शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. शाळेतील दुसरीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी

By admin | Updated: August 18, 2014 23:34 IST

शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे सर्वांगिण विकास साधण्याच्या उद्देशाने शाळेत शिक्षकांच्या पुरेशा संख्येसह इतर सुविधा असणे शासनाने आवश्यक केले आहे. परंतु रावणवाडी जि.प. शाळेत वर्ग

रावणवाडी : शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे सर्वांगिण विकास साधण्याच्या उद्देशाने शाळेत शिक्षकांच्या पुरेशा संख्येसह इतर सुविधा असणे शासनाने आवश्यक केले आहे. परंतु रावणवाडी जि.प. शाळेत वर्ग दुसरीच्या विद्यार्थ्यांना महिला परिचर शिक्षण देत असल्याने विद्यार्थ्यांना किती दर्जेदार शिक्षण मिळत असेल, असा प्रश्न सर्व पालकांनी उपस्थित केला आहे. विद्यार्थ्यांच्या पटसंख्यनुसार वर्गानुसार शिक्षकांची संख्या, शालेय इमारतीमध्ये वर्गखोल्या, कार्यालय, शिक्षक कक्ष, मुला-मुलींकरिता वेगवेगळे मुत्रीघर, सुरक्षित व योग्य पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मध्यान्ह भोजन तयार करण्यासाठी स्वयंपाक घर, खेळण्याचे मैदान, शाळेच्या आवारात सुरक्षा भिंत, खेळ साहित्य आदी साहित्य शाळेत निर्माण करून देणे बंधनकारक आहे. मात्र इमारत वगळता शाळेत सुविधांचा अभाव आहे. इयत्ता दुसरीमध्य शालेय सत्र सुरू झाल्यापासूनच शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली नाही. शाळांवर लक्ष ठेवून पूर्ण व्यवस्था करवून घेणे केंद्रप्रमुखांची जबाबदारी असते. विद्यार्थ्यांना हवे असलेले योग्य शिक्षण मिळत आहे किंवा नाही याची जाणीव असणे गरजेचे आहे. परंतु केंद्रप्रमुखांच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवून त्यांचे भविष्य अंधकारमय होत आहे. सदर शाळेत एकूण विद्यार्थी संख्या १८० आहे. वर्ग पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी दरदिवशी शाळेत उपस्थित राहतात. शिक्षण विभागाने या शाळेत एकूण आठ शिक्षकांची नियुक्ती केली आहे. त्यापैकी एक मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत. तर एक शिक्षक गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे आॅन लाईन कामानिमित्त जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कार्यालयात सतत ये-जा करतात. त्यामुळे सात वर्गांच्या शिक्षकांचा भार सहा शिक्षकांवर आला आहे. तर वर्ग दुसरा शिक्षकाविनाच चालत आहे. इयत्ता दुसरी सांभाळण्याची जबाबदारी शाळेतील महिला परिचरावर सोपविण्यात आली आहे. शाळा सुरू होवून दोन महिन्यांचा कालावधी निघून गेला. मात्र वर्ग दुसरीसाठी शिक्षकाची नियुक्तीच करण्यात आली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या झालेल्या शैक्षणिक नुकसानीचे उत्तरदायित्व गट शिक्षणाधिकाऱ्यांचे आहे. या प्रकारामुळे पालकांत प्रशासनाबद्दल कमालीचा रोष निर्माण झाला आहे. सध्या राज्यात राष्ट्रीय शिक्षा अभियानाची अंमलबजावणी सुरू आहे. या कायद्यानुसार ज्या शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी असेल अशा शाळा बंद होण्याची भीती आहे. मात्र या शाळांत विद्यार्थी शिक्षणासाठी येवूनही हवे तसे शिक्षण मिळत नसल्यामुळे जि.प. शाळांमध्ये विद्यार्थ्यांची ओहोटी लागल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या दिवसेंदिवस रोडावत चालल्याने ग्रामीण भागातील मराठी शाळांची अस्मिताच आता धोक्यात आली आहे. शिक्षण विभागातील अधिकारी व पदाधिकाऱ्यांमुळेच मराठी शाळांची अशी विदारक परिस्थिती निर्माण झाल्याचे पालकांकडून बोलले जात आहे. (वार्ताहर)