शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

जि.प. शाळांवरील पालकांचा विश्वास व्यर्थ जाणार नाही

By admin | Updated: April 9, 2016 01:51 IST

संपूर्ण महाराष्ट्रात गोंदिया जिल्ह्यातून ‘गुढी पाडवा, शाळा प्रवेश वाढवा’ या उपक्रमांतर्गत बहुसंख्य पालकांनी जिल्हा परिषद शाळांमध्ये ....

पी.जी. कटरे : ‘गुढीपाडवा, शाळा प्रवेश वाढवा’ कार्यक्रम गोरेगाव : संपूर्ण महाराष्ट्रात गोंदिया जिल्ह्यातून ‘गुढी पाडवा, शाळा प्रवेश वाढवा’ या उपक्रमांतर्गत बहुसंख्य पालकांनी जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश घेऊन विश्वास दर्शविला. त्यांचा विश्वास व्यर्थ जाणार नाही. कारण उच्च दर्जा व गुणवत्ता आता जिल्हा परिषदेच्या शाळांत आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद शिक्षण सभापती पी.जी. कटरे यांनी केले. जवळील ग्राम हिरडामाली येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने शुक्रवारी आयोजित तालुकास्तरीय कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उद्घाटन शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सभापती दिलीप चौधरी, गटशिक्षणाधिकारी यशवंत कावळे, सरपंच कुंता बघेले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेश कुंभलकर, अतुल कटरे, विस्तार अधिकारी टी.बी. भेंडारकर, एस.बी. खोब्रागडे, विषयतज्ज्ञ गोविंद ठाकरे, सुनील ठाकूर, जी.जे. बिसेन उपस्थित होते. जि.प.च्या शिक्षण विभागातर्फे गुढीपाडव्याच्या पावन मुहूर्तावर शाळा प्रवेश वाढविण्याचा अभिनव उपक्रम जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांच्या प्रेरणेतून हाती घेण्यात आला असून यामुळे विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यात एकाच दिवशी २० हजार विद्यार्थी प्रवेशीत झाले असून प्रचंड उत्साह ग्रामीण भागात दिसून येत आहे. आज शिक्षणाची गुढी जि.प. शाळेत उभारली असून ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळणारच अशी ग्वाही कार्यक्रमाचे उद्घाटक शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी दिली. पंचायत समिती सभापती चौधरी यांनी, जिल्हा परिषद शाळेचा बदललेला दर्जा पाहून खूप आनंद होत असल्याचे मत व्यक्त केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक वाय.एस. भगत यांनी मांडले. संचालन राहुल कळंबे यांनी केले. आभार वीरेंद्र पटले यांनी मानले. कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्राम पंचायत सदस्य, शिक्षक अनमोल उके, विकास कोहाड, साधना पारधी, प्रियंका भरणे यांचेसह शाळेतील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)विद्यार्थ्यांचे साहित्य देऊन स्वागत गुढीपाडवा, शाळा प्रवेश वाढवा’ या कार्यक्रमांतर्गत हिरडामाली शाळेतील केजी वन व वर्ग १ ला व नव्याने दाखल विद्यार्थ्यांना टॅब, फुगे, चॉकलेट, मनोरंजनात्मक शैक्षणिक पुस्तके व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे उत्साहपूर्वक स्वागत करण्यात आले. भरतीसपात्र १०० टक्के विद्यार्थी गावातील शाळेतच दाखल झाले असून कोणताही विद्यार्थी बाहेरगावी जाणार नाही, अशी भूमिका पालकांनी घेऊन जिल्हा परिषद शाळेवर विश्वास दर्शविला. बाहेर गावातील विद्यार्थी सुध्दा हिरडामाली शाळेत प्रवेश घेत आहेत.