शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

रोहयोच्या कामाने केली शेतकर्‍यांची फजिती

By admin | Updated: May 23, 2014 23:58 IST

पीक तोंडाशी येते तेव्हा ऐनवेळी शेतकर्‍यांवर कोणते न कोणते संकट येत असते. गेल्या दोन वर्षापासून निसर्गाने शेतकर्‍यांसह सामान्य नागरिकांना सातत्याने समस्यांनी ग्रासले आहे.

काचेवानी : पीक तोंडाशी येते तेव्हा ऐनवेळी शेतकर्‍यांवर कोणते न कोणते संकट येत असते. गेल्या दोन वर्षापासून निसर्गाने शेतकर्‍यांसह सामान्य नागरिकांना सातत्याने समस्यांनी ग्रासले आहे. धान पीक तोंडावर येत असताना शेतकर्‍यांच्या तोंडाचे पाणी सुकायला लागते. अशीच परिस्थिती यावेळी दिसून येत आहे. यावर्षी सगळीकडे उन्हाळी धानाचे पीक भरपूर प्रमाणात घेतले जात आहे. धानाचे पीक यायला लागले, धान कापणीला आले, परंतु यावेळी परिसरात मग्रारोहयोची कामे सुरु असल्याने आणि मजूर मिळत नसल्याने शेतकरी चिंतातुर झालेले आहेत. धानाची कापणी कशी करावी, मळणी कशी करावी, या समस्या निर्माण झाल्या आहेत. दोन दिवसानंतर रोहिणी नक्षत्र लागणार आहे. त्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात मृग नक्षत्र लागणार आहे. या नक्षत्रामध्ये पावसाळा सुरु झाल्याचे चिन्ह असतात. जेम-तेम धान कापणी सुरु झाली असून मळणीकरिता आठ दिवस लागतील. त्यामुळे रोहयोची कामे आठ दिवसाकरिता बंद करण्याची कार्यवाही संबंधित ग्रामपंचायतने करणे गरजेचे झाले आहे. रोहयोचे ज्या ठिकाणी कामे आहेत आणि त्या ठिकाणी उन्हाळी धान पीक घेतले आहे, अशा गावातील सुरु असलेली रोहयोची कामे बंद करण्यात यावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. निसर्ग तर कुणाचे ऐकून घेत नाही. परंतु आपण सर्व समजून-ऐकून घेणारे आहोत. त्यामुळे वर्तमान समस्येला आणि नुकसानीला पाहता शेतकर्‍यांच्या कष्टाची आणि अन्नाची नासाडी थांबविण्याकरिता काही दिवसांसाठी रोहयोची कामे थांबविण्यात यावी, अशी शेतकर्‍यांची मागणी आता जोर धरत आहे. गेल्या वर्षी मे महिन्याच्या शेवटी आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने हजेरी लावली होती. त्याचा परिणाम असा झाला की, शेतकरी उन्हाळी धान पिके कापू शकले नाही. ज्यांनी कापले त्यांनी मळणी केली नाही, पावसाच्या पाण्यामुळे शेतातील धानपीक खराब झाले होते. काही शेतकर्‍यांनी त्या खराब झालेल्या धान पि काचीसुद्धा मळणी केली. असे करता-करता आलेले पीक मातीमोल झाले. यावर्षीची परिस्थिती अशीच दिसून येत आहे. शेतकर्‍यांच्या हिताकरिता रोजगार हमी योजनेची कामे बंद करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. (वार्ताहर)