शहरं
Join us  
Trending Stories
1
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
2
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
3
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
4
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
5
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
6
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
7
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
8
"काँग्रेसला हव्या त्या जागा द्यायला राज ठाकरेही तयार होते"; संजय राऊतांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
9
बँकेची कामे वेळेत उरका! जानेवारीत १६ दिवस 'बँक हॉलिडे'; पाहा सुट्ट्यांचे संपूर्ण कॅलेंडर
10
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
11
थाटामाटात अर्ज, पण दुसऱ्याच दिवशी माघार; कृष्णराज महाडिक यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा
12
BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!
13
अलर्ट! पैसे दुप्पट करण्याची हाव; एक मेसेज अन् गमावली आयुष्यभराची कमाई, करू नका 'ही' चूक
14
लग्नानंतर नवऱ्याने काम करु दिलं नाही तर...? रिंकू राजगुरु म्हणाली, "तो हिसकावून घेत असेल..."
15
Nashik Municipal Corporation Election : भाजपत एकमेकांवर मात; शिंदेसेनेला राष्ट्रवादीची साथ; गिरीश महाजन नाशकात तळ ठोकणार
16
सेना, मनसे एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी दुसरीकडे; महाविकास आघाडीत फाटाफुटीची शक्यता
17
"रहमान डकैतचे पाकिस्तानवर उपकार आहेत...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर गँगस्टरच्या वकील मित्राची प्रतिक्रिया, म्हणाला...
18
"तो त्याच्याच धुंदीत असतो...", 'दृश्यम ३'मधून अक्षय खन्नाच्या एक्झिटनंतर त्याच्या विचित्र स्वभावाबाबत अरशद वारसीचा खुलासा
19
Travel : काश्मीर फिरायला जायचं प्लॅनिंग करताय? मग 'या' ५ चुका टाळा, नाहीतर खिशाला लागेल कात्री!
20
तिकीट कापले? काळजी नको, प्रमोशन मिळेल; गिरीश महाजनांचे बंडखोरी रोखण्यासाठी आश्वासन
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांना धान विक्री केल्यानंतर हमीभाव खरेदी केंद्र सुरू करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:29 IST

इसापूर : अर्जुनी-मोर तालुक्यात यावर्षीसुद्धा इटियाडोह धरणाच्या सिंचनाने रबी हंगामात शेतकऱ्यांनी आपल्या शेतात धान पिकाची लागवड केली आहे. जानेवारी ...

इसापूर : अर्जुनी-मोर तालुक्यात यावर्षीसुद्धा इटियाडोह धरणाच्या सिंचनाने रबी हंगामात शेतकऱ्यांनी आपल्या शेतात धान पिकाची लागवड केली आहे. जानेवारी महिन्यात रोवणी केलेल्या धान पिकाचे उत्पादन मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून निघण्याला सुरुवात झाली आहे. मात्र, अजूनपर्यंत शासकीय हमीभाव केंद्र सुरू न झाल्याने व धान ठेवायचे कुठे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. परिणामी, अल्पदाराने खासगी व्यापाऱ्यांना धान विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

सध्या धान खरेदी केंद्रबाबत मी मारल्यासारखे करतो तू रडल्यासारखे कर, अशी अवस्था आहे. अन्न नागरी पुरवठा विभागाचे सचिव विलास पाटील हे गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन गेले. यावेळी जिल्ह्यातील राइस मिल मालकांनी धानाची उचल करणे व भरडाई करून तांदूळ शासन जमा करण्याबाबतच्या सध्याच्या स्थितीबाबत व शासन धोरणाबाबत चर्चा केली. यावेळी मिलमालक व व्यापारी उपस्थित यावेळी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील मिल मालकांच्या मागण्या व त्यासंदर्भात शासनाची भूमिका याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान धानाची उचल व भरडाई ३१ मेअखेरपर्यंत होऊन रबी हंगामातील धान खरेदीसाठी गोदाम उपलब्ध होईल, असे आश्वासनसुद्धा देण्यात आले. मात्र, तोपर्यंत शेतकऱ्यांनी धानाची विक्री करायची नाही का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

............

शेतकऱ्यांचा माल व्यापाऱ्यांच्या दारात

रबी हंगामातील धान बाजारपेठेत विक्री येण्यास सुरुवात झाली तर अद्यापही शासकीय धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाला २५६८ रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. मात्र, धान खरेदी सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना गरजेपोटी खासगी व्यापाऱ्यांना अल्प दाराने धान विकण्याची वेळ आली आहे.

............

शासनाच्या उदासीन धोरणाचा फटका

शासनाने मागील चार महिन्यांपासून धान भरडाईवर राइस मिलर्सशी चर्चा करून तोडगा काढला नाही. परिणामी, रबी हंगामातील खरेदी केलेला धान ठेवायचा कुठे, या प्रश्नावरून खरेदी करण्यास विलंब केला जात आहे. शासनाने यावर वेळीच तोडगा काढला असता तर शेतकऱ्यांवर ही वेळ आलीच नसती, असा सूर शेतकऱ्यांमध्ये आहे.