शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात नव्याने १४१ रुग्ण; सहा जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:30 IST

१२ मे रोजी रॅपिड अँटिजन चाचणीद्वारे हिंगोली परिसर ५ व्यक्ती, कळमनुरी परिसर १, सेनगाव परिसर ४, औंढा परिसर १ ...

१२ मे रोजी रॅपिड अँटिजन चाचणीद्वारे हिंगोली परिसर ५ व्यक्ती, कळमनुरी परिसर १, सेनगाव परिसर ४, औंढा परिसर १ व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर ६५ व्यक्ती, औंढा परिसर ६, कळमनुरी परिसर ३२, वसमत परिसर ८, सेनगाव परिसर १९ व्यक्ती असे एकूण १४१ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, तर १२७ कोरोना रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. बुधवारी ६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयासह विविध ठिकाणी दाखल कोरोना रुग्णांपैकी ३२६ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजन लावण्यात आला, तर ३२ कोरोना रुग्णांची प्रकृती अतिगंभीर आहे. त्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे बुधवारी एकूण ३५८ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाचे एकूण १४ हजार ५०९ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी १३ हजार ४०८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजघडीला जिल्ह्यात एकूण ८०३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच कोरोनामुळे जिल्ह्यात आतापर्यंत २९८ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

मृत्यू तीनशेच्या उंबऱ्यावर

हिंगोली जिल्ह्यात आज सहा जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. यामध्ये जवळा बाजार येथील ६५ वर्षीय महिला व असोला येथील ३८ वर्षीय युवकाचा जिल्हा रुग्णालयात, वसमत रुग्णालयात मुडी येथील ६५ वर्षीय पुरुष तर विरेगाव येथील ६७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. नवीन कोविड सेंटर हिंगोलीत औंढा तालुक्यातील उकळी व कळमनुरी तालुक्यातील सालेगाव येथील एकेका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला.