शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानित बियाणे मला मिळणार का रे भाऊ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : खरीप हंगाम तोंडावर असून, शेतकरी खते, बियाण्यांची जुळवाजुळव करण्याच्या कामात व्यस्त आहेत. कृषी विभागाने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

गोंदिया : खरीप हंगाम तोंडावर असून, शेतकरी खते, बियाण्यांची जुळवाजुळव करण्याच्या कामात व्यस्त आहेत. कृषी विभागाने शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत अनुदानावर बियाणे उपलब्ध करुन देण्यास सुरुवात केली आहे. यासाठी कृषी विभागाने महाडीबीटी पोर्टल सुरु केले असून, त्यावर बियाण्यांसह यंत्रसामुग्री, कृषिविषयक साहित्य तसेच कृषी विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली जाते. यापूर्वी शेतकऱ्यांना ‘महाबीज’च्या माध्यमातून अनुदानावर बियाणे उपलब्ध करुन दिले जात होते. मात्र, यावर्षीपासून महाडीबीटी पोर्टलवर अर्ज मागवून त्यांना महाबीजच्या बियाणे विक्रेत्यांकडून अनुदानावर बियाणे उपलब्ध करुन दिले जात आहे. तसेच अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा केली जाणार आहे. अनुदानित बियाण्यांसाठी जिल्ह्यातील दीड हजारांवर शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केले आहेत. या शेतकऱ्यांना अनुदानावरील बियाण्यांसाठी त्यांनी केलेले अर्ज पात्र ठरल्याचा संदेश (एसएमएस) पाठवला जाणार आहे. एसएमएस आलेल्या शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करुन दिले जाणार आहे. यात पीक प्रात्यक्षिकासाठी शंभर टक्के तर प्रमाणित बियाणे प्रतिक्विंटल अनुदानावर उपलब्ध करुन दिले जाणार आहे.

...............

जिल्ह्यातून २५ हजारांवर अर्ज

- महाडीबीटी पोर्टलवर बी-बियाण्यासह विविध कृषिविषयक योजनांसाठी अर्ज केले जातात. कृषी विभागाच्या २१६ योजनांची माहिती या पोर्टलवर उपलब्ध आहे.

- जिल्ह्यातील विविध कृषिविषयक योजनांसाठी जिल्ह्यातील २५ हजारांवर शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. यात अनुदानावरील बियाणे तसेच अन्य कृषिविषयक योजनांचा समावेश आहे.

- अनुदानावरील बियाण्यांसाठी दीड हजारांवर शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. यात पीक प्रात्यक्षिकधारक शेतकऱ्यांना शंभर टक्के तर इतर शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल अनुदानावर बियाणे उपलब्ध करुन दिले जाणार आहे.

- ज्या शेतकऱ्यांची अनुदानावरील बियाण्यासाठी निवड करण्यात आली आहे, त्या शेतकऱ्यांना एसएमएस पाठवला जातो.

...................

कोणत्या योजनेसाठी किती अर्ज

- एकात्मिक फलोत्पादन विकास योजना : ५६४३

- कृषी अभियांत्रिकी योजना : १२३४९

- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान : ३४२३

- एकात्मिक फलोत्पादन योजना : २३४३

....................

एसएमएस आला तरच मिळणार अनुदानावरील बियाणे

- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावरील बियाणे प्राप्त करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो.

- ऑनलाईन अर्ज केल्यानंतर शेतकऱ्यांना अर्ज या संकेतस्थळावर सबमिट झाल्याचा एसएमएस येतो.

- या ‘एसएमएस’वर अनुदानावर बी-बियाणे उपलब्ध होणार किंवा नाही, याची माहिती मिळते. त्यानंतर रजिस्ट्रेशन केलेल्या नंबरवरुन अनुदानावरील बियाणे महाबीजच्या अधिकृत विक्रेत्याकडून उपलब्ध करुन दिले जाते.

............

सर्वाधिक अर्ज यांत्रिकी शेतीसाठी

शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती शेतकऱ्यांना मिळावी, या योजना राबवताना त्यात पारदर्शकता राहावी यासाठी महाडीबीटी पोर्टल सुरु करण्यात आले. या पोर्टलवर विविध कृषिविषयक योजनांसाठी शेतकरी अर्ज करतात. यात सर्वाधिक अर्ज हे यांत्रिकी शेतीसाठी प्राप्त होतात. शेतकऱ्यांनी यांत्रिकी योजनेसाठी १२,३४९ अर्ज केले आहेत.

.............

ग्रामीण भागात नेटवर्कची समस्या

कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी जरी महाडीबीटी पोर्टल सुरु केले असले, तरी ग्रामीण भागात नेटवर्कची समस्या गंभीर आहे. बरेचदा मोबाईलला नेटवर्क नसल्याने शेतकऱ्यांना एसएमएस मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागते. यावर काहीतरी उपाय करण्याची गरज आहे.

............

अर्ज केलेले शेतकरी म्हणतात...

आधी कृषिविषयक योजनांची माहिती आणि अर्ज करण्यासाठी कृषी विभागाच्या कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत होत्या. यामुळे वेळ आणि श्रमसुध्दा वाया जात होते. मात्र, आता महाडीबीटी पोर्टलमुळे या सर्व गोष्टी करण्याची गरज नसून, महाडीेबीटी पोर्टलच्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येत असून, ते अधिक सुलभ झाले आहे. त्यामुळे हे पाेर्टल शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.

- पंढरी पाल, शेतकरी

.......

अनुदानावरील बियाणे असो की कृषिविषयक अवजारे अनुदानावर मिळण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केल्यानंतर दहा ते पंधरा दिवसात अर्जावर कार्यवाही होऊन अवजारे उपलब्ध करुन दिली जातात. यामुळे शेतकऱ्यांना वारंवार कृषी विभाग कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत नसून, शेतकऱ्यांना होणार त्रास कमी झाला आहे. शिवाय योजनेत पारदर्शकता आली आहे.

- देविदास बिसेन, शेतकरी.

..............