शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

जि.प.च्या कर्मचाऱ्यांना शिस्त लावणार

By admin | Updated: June 19, 2016 01:31 IST

अनेक वर्षे मुंबईसारख्या महानगरात काम केल्यानंतर राज्याच्या टोकावरील गोंदिया जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख, ...

सीईओ पुलकुंडवार : वर्षभरात जिल्हा हागणदारीमुक्त करणारमनोज ताजने गोंदियाअनेक वर्षे मुंबईसारख्या महानगरात काम केल्यानंतर राज्याच्या टोकावरील गोंदिया जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख, अर्थात मुख्य कार्यपालन अधिकारी म्हणून काही दिवसांपूर्वीच रूजू झालेले डॉ.सी.एल. पुलकुंडवार यांनी अवघ्या काही दिवसातच आपल्या कामाची छाप पाडली आहे. थेट आयएएस असलेल्या अभिषेक कृष्णा यांच्यानंतर मधल्या काळातील सीईओंकडून अपेक्षित कामकाज झाले नसले तरी डॉ.पुलकुंडवार यांनी जिल्हावासीयांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर त्यांची मुलाखत घेऊन त्यांच्या कामकाजाची दिशा जाणून घेण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला.जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून पहिल्यांदाच सूत्रे हाती घेतल्यानंतर समोर कोणती आव्हाने आहेत, यावर ते म्हणाले, मुळात या जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न कमी आहे. मानव विकास निर्देशांकही कमी आहे. त्यामुळे थोडी नैसर्गिक आपदा आली की लोक घाबरतात. कारण लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत. वास्तविक हा जिल्हा पाणी आणि नैसर्गिक सौंदर्याच्या बाबतीत संपन्न आहे. तरीही या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे दुबार पीक घेण्याचे प्रमाण फारच कमी आहे. शेतकऱ्यांना दुबारच नाही तर तिबार पीक घेण्यासाठीही संधी आहे. त्यासाठी त्यांना सिंचनाची पुरेशी व्यवस्था करून देऊन त्यांचा आर्थिक स्तर वाढविण्याचा प्रयत्न करणार आहे. शेतकऱ्यांनी केवळ धानपिकावर अवलंबून न राहता पाण्याचा योग्य वापर करून नगदी पिके घेतली पाहीजे. याशिवाय शेतीपुरक व्यवसायाकडेही वळले पाहीजे. शेतकरी मेळाव्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आपण पुढाकार घेणार आहे, असे डॉ.पुलकुंडवार म्हणाले.जुन्या तलावांना पुनरूज्जिवित करण्यासाठी लघुपाटबंधारे विभागाने ४१७ कामे हाती घेतली आहेत. त्यापैकी ४४ पूर्णही झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळेल. जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांसह अनेक अधिकाऱ्यांना शिस्त नाही. नागपूरवरून अप-डाऊन करणाऱ्या ‘विदर्भवीरां’ना कसे वठणीवर आणणार यावर सांगताना ते म्हणाले, ही बाब माझ्याही निदर्शनास आली आहे. त्यामुळे बायोमेट्रिक हजेरी पुन्हा सुरू करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाला सूचना केल्या आहेत. तोपर्यंत मी अनेक ठिकाणी सरप्राईज व्हिजीट सुरू केल्या आहेत. अचानक कोणत्या विभागात किंवा जिल्ह्यातील एखाद्या कार्यालयात भेट दिल्यानंतर तेथील हजेरी रजिस्टर तपासून गैरहजर असणाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देणे सुरू केले आहे.जिल्हा परिषदेच्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना, वाहनचालकांना ड्रेस कोड असताना कोणीही त्याचा वापर करीत नाही याकडे लक्ष वेधले असता त्यांनी याबाबतची नोटीस लगेच काढली जाईल, असे सांगून सर्व कर्मचारी, अधिकारी शिस्तीत वागतील असा विश्वास व्यक्त केला.शिक्षण विभागातील गोंधळाची स्थिती गेल्या काही महिन्यात सावरायला लागली असून लवकरच बिंदूनामावली निश्चित होईल. त्यानंतर शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांसह इतर सर्व विषय मार्गी लागतील, असे डॉ.पुलकुंडवार यांनी सांगितले. मात्र कर्मचारी-अधिकाऱ्यांनी कुठेही काम करण्याची तयारी ठेवावी. तशी मानसिकता सर्वांना तयार केली पाहीजे, असे आवाहन त्यांनी केले.