शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
3
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
4
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
5
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
6
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
7
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
8
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
9
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
10
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
11
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
12
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
13
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
14
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
15
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
16
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
17
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
18
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार
19
स्वातंत्र्य दिनाच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा आणि द्या देशभक्तीच्या शुभेच्छा!
20
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...

एचआयव्हीग्रस्त रुग्णांच्या औषधी उपलब्ध होईना जळगावात रुग्णांची तक्रार : मुंबईहून औषधी साठा येण्यास विलंब

By admin | Updated: August 10, 2016 22:03 IST

जळगाव : जळगाव जिल्हा रुग्णालयातील एआरटी सेंटरमधून एडस् संसर्गितांना दिल्या जाणार्‍या औषधीचा तुटवडा असल्याने ही औषधी मिळत नसल्याची काही रुग्णांची तक्रार आहे. या संदर्भात अधिक माहिती घेतली असता मुंबई येथूनच औषधी उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे.

जळगाव : जळगाव जिल्हा रुग्णालयातील एआरटी सेंटरमधून एडस् संसर्गितांना दिल्या जाणार्‍या औषधीचा तुटवडा असल्याने ही औषधी मिळत नसल्याची काही रुग्णांची तक्रार आहे. या संदर्भात अधिक माहिती घेतली असता मुंबई येथूनच औषधी उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे.
जळगाव जिल्‘ातील एच.आय.व्ही. संसर्गित रुग्णांवर जिल्हा रुग्णालयातील एआरटी सेंटरमध्ये औषधोपचार केले जातात. यामध्ये काही रुग्णांना झिडोकडाईन लॅमकोडाईन अर्थात झेड.एल. ही औषधी दिली जाते. एकदा औषधी सुरू झाली की ती शेवटपर्यंत कायम व विनाखंडित द्यावी लागते. अन्यथा विषाणूंची संख्या वाढत जाते व रुग्णांचा जीव धोक्यात येतो. असे असले तरी औषधीचा तुटवडा भासून ती मिळत नसल्याचे काही रुग्णांनी सांगितले. तसेच बाहेर ही औषधी १३०० रुपयांना मिळते, त्यामुळे ते रुग्णांवर मोठा आर्थिक भार येतो तर काहिंना ते घेणेही शक्य होत नाही.
या बाबत अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी याचा इन्कार करीत सांगितले की, एआरटी सेंटरमधून रुग्णांना नियमित औषधी दिली जात आहे. कधी कधी औषधी येण्यास विलंब होतो, मात्र औषधी देणे बंद झाले असे नाही.

मुंबई येथूनच औषधी येईना....
केंद्र सरकारकडून राज्याला व मुंबई येथून जिल्हा रुग्णालयाला या औषधींचा पुरवठा केला जातो. यामध्ये कधी कधी अनियमितता येते. त्यामुळे रुग्णांना औषधी मिळत नाही. अशाच प्रकारे आतादेखील मुंबई येथून औषधी येत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहे. काही तांत्रिक कारणांमुळे औषधी उपलब्ध होत नसल्याचे जिल्हा रुग्णालयाच्यावतीने सांगण्यात आले.

७१७३ रुग्णांना औषधी
जळगाव जिल्‘ामध्ये ९५५३ एचआयव्ही रुग्णांची नोद आहे. यामध्ये ५०८५ पुरुष, ३८६१ स्त्रिया, १६ तृतीयपंथी, ३५१ पंधरा वर्षाच्या आतील मुले व २४० पंधरा वर्षांच्या आतील मुलींचा समावेश आहे. यापैकी ७१७३ उपचार घेणारे रुग्ण आहेत. यामध्ये ४०१६ पुरुष, २७६९ स्त्रिया, १० तृतीयपंथी, २३५ पंधरा वर्षाच्या आतील मुले व १४३ पंधरा वर्षांच्या आतील मुलींचा समावेश आहे.


एआरटी सेंटरमधून रुग्णांना नियमित औषधी दिली जातात. औषधांचा तुटवडा नाही. केवळ मुंबई येथून काही औषधी येण्यास विलंब झाला तर त्यासाठी थांबावे लागते.
-डॉ.किरण पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक.