शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
3
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
5
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
6
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
7
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
8
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
9
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
10
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
11
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
12
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
13
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
14
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
15
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
16
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
17
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
18
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
19
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
20
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात

यावर्षीही पावसाची टक्केवारी कमीच

By admin | Updated: May 23, 2015 01:41 IST

गेल्यावर्षी जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ७२ टक्के पाऊस बरसला. यावर्षी राज्यात सरासरी ९३ टक्के पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

योग्य नियोजन करा : कृषी विभागाने दिला शेतकऱ्यांना सल्लागोंदिया : गेल्यावर्षी जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ७२ टक्के पाऊस बरसला. यावर्षी राज्यात सरासरी ९३ टक्के पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे जिल्ह्यात यावर्षीही कमी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावधपणे पिकांची लागवड करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी कृषी विभागाने १.९५ लाख हेक्टरमध्ये विविध पिकांची लागवड करण्याचे नियोजन केले आहे. भात पिकाची लागवड केली जात असल्याने विविध वाणाचे ४४ हजार क्विंटल भात बियाणे तालुकानिहाय विक्री केंद्रावर उपलब्ध करवून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महाबीजकडून तालुकानिहाय बियाणे पुरवठा करण्यात येणार आहे. गोंदिया तालुक्यात - चार हजार ५०० क्विंटल, तिरोडा- चार हजार क्विंटल, आमगाव- चार हजार क्विंटल, गोरेगांव- तीन हजार ५०० क्विंटल, सडक-अर्जुनी- चार हजार ५०० क्विंटल, अर्जुनी-मोरगाव- चार हजार ५०० क्विंटल, सालेकसा- दोन हजार क्विंटल, देवरी- तीन हजार क्विंटल असे एकूण ३० हजार क्विंटल भात बियाणे पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे खाजगी कंपन्यांकडून १४ हजार क्विंटल पुरवठाचे नियोजन असून एकूण ४४ हजार क्विंटल भात बियाणे उपलब्ध होणार आहे. खरीप हंगामासाठी शासनाकडून ५८ हजार १०० मेट्रीक टन रासायनिक खतांचे आवंटन मंजूर करण्यात आले असून तालुकानिहाय कृषी केंद्रावर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. बियाणे, रासायनिक खते व किटकनाशके योग्य दर्जाचे उपलब्ध व्हावे म्हणून जास्तीत जास्त नमूने काढून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्याचे निर्देश सबंधितांना देण्यात आले आहे. शेतकऱ्यांना कृषी निविष्ठाबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी अधिकारी पंचायत समितीकडे संपर्क साधून तक्रार नोंदविण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. खरेदी केलेल्या कृषी निविष्ठाची पक्की पावती प्राप्त करून घ्यावी, बॅग/कंटेनरवर छापील किमतीपेक्षा जास्त रक्कम अदा करू नये. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरील यांनी केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)श्री पद्धत, रूपांतरित व पेरिव पद्धतीचा वापर कराहवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षीची पावसाचे प्रमाण कमी असून ते अनियमित असण्याची शक्यता आहे. पावसात खंड पडल्यास भात रोपवाटिकेतील रोपे नष्ट होण्याचे प्रमाण वाढते. अशावेळी शेतकऱ्यांनी रोपवाटिकेच्या रोपांची लागवड एकाचवेळी न करता ती काही अंतर देऊन (टप्प्याटप्प्याने) करावी. बियाण्यांची कमतरता भासल्यास स्वत:कडीला बियाणे श्री पद्धतीद्वारे रोपे तयार करून आपात्कालीन पेरणीसाठी शिल्लक ठेवावे. रोवणीस उशिर झाल्यास श्री पद्धतीने जास्त लागवड करावी. रूपांतरित श्री पद्धतीने धान पिकांची लागवड करावी. श्री पद्धतीने लागवड करताना हेक्टरी ५ किलो बियाण्यांची आवश्यकता असून १२ ते १५ दिवसांची रोपे लागवडीकरिता वापरता येतील, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील यांनी कळविले.