शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांना धान विक्री केल्यानंतर हमीभाव खरेदी केंद्र सुरू करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:29 IST

इसापूर : अर्जुनी-मोर तालुक्यात यावर्षीसुद्धा इटियाडोह धरणाच्या सिंचनाने रबी हंगामात शेतकऱ्यांनी आपल्या शेतात धान पिकाची लागवड केली आहे. जानेवारी ...

इसापूर : अर्जुनी-मोर तालुक्यात यावर्षीसुद्धा इटियाडोह धरणाच्या सिंचनाने रबी हंगामात शेतकऱ्यांनी आपल्या शेतात धान पिकाची लागवड केली आहे. जानेवारी महिन्यात रोवणी केलेल्या धान पिकाचे उत्पादन मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून निघण्याला सुरुवात झाली आहे. मात्र, अजूनपर्यंत शासकीय हमीभाव केंद्र सुरू न झाल्याने व धान ठेवायचे कुठे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. परिणामी, अल्पदाराने खासगी व्यापाऱ्यांना धान विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

सध्या धान खरेदी केंद्रबाबत मी मारल्यासारखे करतो तू रडल्यासारखे कर, अशी अवस्था आहे. अन्न नागरी पुरवठा विभागाचे सचिव विलास पाटील हे गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन गेले. यावेळी जिल्ह्यातील राइस मिल मालकांनी धानाची उचल करणे व भरडाई करून तांदूळ शासन जमा करण्याबाबतच्या सध्याच्या स्थितीबाबत व शासन धोरणाबाबत चर्चा केली. यावेळी मिलमालक व व्यापारी उपस्थित यावेळी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील मिल मालकांच्या मागण्या व त्यासंदर्भात शासनाची भूमिका याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान धानाची उचल व भरडाई ३१ मेअखेरपर्यंत होऊन रबी हंगामातील धान खरेदीसाठी गोदाम उपलब्ध होईल, असे आश्वासनसुद्धा देण्यात आले. मात्र, तोपर्यंत शेतकऱ्यांनी धानाची विक्री करायची नाही का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

............

शेतकऱ्यांचा माल व्यापाऱ्यांच्या दारात

रबी हंगामातील धान बाजारपेठेत विक्री येण्यास सुरुवात झाली तर अद्यापही शासकीय धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाला २५६८ रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. मात्र, धान खरेदी सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना गरजेपोटी खासगी व्यापाऱ्यांना अल्प दाराने धान विकण्याची वेळ आली आहे.

............

शासनाच्या उदासीन धोरणाचा फटका

शासनाने मागील चार महिन्यांपासून धान भरडाईवर राइस मिलर्सशी चर्चा करून तोडगा काढला नाही. परिणामी, रबी हंगामातील खरेदी केलेला धान ठेवायचा कुठे, या प्रश्नावरून खरेदी करण्यास विलंब केला जात आहे. शासनाने यावर वेळीच तोडगा काढला असता तर शेतकऱ्यांवर ही वेळ आलीच नसती, असा सूर शेतकऱ्यांमध्ये आहे.