शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.च्या कर्मचाऱ्यांना शिस्त लावणार

By admin | Updated: June 19, 2016 01:31 IST

अनेक वर्षे मुंबईसारख्या महानगरात काम केल्यानंतर राज्याच्या टोकावरील गोंदिया जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख, ...

सीईओ पुलकुंडवार : वर्षभरात जिल्हा हागणदारीमुक्त करणारमनोज ताजने गोंदियाअनेक वर्षे मुंबईसारख्या महानगरात काम केल्यानंतर राज्याच्या टोकावरील गोंदिया जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख, अर्थात मुख्य कार्यपालन अधिकारी म्हणून काही दिवसांपूर्वीच रूजू झालेले डॉ.सी.एल. पुलकुंडवार यांनी अवघ्या काही दिवसातच आपल्या कामाची छाप पाडली आहे. थेट आयएएस असलेल्या अभिषेक कृष्णा यांच्यानंतर मधल्या काळातील सीईओंकडून अपेक्षित कामकाज झाले नसले तरी डॉ.पुलकुंडवार यांनी जिल्हावासीयांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर त्यांची मुलाखत घेऊन त्यांच्या कामकाजाची दिशा जाणून घेण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला.जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून पहिल्यांदाच सूत्रे हाती घेतल्यानंतर समोर कोणती आव्हाने आहेत, यावर ते म्हणाले, मुळात या जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न कमी आहे. मानव विकास निर्देशांकही कमी आहे. त्यामुळे थोडी नैसर्गिक आपदा आली की लोक घाबरतात. कारण लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत. वास्तविक हा जिल्हा पाणी आणि नैसर्गिक सौंदर्याच्या बाबतीत संपन्न आहे. तरीही या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे दुबार पीक घेण्याचे प्रमाण फारच कमी आहे. शेतकऱ्यांना दुबारच नाही तर तिबार पीक घेण्यासाठीही संधी आहे. त्यासाठी त्यांना सिंचनाची पुरेशी व्यवस्था करून देऊन त्यांचा आर्थिक स्तर वाढविण्याचा प्रयत्न करणार आहे. शेतकऱ्यांनी केवळ धानपिकावर अवलंबून न राहता पाण्याचा योग्य वापर करून नगदी पिके घेतली पाहीजे. याशिवाय शेतीपुरक व्यवसायाकडेही वळले पाहीजे. शेतकरी मेळाव्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आपण पुढाकार घेणार आहे, असे डॉ.पुलकुंडवार म्हणाले.जुन्या तलावांना पुनरूज्जिवित करण्यासाठी लघुपाटबंधारे विभागाने ४१७ कामे हाती घेतली आहेत. त्यापैकी ४४ पूर्णही झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळेल. जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांसह अनेक अधिकाऱ्यांना शिस्त नाही. नागपूरवरून अप-डाऊन करणाऱ्या ‘विदर्भवीरां’ना कसे वठणीवर आणणार यावर सांगताना ते म्हणाले, ही बाब माझ्याही निदर्शनास आली आहे. त्यामुळे बायोमेट्रिक हजेरी पुन्हा सुरू करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाला सूचना केल्या आहेत. तोपर्यंत मी अनेक ठिकाणी सरप्राईज व्हिजीट सुरू केल्या आहेत. अचानक कोणत्या विभागात किंवा जिल्ह्यातील एखाद्या कार्यालयात भेट दिल्यानंतर तेथील हजेरी रजिस्टर तपासून गैरहजर असणाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देणे सुरू केले आहे.जिल्हा परिषदेच्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना, वाहनचालकांना ड्रेस कोड असताना कोणीही त्याचा वापर करीत नाही याकडे लक्ष वेधले असता त्यांनी याबाबतची नोटीस लगेच काढली जाईल, असे सांगून सर्व कर्मचारी, अधिकारी शिस्तीत वागतील असा विश्वास व्यक्त केला.शिक्षण विभागातील गोंधळाची स्थिती गेल्या काही महिन्यात सावरायला लागली असून लवकरच बिंदूनामावली निश्चित होईल. त्यानंतर शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांसह इतर सर्व विषय मार्गी लागतील, असे डॉ.पुलकुंडवार यांनी सांगितले. मात्र कर्मचारी-अधिकाऱ्यांनी कुठेही काम करण्याची तयारी ठेवावी. तशी मानसिकता सर्वांना तयार केली पाहीजे, असे आवाहन त्यांनी केले.