शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

खतांची दरवाढ त्वरित मागे घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:30 IST

गोंदिया : खरीप हंगाम अगदी तोंडावर येऊन ठेपला असतानाच आंतरराष्ट्रीय बाजारात खतांसाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाचे भाव वाढल्याचे कारण ...

गोंदिया : खरीप हंगाम अगदी तोंडावर येऊन ठेपला असतानाच आंतरराष्ट्रीय बाजारात खतांसाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाचे भाव वाढल्याचे कारण सांगून सर्वच कंपन्यांनी खतांचा किमतीत मोठी वाढ केली आहे. या दरवाढीमुळे याआधी १२०० रु. मिळणारी डीएपी खताची बॅग आता शेतकऱ्यांना १९०० रुपयांना घ्यावी लागणार आहे. यामुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. ही दरवाढ त्वरित मागे घेण्याची मागणी मनसेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली.

खतांच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. १०:२६:२६ खतांचा दर ११७५ रु. वरून १७७५ रु. झाला आहे. तसेच २०:२०:०:१३ चा दर ९७५ रु. वरून १३५० रु. व १२:३२:१६ चा दर ११८५ वरून १८०० रु. झाला आहे. यामुळे आता एवढे महागडे खत कसे विकत घ्यायचे व पेरणी कशी करायची, असा प्रश्न देशभरातील शेतकऱ्यांना पडला आहे. केंद्र सरकारने रासायनिक खतांची दरवाढ करण्यास मान्यता दिली नसल्याचे स्पष्ट केलेले असतानाही खत कंपन्यांनी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी दरवाढ लागू केली आहे. अगोदरच वाढलेली महागाई, कोरोनाचे संकट व लाॅकडाऊनमुळे शेतमालाची विक्री व्यवस्था कोलमडून पडलेली असल्याने शेतकरी परेशान आहे. अशा परिस्थितीत हा खतांच्या दरवाढीचा प्रकार म्हणजे दुष्काळात तेरावा महिना असाच आहे. केंद्र सरकारने खतांवरील अनुदानात वाढ करून खतदर नियंत्रणात ठेवणे गरजेचे होते. परंतु, केंद्र सरकारने मागच्या वर्षीचेच अनुदान कायम ठेवून खतांच्या दरवाढीला एक प्रकारे हातभार लावण्याचेच काम केले आहे. केंद्र सरकारला खरोखरच शेतकऱ्यांना मदत करायची असेल, तर त्वरित खतांची दरवाढ रद्द करण्यात यावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष मनीष चौरागडे, हेमंत लिल्हारे, जिल्हा उपाध्यक्ष मुकेश मिश्रा, तालुकाध्यक्ष सुरेश ठाकरे, शहराध्यक्ष राजेश नागोसे, शहर उपाध्यक्ष क्षितिज वैद्य, रजत बागडे यांनी जिल्हाधिकारी गोंदिया यांना ई-मेलद्वारे पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे.

.....

केंद्राने पाठ थोपटून घेऊ नये

एका बाजूला खतांचे दर मोठ्या प्रमाणावर वाढवून केंद्र सरकार शेतकऱ्यांची लूट करत आहे. तर, दुसरीकडे पंतप्रधान किसान सन्मान निधीचा १९ हजार कोटींचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करून केंद्र सरकार पाट थोपटून घेत आहे. परंतु, सद्य:परिस्थितीत शेतकऱ्यांना पीएम-किसान निधीचे पैसे पेरणीच्या कामाला तेवढे उपयोगी पडणार नाहीत.