शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
3
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
4
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
5
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
7
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
8
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
9
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
10
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
11
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
12
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
13
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
14
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
15
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
16
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
18
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
19
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
20
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री

बाक्टी येथे वादळी पावसाचा तडाखा

By admin | Updated: May 30, 2016 01:37 IST

जवळच्या बाक्टी-चान्ना येथे शुक्रवार (दि.२७) दुपारी ३ वाजता दरम्यान आलेल्या वादळ वाऱ्यासह पावसाच्या तडाख्याने गावातील राहत्या...

घरांची पडझड : त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी बोंडगावदेवी : जवळच्या बाक्टी-चान्ना येथे शुक्रवार (दि.२७) दुपारी ३ वाजता दरम्यान आलेल्या वादळ वाऱ्यासह पावसाच्या तडाख्याने गावातील राहत्या घरांची व गोठ्यांची पडझड मोठ्या प्रमाणात झाली. गावातील नुकसानग्रस्तांना प्रशासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सरपंच जितेंद्र शेंडे यांनी केली आहे.यावर्षी बाक्टी गावामध्ये सातत्याने निसर्गाचा प्रकोप वाढलेला दिसून येत आहे. शुक्रवारला दुपारी ३ वाजतापासून वादळ वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. अचानक आलेल्या वादळाच्या रौद्र रुपाने गावातील मोठ्या प्रामणात घरावरील गावठी कवेलू व फाट्यांचे नुकसान झाले. कौलारू घरांचे जास्तीत जास्त नुकसान झाले. वारंवार होणाऱ्या वादळाच्या नुकसानीमुळे बाक्टीवासीयांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. शुक्रवारी वादळवाऱ्यासह पावसाने हिवराज राजगिरे, अंजना चवरे, प्रेमलाल भोयर, मीरा मेश्राम, ग्यासराम राजगिरे, गोदु भोयर, उमराव बोरकर, ताराचंद वझे, महादेव भोयर, सुखदेव सांगोळे, बारकू बोरकर, रंजित मेश्राम आदिंच्या घरावरील कवेलू, फाट्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घरावरील कवेलू रस्ताभर पसरले. सिमेंटचे पत्रे उडून फुटले. शेतामधील झाडे मुळासकट कोसळले. विजेच्या तारा तुटून गेल्याने गावकऱ्यांना अंधारात रात्र काढावी लागली. बातमी लिहिपर्यंत गावामध्ये विजेचा पुरवठा सुरू झालेला नव्हता. मागील महिन्यात ५ तारखेलासुद्धा आलेल्या जबरदस्त चक्रीवादळाने अख्या गावकऱ्यांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्या नुकसानग्रस्तांना अजूनपावेतो आर्थिक सहाय्य मिळाले नाही. पैशाची जमवाजमव करुन त्यावेळी महागडे कवेलू घेऊन घरांची दुरुस्ती केली होती. एक महिना होत नाही तर पुन्हा वादळाने कहर केला. झालेल्या नुकसानीमुळे बाक्टी गावकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. दुष्काळात तेरावा महिना अशी म्हणण्याची वेळ आलेली दिसत आहे. वादळ वाऱ्यांने क्षतीग्रस्त झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करुन प्रशासनाने ताबडतोब आर्थिक मदत करावी, अशी मागणी सरपंच जितेंद्र शेंडे यांनी केली आहे. येत्या काही दिवसांत पावसाला सुरुवात होणार आहे. घरांची दुरुस्ती करण्यासाठी शासनाने बाक्टी ग्रामवासीयांना त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी माजी सरपंच सुभाष मेश्राम यांनी केली आहे. (वार्ताहर)