शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

जिल्ह्यात नव्याने १४१ रुग्ण; सहा जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:30 IST

१२ मे रोजी रॅपिड अँटिजन चाचणीद्वारे हिंगोली परिसर ५ व्यक्ती, कळमनुरी परिसर १, सेनगाव परिसर ४, औंढा परिसर १ ...

१२ मे रोजी रॅपिड अँटिजन चाचणीद्वारे हिंगोली परिसर ५ व्यक्ती, कळमनुरी परिसर १, सेनगाव परिसर ४, औंढा परिसर १ व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर ६५ व्यक्ती, औंढा परिसर ६, कळमनुरी परिसर ३२, वसमत परिसर ८, सेनगाव परिसर १९ व्यक्ती असे एकूण १४१ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, तर १२७ कोरोना रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. बुधवारी ६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयासह विविध ठिकाणी दाखल कोरोना रुग्णांपैकी ३२६ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजन लावण्यात आला, तर ३२ कोरोना रुग्णांची प्रकृती अतिगंभीर आहे. त्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे बुधवारी एकूण ३५८ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाचे एकूण १४ हजार ५०९ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी १३ हजार ४०८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजघडीला जिल्ह्यात एकूण ८०३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच कोरोनामुळे जिल्ह्यात आतापर्यंत २९८ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

मृत्यू तीनशेच्या उंबऱ्यावर

हिंगोली जिल्ह्यात आज सहा जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. यामध्ये जवळा बाजार येथील ६५ वर्षीय महिला व असोला येथील ३८ वर्षीय युवकाचा जिल्हा रुग्णालयात, वसमत रुग्णालयात मुडी येथील ६५ वर्षीय पुरुष तर विरेगाव येथील ६७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. नवीन कोविड सेंटर हिंगोलीत औंढा तालुक्यातील उकळी व कळमनुरी तालुक्यातील सालेगाव येथील एकेका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला.