शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
3
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
4
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
5
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
6
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
7
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
8
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
9
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
10
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
11
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
12
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
13
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
14
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
15
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
16
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
17
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
18
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
19
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
20
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी

सीबीएसईचे १६४ विद्यार्थी परीक्षा न देता पास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:31 IST

हिंगोली : कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सीबीएसईच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न देताच उत्तीर्ण करण्याचा निर्णय ...

हिंगोली : कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सीबीएसईच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न देताच उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्ह्यातील १६४ विद्यार्थी परीक्षा न देताच उत्तीर्ण झाले आहेत.

राज्यासह देशभरात कोरोना आजाराचा संसर्ग वाढत चालला आहे. या संसर्ग आजाराची बाधा विद्यार्थ्यांना होऊ नये म्हणून राज्य शिक्षण विभागाने पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना आरटीई कायद्यानुसार उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला, तर दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याच धर्तीवर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेताच त्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात सीबीएसईच्या चार ते पाच शाळा आहेत. यातील चार शाळांमधील विद्यार्थी सीबीएसईच्या परीक्षेला बसले होते. दहावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील १६४ विद्यार्थ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. मात्र, या निर्णयानंतर पालक, शिक्षण तज्ज्ञांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पुढील प्रवेश कोणत्या आधारावर घेतले जाणार याबाबत पालकांमध्ये संभ्रम आहे.

सीबीएसईचे दहावीतील एकूण विद्यार्थी

मुले - ९५

मुली - ६९

पालक काय म्हणतात...

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर एखादा महिना उशिराही सोशल डिस्टन्सिंग पाळून परीक्षा घेता आली असती. परीक्षेमुळे विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता समजण्यास मदत होते. पुढे कोणत्या क्षेत्रात जायचे हे गुणवत्तेवरून ठरविता येते. परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केल्यामुळे क्षेत्र निवडण्यात चूक होऊ शकते.

- श्रीराम जाधव, पालक

कोरोना आजाराचा संसर्ग लक्षात घेता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सीबीएसईच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेताच उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर परीक्षा घ्यायला हरकत नव्हती. हुशार विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यास केला आहे.

-सूर्यकांत खाडे, पालक

प्रत्येक विद्यार्थ्याची प्रगती परीक्षेवरून समजते. परीक्षा हे विद्यार्थ्यांचे मूल्यमापनाचे साधन असल्याने परीक्षा ही घ्यायलाच पाहिजे. किमान दहावी, बारावीची तरी परीक्षा ही घ्यायलाच हवी.

-शिवाजी पवार, शिक्षण तज्ज्ञ

११वी, आयटीआय आदी प्रवेश कसे होणार

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेताच उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला असला तरी पुढील प्रवेश कसे होणार याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे पुढील प्रवेश कसे होणार, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

गुणदान समपातळीवर कसे आणणार ?

शाळा स्तरावरील प्रात्यक्षिक गुणांचे गुणदान करता येणार असले तरी लेखी परीक्षेच्या ८० गुणांचे गुणदान कसे करायचे, याबाबत अद्याप स्पष्ट सूचना शाळांना आल्या नसल्याचे शाळांतून सांगण्यात आले. त्यामुळे गुणदान करताना शाळांना मोठी दक्षता घ्यावी लागणार आहे.