोलारे, शिल्पा फटाले आदींनी पुढाकार घेतला आहे.

संचारबंदीमुळे समूपदेशनाचे काम थांबले

जिल्ह्यात कोरोनाच्या अनुषंगाने संचारबंदी लागू आहे. या काळात जोडप्यांना मुख्यालयी येण्यात येणाऱ्या अडचणी तसेच कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता समुपदेशनात अडथळा निर्माण होत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी काही दिवस समूपदेशनासाठी जोडप्यांना तारखा दिल्या नाहीत.

संशय, पाश्चिमात्य संस्कृती, व्यसन, मोबाईलचा वापर आदी कारणांमुळे विवाहित जोडप्यांमध्ये वाद होऊन प्रकरणे घटस्फोटापर्यंत जात आहेत. वर्षभरात २४१ जोडप्यांचा संसार जुळविण्यात भरोसा सेलला यश आले आहे.

- विशाखा धुळे, सपोनि. भरोसा सेल

फोटो : ६