शहरं
Join us  
Trending Stories
1
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
2
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
3
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
4
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
5
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
6
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
7
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
8
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
9
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
10
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
11
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
12
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
13
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
14
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
15
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
16
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
17
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
18
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
19
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान

सीबीएसईचे १६४ विद्यार्थी परीक्षा न देता पास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:31 IST

हिंगोली : कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सीबीएसईच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न देताच उत्तीर्ण करण्याचा निर्णय ...

हिंगोली : कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सीबीएसईच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न देताच उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्ह्यातील १६४ विद्यार्थी परीक्षा न देताच उत्तीर्ण झाले आहेत.

राज्यासह देशभरात कोरोना आजाराचा संसर्ग वाढत चालला आहे. या संसर्ग आजाराची बाधा विद्यार्थ्यांना होऊ नये म्हणून राज्य शिक्षण विभागाने पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना आरटीई कायद्यानुसार उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला, तर दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याच धर्तीवर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेताच त्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात सीबीएसईच्या चार ते पाच शाळा आहेत. यातील चार शाळांमधील विद्यार्थी सीबीएसईच्या परीक्षेला बसले होते. दहावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील १६४ विद्यार्थ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. मात्र, या निर्णयानंतर पालक, शिक्षण तज्ज्ञांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पुढील प्रवेश कोणत्या आधारावर घेतले जाणार याबाबत पालकांमध्ये संभ्रम आहे.

सीबीएसईचे दहावीतील एकूण विद्यार्थी

मुले - ९५

मुली - ६९

पालक काय म्हणतात...

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर एखादा महिना उशिराही सोशल डिस्टन्सिंग पाळून परीक्षा घेता आली असती. परीक्षेमुळे विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता समजण्यास मदत होते. पुढे कोणत्या क्षेत्रात जायचे हे गुणवत्तेवरून ठरविता येते. परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केल्यामुळे क्षेत्र निवडण्यात चूक होऊ शकते.

- श्रीराम जाधव, पालक

कोरोना आजाराचा संसर्ग लक्षात घेता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सीबीएसईच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेताच उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर परीक्षा घ्यायला हरकत नव्हती. हुशार विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यास केला आहे.

-सूर्यकांत खाडे, पालक

प्रत्येक विद्यार्थ्याची प्रगती परीक्षेवरून समजते. परीक्षा हे विद्यार्थ्यांचे मूल्यमापनाचे साधन असल्याने परीक्षा ही घ्यायलाच पाहिजे. किमान दहावी, बारावीची तरी परीक्षा ही घ्यायलाच हवी.

-शिवाजी पवार, शिक्षण तज्ज्ञ

११वी, आयटीआय आदी प्रवेश कसे होणार

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेताच उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला असला तरी पुढील प्रवेश कसे होणार याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे पुढील प्रवेश कसे होणार, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

गुणदान समपातळीवर कसे आणणार ?

शाळा स्तरावरील प्रात्यक्षिक गुणांचे गुणदान करता येणार असले तरी लेखी परीक्षेच्या ८० गुणांचे गुणदान कसे करायचे, याबाबत अद्याप स्पष्ट सूचना शाळांना आल्या नसल्याचे शाळांतून सांगण्यात आले. त्यामुळे गुणदान करताना शाळांना मोठी दक्षता घ्यावी लागणार आहे.