शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

घर कोसळून एक महिला जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:54 IST

नवेगावबांध : झोपडीवजा जीर्ण झालेले घर कोसळून त्याखाली दबून महिला जखमी झाली. येथे शनिवारी (दि. २०) मध्यरात्री १.३० वाजता ...

नवेगावबांध : झोपडीवजा जीर्ण झालेले घर कोसळून त्याखाली दबून महिला जखमी झाली. येथे शनिवारी (दि. २०) मध्यरात्री १.३० वाजता दरम्यान ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र, मागील तीन वर्षांपासून घरकुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या कुंभरे कुटुंबीयांना घरकुल न मिळाल्याने ही योजना कितपत यशस्वी ठरत आहे हे यातून दिसून आले.

येथील प्रभाग क्रमांक-६ मधील रहिवासी वच्छला गोपीचंद कुंभरे (वय ६५) या दोन मुले, सून, दोन नात अशा सहाजणांसह आपल्या झोपडीवजा तुटक्या-फुटक्या घरात राहतात. घरातील सर्व गाढ झोपेत असताना शनिवारी रात्री १.३० वाजतादरम्यान त्यांचे घरच कोसळले. घराच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या कुंभरे कुटुंबीयांनी एकच आरडाओरड केल्याने शेजारी धावून आले व त्यांनी ढिगाऱ्याखाली दबलेल्या कुंभरे कुटुंबीयांना सुखरूप बाहेर काढले. यात वच्‍छलाबाईंची सून उर्मिला हिच्या डोळ्याला, हाताला व पायाला इजा झाली आहे. त्यांना रात्रीच ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

कुंभरे कुटुंबीय मागील तीन वर्षांपासून घरकुलच्या प्रतीक्षेत असून, यामुळेच ते तुटक्या-फुटक्या झोपडीवजा घरात वास्तव्य करीत आहेत. असे कितीतरी कुटुंबीय आजही अशाच घरांमध्ये आहेत. अधूनमधून अवकाळी पावसाचा धोका आहेच. आम्ही अडाणी असल्यामुळे कागदपत्रांचा पाठपुरावा करू शकलो नाही, त्यामुळे आम्हाला तीन वर्षांपासून अजूनही घरकुल मिळाले नाही, अशी खंत वच्‍छलाबाई यांनी व्यक्त केली आहे. तर प्रभाग क्रमांक-६ मधील नागरिकांनी अत्यंत गरजू लोकांना घरकुल मिळण्यास विलंब होत असल्यामुळे संताप व्यक्त केला आहे. ग्रामपंचायतीच्यावतीने १०० अत्यंत गरज असलेल्या लोकांची यादी पाठविली आहे. पूर्वी संगणीकृत झालेल्या (अ) यादीतील लाभार्थ्यांना घरकुल मिळणार. त्यानंतर ब, क, ड यादीतील गरजू लाभार्थ्यांना घरकुल मिळतील अशी प्रशासकीय व्यवस्था आहे. अत्यंत गरजूंना ताबडतोब घरकुल देता येत नाही असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात येते. कुंभरे कुटुंबीयांची राहण्याची व्यवस्था ग्रामपंचायत तातडीने करेल असे सरपंच अनिरुद्ध शहारे यांनी सांगितले आहे.

------------------------

देव तारी त्याला कोण मारी

कुंभरे यांचे घर पडल्याने त्याखाली घरातील सर्वच सदस्य दबले गेले होते. यात उर्मिला यांना मारही लागला आहे. मात्र, या ढिगाऱ्यात दबलेली साडेतीन महिन्यांची पूर्वी व अडीच वर्षांची तृप्ती या वच्‍छलाबाईंच्या दोन्ही नातींना काहीच झाले नाही व त्या सुखरूप बाहेर निघाल्या. नशीब बलवत्तर म्हणूनच या दुर्घटनेतून त्या सुखरूप बचावल्या असून, देव तारी त्याला कोण मारी या म्हणीची प्रचिती या घटनेतून पुन्हा एकदा दिसून आली आहे.