शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

बारावीची परीक्षा रद्द ; अन्य प्रवेश कसे होणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:22 IST

हिंगोली : दहावीनंतर बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या असल्या तरी यानंतर पदवी व अन्य प्रवेश कसे होणार, परीक्षेचे गुणदान कसे ...

हिंगोली : दहावीनंतर बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या असल्या तरी यानंतर पदवी व अन्य प्रवेश कसे होणार, परीक्षेचे गुणदान कसे होणार हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याने विद्यार्थ्यामध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. पालकांनाही पाल्याच्या भविष्याविषयी चिंतेत असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात कोरोना रूग्णाची संख्या झपाट्याने वाढत गेली. त्यामुळे यावर्षी शाळा , महाविद्यालये काही दिवस वगळता वर्षभर बंद ठेवावी लागली. रूग्ण संख्या वाढतच गेल्याने सुरवातीला पहिली ते आठवी व त्यानंतर नववी व अकरावीची परीक्षा रद्द करण्यात आली. दहावीची परीक्षाही शासनाने रद्द करून विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला. आता बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला. या निर्णयामुळे हुशार विद्यार्थ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. बारावीत चांगले गुण घेऊन अनेक विद्यार्थी मोठ्या शहरात शिक्षणासाठी जातात. मात्र आता बारावी परीक्षेचे गुणदान कसे होणार, पदवी व अन्य प्रवेश कसे होणार, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम झाल्याचे दिसत आहे. पालकही पाल्याच्या भवितव्याविषयी चिंतेत असून तज्ज्ञांशी चर्चा करून मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

बारावीनंतरच्या संधी

- विद्यार्थ्यांना बारावीनंतर कला, वाणिज्य व विज्ञान पदवी सोबतच अन्य विविध अभ्यासक्रमाच्या संधी उपलब्ध आहेत.

- या मध्ये विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेऊन एमबीबीएस, बीएचएमएस, बीएएमएस, बीपीटीएच, बीएस्सी नर्सिंग, बीयूएमएस आदी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेता येतो.

- पॅरामेडिकलमध्ये लॅबोरेटरी, रेडिओग्राफीक टेक्निशियन आदी अभ्यासक्रमास प्रवेश घेता येतो.

- बायोटेक्नॉलॉजी, औषधनिर्माणशास्त्र, अर्किटेक्चर, कृषी, पॅशन डिझायनिंग आदी अभ्यासक्रमासही प्रवेश घेता येतो.

प्राचार्य म्हणतात...

बारावीनंतरच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाबाबतच्या सूचना अद्याप मिळाल्या नाहीत. फार्मसीच्या डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी बारावीतील फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या तीन विषयातील गुणाच्या आधारे प्रवेश दिला जातो. तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी घेतली जाते. सीईटी लवकर घेतल्यास विद्यार्थ्यांच्या मनातील गोंधळ कमी होऊन प्रवेश प्रक्रीयाही सुरळीत होतील.

- दिनेश देशमुख, प्राचार्य, उत्तमराव देशमुख इंन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, हिंगोली

कोरोना संसर्ग लक्षात घेता पदवी अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविणे उचित ठरेल. जास्त विद्यार्थी आल्यास काही गुणांची ऑनलाईन परीक्षा घेऊन प्रवेश निश्चित करता येतील. आता तरी बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुणदान लवकर होणे महत्वाचे आहे.

- डॉ. बी.जी. गायकवाड, शिवाजी महाविद्यालय, हिंगोली

बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुणदान लवकर झाल्यास विद्यार्थ्यांना पुढील दिशा ठरविता येईल. यात वेळ जात असल्याने विद्यार्थ्यांचेही नुकसान होत आहे. पुढील अभ्यासक्रमाबाबतच्या प्रवेशाचे धोरणही निश्चित करावे.

- ज्ञानेश्वर मोरे, पालक

बारावीची परीक्षा वेळेवर होईल, यामुळे खूप अभ्यास केला होता. आता परीक्षा रद्द झाल्याने सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण होणार असले तरी गुणदान कसे होणार, पुढील प्रवेश कसे होणार याबाबत संभ्रम आहे. लवकर गुणदान व्हावे.

-दत्ता पोहनकर, विद्यार्थी

बारावीच्या निकालांसाठी गुणसूत्र काय ठरते याकडे लक्ष लागले आहे. गुणदानानंतरच कोणत्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा तो निर्णय घेता येईल. तसेच निकाल लागल्यावर तांत्रिक अडचण येऊ नयेत.

-गजानन बोरकर, विद्यार्थी

अकरावी, बारावीत खूप अभ्यास केला होता. त्याचे योग्य मू्ल्यमापन व्हावे. लवकर गुणदान झाले तर पुढील शैक्षणिक वर्षाचे नुकसान होणार नाही. तसेच पुढच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा लवकर व्हाव्यात.

- अश्विनी शिंदे, विद्यार्थीनी

जिल्ह्यातील बारावीतील एकूण विद्यार्थी - १४३४७

मुले -७९५०

मुली -६४३७