शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भिंतीखाली दबून महिला ठार ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:36 IST

सुकडी-डाकराम : सकाळी बरसलेल्या दमदार पावसामुळे पडलेल्या घराच्या भिंतीखाली दबून महिला ठार झाली. खडकी-डोंगरगाव येथे गुरुवारी (दि.९) सकाळी ६.३० ...

सुकडी-डाकराम : सकाळी बरसलेल्या दमदार पावसामुळे पडलेल्या घराच्या भिंतीखाली दबून महिला ठार झाली. खडकी-डोंगरगाव येथे गुरुवारी (दि.९) सकाळी ६.३० दरम्यान ही घटना घडली. मृत महिलेचे नाव धनवंता रवींद्र भलावी (३९) असे आहे.

प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी (दि.९) सकाळी ६.३० दरम्यान रवींद्र भलावी, धनवंता भलावी व मुलगी घरी होते. धनवंता दुसऱ्यांच्या मजुरीवर जाण्यासाठी स्वयंपाक करीत असताना जोरदार पावसाला सुरुवात झाली व त्यांच्या अंगावर घराची भिंत कोसळली. रवींद्र यांनी आरडाओरडा करून गावकऱ्यांना बोलविले असता गावकऱ्यांनी टिकास, सब्बलच्या मदतीने भिंत फोडून धनवंत यांना बाहेर काढले व येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र त्यांना तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर धनवंता यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. घटनेची माहिती तलाठी राऊत तसेच तिरोडा पोलिसांना देण्यात आली. तलाठी राऊत यांनी मोका पंचनामा करून तहसीलदारांकडे सोपविला. धनवंता यांच्या परिवाराला शासनाकडून १० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

-----------------------------

अन्यथा रवींद्रही आले असते तावडीत

सकाळी कारले कापत बसलेल्या धनवंता यांच्या जवळच रवींद्र बसले होते. मात्र धनवंता यांनी रवींद्रला डाळीचा गंज आणण्यास सांगितल्याने ते गंज आणण्यासाठी दुसऱ्या खोलीत गेले. तेवढ्यातच भिंत पडली व धनवंतासाठी काळ ठरली. जर रवींद्र गंज आणण्यासाठी उठून गेले नसते तर तेही भिंतीखाली दबले असते. तसेच त्यांच्या दोन मुली मामाच्या गावी गेल्या असून एक मुलगी घरात होती.