शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

तुम्ही व्यायाम सकाळी करता कि संध्याकाळी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 17:20 IST

तुम्ही कोणत्या वेळेला व्यायाम करता यावरुन ठरतं तुम्हाला ते किती फायदेशीर आहे ते!..

ठळक मुद्दे सकाळच्या वेळी केलेल्या व्यायामानं दुहेरी फायदा होतो.शरीराबरोबरच मनाच्या सशक्ततेसाठी सकाळचा व्यायाम फायदेशीर ठरतो.सकाळी केलेल्या व्यायामामुळे रात्रीची झोप व्यवस्थित होते. झोप गाढ लागते आणि व्यायामामुळे शरीरपेशींची जी झीज झालेली असते तीही व्यवस्थित भरुन निघते.

- मयूर पठाडेव्यायामचं महत्त्व का कोणाला सांगायला हवं? अशी एकही व्यक्ती नसेल, जिला व्यायामाचं महत्त्व माहीत नसेल... अर्थात यातही मोठी गंमत आहे. व्यायामाचं महत्त्व सगळ्यांना माहीत आहे, प्रत्येकानं व्यायाम केलाच पाहिजे, हेही सगळ्यांना कळतं, पण कसा? केव्हा? कधी? कोणता?.. हे विचारलं तर बºयाच जणांना यातील काहीही माहीत नसतं.अनेक जण चुकीचाच व्यायाम करतात आणि काही वेळेस त्याचा फायदा होण्याऐवजी तोटाही होऊ शकतो. त्यामुळे व्यायाम सुरू करण्यापूर्वी आपण कुठल्या कारणासाठी व्यायाम करतोय, आपलं ध्येय काय हे आधी ठरवायला हवं.. तयानंतरच व्यायामाला सुरुवात करायला हवी.पण त्याहीआधी अत्यंत बेसिक प्रश्न..व्यायाम कोणत्या वेळी करावा? सकाळी की संध्याकाळी? कोणत्या वेळेला व्यायाम करणं जास्त फायदेशीर आहे?संशोधकांनी यासंदर्भात रीतसर संशोधनच केलं. त्यात त्यांनी वेगवेगळे गट केले. सकाळी व्यायाम करणारे आणि संध्याकाळी व्यायाम करणारे. त्यानुसार त्यांना आढळून आलं, सकाळी व्यायाम केल्यानं जास्त फायदा होतो. पण याचा अर्थ इतर वेळी व्यायाम केल्यानं फायदा होतच नाही असं नाही. तुम्हाला सकाळची वेळ जर शक्यच नसेल तर दिवसातल्या कोणत्याही वेळी व्यायाम केला तरीही चालेल, पण व्यायाम मात्र करायलाच हवा.सकाळच्या वेळी केलेल्या व्यायामानं दुहेरी फायदा होतो. तुमच्या शरीराबरोबरच मनाच्या सशक्ततेसाठी सकाळचा व्यायाम फायदेशीर ठरतो. शिवाय सकाळी केलेल्या व्यायामामुळे तुमची रात्रीची झोप व्यवस्थित होते. झोप गाढ लागते आणि व्यायामामुळे शरीरपेशींची जी झीज झालेली असते तीही व्यवस्थित भरुन निघते.हो, पण संध्याकाळचा व्यायामही फायदेशीर आहेच, पण वेगळ्या कारणासाठी. त्याविषयी पाहूया पुढच्या भागात..