शहरं
Join us  
Trending Stories
1
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
2
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
3
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
4
१७ वर्षीय आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; पण फिफ्टी आड आला माफाका
5
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
6
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
7
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
8
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
9
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
10
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
11
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
12
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
13
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
14
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
15
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
16
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
18
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
19
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
20
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...

सिद्धेश्वर धरणाचे १२ दरवाजे ३ फुटाने उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:33 IST

हिंगोली : गत दोन-तीन दिवसांपासून पूर्णा नदीवरील ११ गावांमध्ये पाऊस पडत आहे. त्यामुळे सिद्धेश्वर धरण शंभर टक्के भरले आहे. ...

हिंगोली : गत दोन-तीन दिवसांपासून पूर्णा नदीवरील ११ गावांमध्ये पाऊस पडत आहे. त्यामुळे सिद्धेश्वर धरण शंभर टक्के भरले आहे. मंगळवारी धरणाचे ६ दरवाजे ३ फुटाने तर अन्य ६ दरवाजे २ फुटाने उघडले होते. बुधवारी मात्र एकूण बाराही दरवाजे ३ फुटाने उघडले आहेत. त्यामुळे पूर्णा नदीवरील खालच्या २२ गावांना सतर्क राहण्याचा इशारा धरण प्रशासनाने दिला आहे.

दोन-तीन दिवसांपासून रात्रीच्यावेळेला धरणाच्या वरती असलेल्या ११ गावांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात अधिकच वाढ होत आहे. आजमितीस धरणात जिवंत पाणीसाठा ८०.९६ द. ल. घ. मी. आहे. त्यामुळे धरण प्रशासनाने तहसीलदार कृष्णा कानगुले यांना कळवून २१ सप्टेंबर रोजी धरणाचे ६ दरवाजे ३ फुटाने तर ६ दरवाजे २ फुटाने उघडले होते. धरणातील पाणी लक्षात घेऊन २२ सप्टेंबर रोजी बाराही दरवाजे ३ फुटाने उघडले आहेत. मंगळवारी औंढा तालुक्यातील रुपूर, धार, अन्नखळी, पोटा (बु), पिरजाबाद, नांदखेडा, बेरुळा, परभणी जिल्ह्यातील जोडपरळी, सावंगी (खुर्द), संबर, पिंपळगाव, पांढरी, राहटी, उखळद, कानजापूर, कानडखेडा, सुखी, ममदापूर, कानेगाव, निळा, नंदगाव आदी नदीकाठावरील २२ गावांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

नदी काठावर कोणीही जाऊ नये; पशुधनाची काळजी घ्यावी

सिद्धेश्वर धरण शंभर टक्के भरल्यामुळे धरणाचे बारा दरवाजे तीन फुटाने उघडून पाणी पूर्णा नदीत सोडले आहे. यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तालुका प्रशासनालाही याबाबत कळवले आहे. नदीकाठावरील गावकऱ्यांनी काठावर जाऊ नये तसेच पशुधनालाही नदीकाठावर जाऊ देऊ नये, असेही आवाहन धरण प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

- भूषण कणोज, उपविभागीय अभियंता, पाटबंधारे विभाग