शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
3
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
4
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
5
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
6
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
7
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
8
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
9
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
10
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
11
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
12
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
13
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
14
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
15
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
16
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
17
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
19
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
20
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक

जिल्ह्यात २१८ तीव्र कुपोषित बालके - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:33 IST

हिंगोली जिल्ह्यात कोरोनामुळे सध्या अंगणवाड्या बंद आहेत. त्यामुळे पोषण आहार घरपोच देण्याचे काम करण्यात येत आहे. तसेच वजनेही घेतली ...

हिंगोली जिल्ह्यात कोरोनामुळे सध्या अंगणवाड्या बंद आहेत. त्यामुळे पोषण आहार घरपोच देण्याचे काम करण्यात येत आहे. तसेच वजनेही घेतली जात आहेत. जिल्ह्यातील सहा प्रकल्पांतर्गत १ लाख ५४८ बालके ० ते ६ वर्ष वयोगटातील आहेत. यापैकी तीव्र कमी वजनाची बालके ९३१ असल्याचे आढळून आले आहेत. ७६१३४ बालके ही सर्वसाधारण श्रेणीत आहेत. ज्या बालकांना पोषण आहारानंतरही कुपोषणातून बाहेर काढण्यात यश आले नाही, अशांची संख्या २१८ एवढी आहे. त्यांच्यासाठी व्हीसीडीसी सुरू करण्यासाठी प्रस्तावित केले आहे. यात प्रकल्पनिहाय हिंगोली ३१, सेनगाव ३४, औंढा ना.२४, वसमत ४८, कळमनुरी ४३ तर आखाडा बाळापूर ३८ अशी मुलांची संख्या आहे.

दरवर्षीच जवळपास आठशे ते हजार मुले कुपोषणाच्या विळख्यात सापडत असल्याचे आढळून येत आहे. शासनाकडून पोषण आहाराचा पुरवठा केला जात असला तरीही मुलांमधील हे कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यात यश येत नाही. मागील काही वर्षांपासून वजन व उंचीवरून कुपोषणाचे निकष लावले जात आहेत. त्यानंतर कुपोषणाचे प्रमाण किती जास्त आहे, हे समोर येत आहे. या मुलांना पोषण आहारानंतरही त्यातून बाहेर काढण्यात अपशय आल्यानंतर शेवटचा पर्याय म्हणून व्हीसीडीसी सुरू केले जातात. या ठिकाणी आरोग्य अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली मुलांना आहार दिला जातो. तसेच औषधोपचारांची गरज असल्यास तेही दिले जाते. शिवाय वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊ घालण्याचे प्रात्यक्षिकही दिले जाते. त्यामुळे नंतर फरक जाणवतो.