शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
3
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
4
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
5
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
6
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
7
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
8
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
9
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
10
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
11
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
12
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
13
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
14
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
15
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
16
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
17
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
18
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
19
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
20
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया

व्यापाऱ्यांना धान विक्री केल्यानंतर हमीभाव खरेदी केंद्र सुरू करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:29 IST

इसापूर : अर्जुनी-मोर तालुक्यात यावर्षीसुद्धा इटियाडोह धरणाच्या सिंचनाने रबी हंगामात शेतकऱ्यांनी आपल्या शेतात धान पिकाची लागवड केली आहे. जानेवारी ...

इसापूर : अर्जुनी-मोर तालुक्यात यावर्षीसुद्धा इटियाडोह धरणाच्या सिंचनाने रबी हंगामात शेतकऱ्यांनी आपल्या शेतात धान पिकाची लागवड केली आहे. जानेवारी महिन्यात रोवणी केलेल्या धान पिकाचे उत्पादन मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून निघण्याला सुरुवात झाली आहे. मात्र, अजूनपर्यंत शासकीय हमीभाव केंद्र सुरू न झाल्याने व धान ठेवायचे कुठे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. परिणामी, अल्पदाराने खासगी व्यापाऱ्यांना धान विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

सध्या धान खरेदी केंद्रबाबत मी मारल्यासारखे करतो तू रडल्यासारखे कर, अशी अवस्था आहे. अन्न नागरी पुरवठा विभागाचे सचिव विलास पाटील हे गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन गेले. यावेळी जिल्ह्यातील राइस मिल मालकांनी धानाची उचल करणे व भरडाई करून तांदूळ शासन जमा करण्याबाबतच्या सध्याच्या स्थितीबाबत व शासन धोरणाबाबत चर्चा केली. यावेळी मिलमालक व व्यापारी उपस्थित यावेळी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील मिल मालकांच्या मागण्या व त्यासंदर्भात शासनाची भूमिका याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान धानाची उचल व भरडाई ३१ मेअखेरपर्यंत होऊन रबी हंगामातील धान खरेदीसाठी गोदाम उपलब्ध होईल, असे आश्वासनसुद्धा देण्यात आले. मात्र, तोपर्यंत शेतकऱ्यांनी धानाची विक्री करायची नाही का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

............

शेतकऱ्यांचा माल व्यापाऱ्यांच्या दारात

रबी हंगामातील धान बाजारपेठेत विक्री येण्यास सुरुवात झाली तर अद्यापही शासकीय धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाला २५६८ रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. मात्र, धान खरेदी सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना गरजेपोटी खासगी व्यापाऱ्यांना अल्प दाराने धान विकण्याची वेळ आली आहे.

............

शासनाच्या उदासीन धोरणाचा फटका

शासनाने मागील चार महिन्यांपासून धान भरडाईवर राइस मिलर्सशी चर्चा करून तोडगा काढला नाही. परिणामी, रबी हंगामातील खरेदी केलेला धान ठेवायचा कुठे, या प्रश्नावरून खरेदी करण्यास विलंब केला जात आहे. शासनाने यावर वेळीच तोडगा काढला असता तर शेतकऱ्यांवर ही वेळ आलीच नसती, असा सूर शेतकऱ्यांमध्ये आहे.