शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

25 मिनिटं ध्यान करा; डिमेन्शियाचा धोका टाळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 13:20 IST

माईण्डफुलनेस मेडिटेशन केली तर डिमेन्शिया, अल्झायमर या आजारांचा धोका टाळता येऊ शकतो.

ठळक मुद्देध्यान धारणा, श्वसनाचे प्रकार हे सारं मन शांत करण्यासाठी आवश्यक आहे, पण ते नियमित करायला हवं.

आपलं कम्प्युटर गरम होतं, हॅँग होतं तर ते आपण रिस्टार्ट करतो, त्यातल्या नको त्या फाईल्स उडवतो, स्पॅड डिलीट करतो पण आपल्या मेंदूचं काय? आपला मेंदू, मन सतत हजारो विचारांनी भरलेलं असतं. सगळा किचाट. त्यातून एक गोष्ट नीट होत नाही. अनेक गोष्टी आपण विसरतो, आणि काही तर मागेच पडतात. त्यातून अनेकांना नंतर डिमेन्शिया अर्थात विस्मरणाचा त्रास होऊ शकतो. पुढे अल्झायमर होण्याचीही शक्यता असते. त्यावर उपाय म्हणजे माइण्डफुलनेस मेडिटेशन.ध्यान धारणा केल्यानं मेंदूला विश्रांती आणि तजेला दोन्ही मिळू शकतो. त्यातून मेंदूची स्मरणशक्ती तर वाढतेच पण चित्त एकाग्र झाल्यानं काम पटापट आणि उत्तम होतात, त्याचा आनंद मिळतो असंही एक अभ्यास सांगतो.युनिव्हर्सटिी ऑफ वॉटरलू या विद्यापीठानं केलेल्या अभ्यासानुसार 25 मिनिटं माईण्डफुलनेस मेडिटेशन केल्यास आपल्या मेंदूचं विचारचक्र बदलतं. थिकिंग पॅटर्न बदलतात. इमोशलन रिस्पॉन्स आपण जे देतो ते बदलून योग्य रिस्पॉन्स देणं सुरु होतं. त्यातून डिमेन्शियासारखे आजारही टाळले जातात. मेंदूला कायम चित्त एकवटण्याची सवय लागते यासोबतच हठ योगचाही अभ्यास करण्याचा सल्ला हा अभ्यास देतो. त्यामुळे आपल्या मेंदूत साचलेला कचरा साफ करुन, मेंदूला तरतरी देणे, त्याची सजगता वाढवणे हे गरजेचे आहे.पाश्चिमात्य जगात सध्या या माइण्डफुलनेस मेडिटेशनची विशेष चर्चा आहे. सतत धावपळ, डोक्यात हजारो विचार, त्याचा ताण, शरीराच्या व्याधी, नातेसंबंध आणि यासह शेकडो गोष्टी एकाचवेळी करण्याची सवय यामुळे मेंदू शिणतो. आपण जी गोष्ट करतो त्या गोष्टीत आपलं लक्षच नसतं, आपलं चित्त भरकटलेलं असतं त्यातून जी कृती आपण करतो ती कशी केली याची संवेदनाही मेंदूर्पयत पोहचत नाही. त्यामुळे त्या कामात मेंदू नसतो, शिवाय त्याचा आनंदही मिळत नाही.हे सारं टाळायचं तर ध्यान करणं, ते शिकून घेणं, शांत बसणं, स्वतःवर लक्ष केंद्रित  करणं गरजेचं आहे.