शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

लावलेल्या निर्बधांवर कारवाई शून्यच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:30 IST

गोंदिया : राज्यात कोरोनाचा भडका उडत असताना राज्य शासनाकडून आता नव्याने निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याअंतर्गत ठरवून दिल्याप्रमाणे ...

गोंदिया : राज्यात कोरोनाचा भडका उडत असताना राज्य शासनाकडून आता नव्याने निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याअंतर्गत ठरवून दिल्याप्रमाणे नियमांचे उल्लंघन होत असल्यास दंड व कारवाईचे अधिकार यंत्रणेला देण्यात आले आहेत. मात्र, जिल्ह्यातील हॉटस्पाट असलेल्या गोंदिया शहरातील चित्र बघता या निर्बंधावर कारवाई शून्यच दिसून येत आहे. परिणामी सर्व काही पूर्वीप्रमाणे बिनधास्त सुरू असून, यामुळेच कोरोनाला फोफावण्यासाठी पूरक वातावरण मिळत आहे.

मागील वर्षी कोरोना देशात शिरला व सर्वाधिक कहर महाराष्ट्रात केला होता. राज्याची अवघी व्यवस्थाच या कोरोनाने हेलावून सोडली होती. त्यात आता पुन्हा कोरोना फोफावत असून, यातही महाराष्ट्र राज्य यंदाही अव्वलच ठरत आहे. त्यानंतरही मात्र राज्य शासनाकडून निर्बंधांवरच हा गंभीर विषय हाताळला जात असल्याचे दिसत आहे. राज्यात कोरोनाचा भडका उडाला असतानाच आता जिल्ह्यातही कोरोना आपले डोके वर काढत आहे. कधी १-२ वर आलेली बाधितांची संख्या आता ५० च्या घरात पोहोचली आहे. यावर आता जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा काही राज्य शासनाने लावलेल्या निर्बंधांवर एक आदेश काढला आहे, तसेच ठरवून देण्यात आलेल्या बाबींचे उल्लंघन होत असल्यास कारवाईचे अधिकार शासकीय यंत्रणेला दिले आहेत. मात्र, शासकीय यंत्रणेकडून अशात कारवायाच होत नसल्याने नागरिकही परिस्थितीचे गांभीर्य समजून घेण्यास तयार नाहीत. दररोज रुग्णसंख्या वाढत आहे. लग्नसोहळे त्याच धडाक्यात आटोपले जात आहेत. व्यवसायी न नागरिक कुणीही मास्कचा वापर करताना दिसत नाहीत. शिवाय शारीरिक अंतराचे पालन होत नसल्याचे उघडपणे दिसत असूनही जबाबदार अधिकारी मैदानात उतरून कारवाई करताना दिसून येत नाही.

--------------------------------

गोंदिया तालुक्यात परिस्थिती कठीण

कोरोनाचा प्रकोप सुरू झाल्यापासूनच गोंदिया शहर व तालुका हॉटस्पाट आहे. आजही जिल्ह्यातील २७८ बाधितांपैकी अर्ध्यापेक्षा जास्त बाधित १७५ बाधित गोंदिया तालुक्यातील आहेत. अशात तालुक्यात अधिकाधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. मात्र, तसे काहीच दिसत नसून नागरिक कुणाचेही ऐकण्यास तयार नसतानाच त्यावर अंकुश बसविण्यासाठी यंत्रणाही पुढाकार घेताना दिसत नाही.

--------------------------

आता तरी मैदानात उतरण्याची गरज

नागपूरमध्ये कोरोनाचा दररोज स्फोट होताना दिसत असून, शेजारच्या भंडारा जिल्ह्यातही आता परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे. अशात जिल्ह्यातील बाधितांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. शासन व प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन केले जात आहे. मात्र, आवाहनावरून नागरिक वागले असते तर मागील वर्षीच कोरोना देशात पसरला नसता. अशात कारवायांशिवाय नागरिकांत गांभीर्य येणार नसल्याने यंत्रणेने आता मैदानात उतरण्याची गरज असल्याचे खुद्द सुज्ञ नागरिक बोलत आहेत.