शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

रोहयोच्या कामाने केली शेतकर्‍यांची फजिती

By admin | Updated: May 23, 2014 23:58 IST

पीक तोंडाशी येते तेव्हा ऐनवेळी शेतकर्‍यांवर कोणते न कोणते संकट येत असते. गेल्या दोन वर्षापासून निसर्गाने शेतकर्‍यांसह सामान्य नागरिकांना सातत्याने समस्यांनी ग्रासले आहे.

काचेवानी : पीक तोंडाशी येते तेव्हा ऐनवेळी शेतकर्‍यांवर कोणते न कोणते संकट येत असते. गेल्या दोन वर्षापासून निसर्गाने शेतकर्‍यांसह सामान्य नागरिकांना सातत्याने समस्यांनी ग्रासले आहे. धान पीक तोंडावर येत असताना शेतकर्‍यांच्या तोंडाचे पाणी सुकायला लागते. अशीच परिस्थिती यावेळी दिसून येत आहे. यावर्षी सगळीकडे उन्हाळी धानाचे पीक भरपूर प्रमाणात घेतले जात आहे. धानाचे पीक यायला लागले, धान कापणीला आले, परंतु यावेळी परिसरात मग्रारोहयोची कामे सुरु असल्याने आणि मजूर मिळत नसल्याने शेतकरी चिंतातुर झालेले आहेत. धानाची कापणी कशी करावी, मळणी कशी करावी, या समस्या निर्माण झाल्या आहेत. दोन दिवसानंतर रोहिणी नक्षत्र लागणार आहे. त्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात मृग नक्षत्र लागणार आहे. या नक्षत्रामध्ये पावसाळा सुरु झाल्याचे चिन्ह असतात. जेम-तेम धान कापणी सुरु झाली असून मळणीकरिता आठ दिवस लागतील. त्यामुळे रोहयोची कामे आठ दिवसाकरिता बंद करण्याची कार्यवाही संबंधित ग्रामपंचायतने करणे गरजेचे झाले आहे. रोहयोचे ज्या ठिकाणी कामे आहेत आणि त्या ठिकाणी उन्हाळी धान पीक घेतले आहे, अशा गावातील सुरु असलेली रोहयोची कामे बंद करण्यात यावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. निसर्ग तर कुणाचे ऐकून घेत नाही. परंतु आपण सर्व समजून-ऐकून घेणारे आहोत. त्यामुळे वर्तमान समस्येला आणि नुकसानीला पाहता शेतकर्‍यांच्या कष्टाची आणि अन्नाची नासाडी थांबविण्याकरिता काही दिवसांसाठी रोहयोची कामे थांबविण्यात यावी, अशी शेतकर्‍यांची मागणी आता जोर धरत आहे. गेल्या वर्षी मे महिन्याच्या शेवटी आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने हजेरी लावली होती. त्याचा परिणाम असा झाला की, शेतकरी उन्हाळी धान पिके कापू शकले नाही. ज्यांनी कापले त्यांनी मळणी केली नाही, पावसाच्या पाण्यामुळे शेतातील धानपीक खराब झाले होते. काही शेतकर्‍यांनी त्या खराब झालेल्या धान पि काचीसुद्धा मळणी केली. असे करता-करता आलेले पीक मातीमोल झाले. यावर्षीची परिस्थिती अशीच दिसून येत आहे. शेतकर्‍यांच्या हिताकरिता रोजगार हमी योजनेची कामे बंद करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. (वार्ताहर)