शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

जि.प. शाळेतील दुसरीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी

By admin | Updated: August 18, 2014 23:34 IST

शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे सर्वांगिण विकास साधण्याच्या उद्देशाने शाळेत शिक्षकांच्या पुरेशा संख्येसह इतर सुविधा असणे शासनाने आवश्यक केले आहे. परंतु रावणवाडी जि.प. शाळेत वर्ग

रावणवाडी : शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे सर्वांगिण विकास साधण्याच्या उद्देशाने शाळेत शिक्षकांच्या पुरेशा संख्येसह इतर सुविधा असणे शासनाने आवश्यक केले आहे. परंतु रावणवाडी जि.प. शाळेत वर्ग दुसरीच्या विद्यार्थ्यांना महिला परिचर शिक्षण देत असल्याने विद्यार्थ्यांना किती दर्जेदार शिक्षण मिळत असेल, असा प्रश्न सर्व पालकांनी उपस्थित केला आहे. विद्यार्थ्यांच्या पटसंख्यनुसार वर्गानुसार शिक्षकांची संख्या, शालेय इमारतीमध्ये वर्गखोल्या, कार्यालय, शिक्षक कक्ष, मुला-मुलींकरिता वेगवेगळे मुत्रीघर, सुरक्षित व योग्य पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मध्यान्ह भोजन तयार करण्यासाठी स्वयंपाक घर, खेळण्याचे मैदान, शाळेच्या आवारात सुरक्षा भिंत, खेळ साहित्य आदी साहित्य शाळेत निर्माण करून देणे बंधनकारक आहे. मात्र इमारत वगळता शाळेत सुविधांचा अभाव आहे. इयत्ता दुसरीमध्य शालेय सत्र सुरू झाल्यापासूनच शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली नाही. शाळांवर लक्ष ठेवून पूर्ण व्यवस्था करवून घेणे केंद्रप्रमुखांची जबाबदारी असते. विद्यार्थ्यांना हवे असलेले योग्य शिक्षण मिळत आहे किंवा नाही याची जाणीव असणे गरजेचे आहे. परंतु केंद्रप्रमुखांच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवून त्यांचे भविष्य अंधकारमय होत आहे. सदर शाळेत एकूण विद्यार्थी संख्या १८० आहे. वर्ग पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी दरदिवशी शाळेत उपस्थित राहतात. शिक्षण विभागाने या शाळेत एकूण आठ शिक्षकांची नियुक्ती केली आहे. त्यापैकी एक मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत. तर एक शिक्षक गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे आॅन लाईन कामानिमित्त जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कार्यालयात सतत ये-जा करतात. त्यामुळे सात वर्गांच्या शिक्षकांचा भार सहा शिक्षकांवर आला आहे. तर वर्ग दुसरा शिक्षकाविनाच चालत आहे. इयत्ता दुसरी सांभाळण्याची जबाबदारी शाळेतील महिला परिचरावर सोपविण्यात आली आहे. शाळा सुरू होवून दोन महिन्यांचा कालावधी निघून गेला. मात्र वर्ग दुसरीसाठी शिक्षकाची नियुक्तीच करण्यात आली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या झालेल्या शैक्षणिक नुकसानीचे उत्तरदायित्व गट शिक्षणाधिकाऱ्यांचे आहे. या प्रकारामुळे पालकांत प्रशासनाबद्दल कमालीचा रोष निर्माण झाला आहे. सध्या राज्यात राष्ट्रीय शिक्षा अभियानाची अंमलबजावणी सुरू आहे. या कायद्यानुसार ज्या शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी असेल अशा शाळा बंद होण्याची भीती आहे. मात्र या शाळांत विद्यार्थी शिक्षणासाठी येवूनही हवे तसे शिक्षण मिळत नसल्यामुळे जि.प. शाळांमध्ये विद्यार्थ्यांची ओहोटी लागल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या दिवसेंदिवस रोडावत चालल्याने ग्रामीण भागातील मराठी शाळांची अस्मिताच आता धोक्यात आली आहे. शिक्षण विभागातील अधिकारी व पदाधिकाऱ्यांमुळेच मराठी शाळांची अशी विदारक परिस्थिती निर्माण झाल्याचे पालकांकडून बोलले जात आहे. (वार्ताहर)