शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
3
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
4
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
5
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
6
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
7
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
8
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
9
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
10
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
11
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
12
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
13
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
14
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
15
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
16
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
17
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
18
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
19
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
20
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?

गेल्यावर्षीपेक्षा स्थिती बिकट

By admin | Updated: September 25, 2015 02:15 IST

यावर्षी अनियमित पावसामुळे पिकांची स्थिती बिकट झाली आहे. धानाला पोषक ठरेल असा योग्य वेळी आणि पुरक प्रमाणात पाऊस आला नसल्यामुळे धानाचे अपेक्षित उत्पन्न होणार किंवा नाही ...

शासनाचा अहवाल : जिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी ८१ पैसेगोंदिया : यावर्षी अनियमित पावसामुळे पिकांची स्थिती बिकट झाली आहे. धानाला पोषक ठरेल असा योग्य वेळी आणि पुरक प्रमाणात पाऊस आला नसल्यामुळे धानाचे अपेक्षित उत्पन्न होणार किंवा नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. आता जिल्हा प्रशासनाने पाठविलेल्या अहवालानुसार नजरअंदाज पैसेवारी ८१ पैसे दाखविली आहे. गेल्यावर्षी हीच नजरअंदाज पैसेवारी १०८ होती. त्यामुळे गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी स्थिती वाईट असल्याचे स्पष्ट झाले आहे.जिल्ह्यात खरीप हंगामात १ लाख ९७ हजार हेक्टरवर पिकांची लागवड होते. त्यात मुख्य पिक असलेल्या धानावरच शेतकऱ्यांचे वार्षिक बजेट अवलंबून असते. बारमाही ओलिताची सोय नसल्यामुळे मोजक्याच शेतजमिनीवर रबी हंगामात धानाची लागवड होते. अशा परिस्थिती शेतकऱ्यांची संपूर्ण मदार खरीप हंगामावरच असताना यावर्षी या हंगामात अपेक्षित उत्पन्न होण्याची शक्यता धुसर झाली आहे.१ जून ते ३० सप्टेंबरपर्यंत १३४० मिमी पाऊस पडतो. मात्र यावर्षी हा कालावधी संपत आला असताना जेमतेम १००० मिमी पाऊस पडला आहे. त्यातच हा पाऊस योग्य वेळी आला नसल्यामुळे पाण्याअभावी पिकांची वाढ पाहीजे तशी झाली नाही. परिणामी धान किती भरणार आणि पिक कसे येणार याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. गेल्यावर्षीसुद्धा पाऊस कमी होता. मात्र शेवटी-शेवटी पावसाने बरीच कसर भरून काढली होती. गेल्यावर्षी नजरअंदाज पैसेवारी १०८ पैसे असताना यावर्षी ती ८१ पैशापर्यंत खाली घसरली आहे. त्यामुळे गेल्यावर्षीपेक्षा उत्पन्नात घट येणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)पैसेवारी पुन्हा काढणारशासनाच्या आदेशानुसार आतापर्यंत ५० टक्केच्या आत पैसेवारी असणारी गावे दुष्काळग्रस्त समजली जात होती. मात्र शासनाने यावर्षी पैसेवारी ६७ पैशापेक्षा कमी असणारी गावे दुष्काळसदृश समजून मदतीस पात्र राहतील, असा आदेश काढला होता. मात्र आता तो आदेश मागे घेतला असून पुन्हा ५० पैशाचा निकष लावण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे जाहीर केलेली पैसेवारी बदलण्याची शक्यता असून पुन्हा ३० सप्टेंबरला नवीन पैसेवारी जाहीर केली जाणार आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्याची पैसेवारी सर्वाधिकयावर्षीच्या नजरअंदाज पैसेवारीवर एक नजर टाकल्यास अर्जुनी मोरगाव तालुक्याची पैसेवारी सर्वाधिक, अर्थात ९३ पैसे आली आहे. तर सर्वात कमी ६७ पैसे देवरी तालुक्याची पैसेवारी आहे. तिरोडा तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाला असतानाही तेथील पैसेवारी ८३ पैसे आहे, हे विशेष. अर्जुनी मोरगाव तालुक्यात शेतकऱ्यांना सिंचनाची सोय असल्यामुळे तेथील पिकांची स्थिती चांगली असण्याची शक्यता आहे.देवरीत सर्वात बिकट परिस्थितीशासनाच्या नवीन निकषानुसार ६८ पैशापेक्षा कमी पैसेवारी असणारी गावे दुष्काळसदृश समजली जात होती. त्यानुसार जिल्ह्यात ६८ गावांची नजरअंदाज पैसेवारी ६७ पेक्षा कमी दाखविण्यात आली आहे. त्यात सर्वाधिक ६६ गावे देवरी तालुक्यातील आहेत. मात्र आता हा मदतीबाबतचा निकष पुन्हा बदलविला जात आहे.