शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

जि.प. शाळांवरील पालकांचा विश्वास व्यर्थ जाणार नाही

By admin | Updated: April 9, 2016 01:51 IST

संपूर्ण महाराष्ट्रात गोंदिया जिल्ह्यातून ‘गुढी पाडवा, शाळा प्रवेश वाढवा’ या उपक्रमांतर्गत बहुसंख्य पालकांनी जिल्हा परिषद शाळांमध्ये ....

पी.जी. कटरे : ‘गुढीपाडवा, शाळा प्रवेश वाढवा’ कार्यक्रम गोरेगाव : संपूर्ण महाराष्ट्रात गोंदिया जिल्ह्यातून ‘गुढी पाडवा, शाळा प्रवेश वाढवा’ या उपक्रमांतर्गत बहुसंख्य पालकांनी जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश घेऊन विश्वास दर्शविला. त्यांचा विश्वास व्यर्थ जाणार नाही. कारण उच्च दर्जा व गुणवत्ता आता जिल्हा परिषदेच्या शाळांत आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद शिक्षण सभापती पी.जी. कटरे यांनी केले. जवळील ग्राम हिरडामाली येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने शुक्रवारी आयोजित तालुकास्तरीय कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उद्घाटन शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सभापती दिलीप चौधरी, गटशिक्षणाधिकारी यशवंत कावळे, सरपंच कुंता बघेले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेश कुंभलकर, अतुल कटरे, विस्तार अधिकारी टी.बी. भेंडारकर, एस.बी. खोब्रागडे, विषयतज्ज्ञ गोविंद ठाकरे, सुनील ठाकूर, जी.जे. बिसेन उपस्थित होते. जि.प.च्या शिक्षण विभागातर्फे गुढीपाडव्याच्या पावन मुहूर्तावर शाळा प्रवेश वाढविण्याचा अभिनव उपक्रम जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांच्या प्रेरणेतून हाती घेण्यात आला असून यामुळे विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यात एकाच दिवशी २० हजार विद्यार्थी प्रवेशीत झाले असून प्रचंड उत्साह ग्रामीण भागात दिसून येत आहे. आज शिक्षणाची गुढी जि.प. शाळेत उभारली असून ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळणारच अशी ग्वाही कार्यक्रमाचे उद्घाटक शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी दिली. पंचायत समिती सभापती चौधरी यांनी, जिल्हा परिषद शाळेचा बदललेला दर्जा पाहून खूप आनंद होत असल्याचे मत व्यक्त केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक वाय.एस. भगत यांनी मांडले. संचालन राहुल कळंबे यांनी केले. आभार वीरेंद्र पटले यांनी मानले. कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्राम पंचायत सदस्य, शिक्षक अनमोल उके, विकास कोहाड, साधना पारधी, प्रियंका भरणे यांचेसह शाळेतील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)विद्यार्थ्यांचे साहित्य देऊन स्वागत गुढीपाडवा, शाळा प्रवेश वाढवा’ या कार्यक्रमांतर्गत हिरडामाली शाळेतील केजी वन व वर्ग १ ला व नव्याने दाखल विद्यार्थ्यांना टॅब, फुगे, चॉकलेट, मनोरंजनात्मक शैक्षणिक पुस्तके व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे उत्साहपूर्वक स्वागत करण्यात आले. भरतीसपात्र १०० टक्के विद्यार्थी गावातील शाळेतच दाखल झाले असून कोणताही विद्यार्थी बाहेरगावी जाणार नाही, अशी भूमिका पालकांनी घेऊन जिल्हा परिषद शाळेवर विश्वास दर्शविला. बाहेर गावातील विद्यार्थी सुध्दा हिरडामाली शाळेत प्रवेश घेत आहेत.