शहरं
Join us  
Trending Stories
1
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
2
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
3
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
4
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
5
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
6
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
7
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
8
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
9
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
10
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
11
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
12
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
13
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
14
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
15
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
16
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
17
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
18
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
19
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
20
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?

‘त्या’ ३८ गावातील तेंदूपत्ता लिलाव होणार ई-टेंडरिंगने

By admin | Updated: March 26, 2017 00:49 IST

जिल्ह्यातील वनहक्क मंजूर असलेल्या ३८ गावांमधील तेंदूपत्ता संकलनासाठी लिलाव प्रक्रिया न करता एकाच कंत्राटदाराला ठेका देण्याचा ग्रामसभांनी घेतलेला निर्णय....

ग्रामसभांच्या अधिकारावर गदा : एका कंत्राटदाराला काम देण्याचा निर्णय रद्दगोंदिया : जिल्ह्यातील वनहक्क मंजूर असलेल्या ३८ गावांमधील तेंदूपत्ता संकलनासाठी लिलाव प्रक्रिया न करता एकाच कंत्राटदाराला ठेका देण्याचा ग्रामसभांनी घेतलेला निर्णय आदिवासी विकास विभागाने रद्द केला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पुन्हा ई-टेंडरिंग केले जाणार आहे. मात्र आदिवासी विभागाचा हा निर्णय ग्रामसभांच्या अधिकारावर गदा आणणारा असल्याची भावनाही व्यक्त होत आहे.यापूर्वी ग्रामसभांनी केलेल्या तेंदुपत्ता विक्रीच्या व्यवहारात जवळपास १ कोटी रुपयांचा तोटा होण्याची शक्यता वनविभागाने व्यक्त केली होती. मात्र ग्रामसभा पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या गणितानुसार यावर्षी तेंदुपत्ता विक्रीतून सर्वाधिक नफा मिळणार असल्याचे सांगितले जात होते. दरम्यान वनविभागाचे अधिकारीही गावकऱ्यांच्या भूमिकेवर समाधानी नव्हते. त्यांनी तसा अभिप्राय दिला होता. दरम्यान राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाचे उपसचिव प्रभाकर गावंडे यांनी गेल्या ९ मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र पाठवून जिल्ह्यातील ३८ सामूहिक वनहक मंजूर गावांमध्ये तेंदूपत्ता संकलन आणि विक्रीची प्रक्रिया ई-टेंडरिंगच्या माध्यमातून करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे आता लवकरच तेंदुपत्ता संकलन व विक्रीची आधी झालेली प्रक्रिया रद्द करून नव्याने ई-टेंडरिंग केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. २० मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात एक बैठक घेतली. त्यात काही गावातील नागरिकांनी आपल्याला अंधारात ठेवून ग्रामसभांनी तेंदुपत्ता ठेक्याची प्रक्रिया केल्याचा आरोप केला.गेल्यावर्षी जिल्ह्यात २९ तेंदूपत्ता युनिट्सच्या लिलावातून १२ कोटी कोटी रुपये महसूल मिळाला होता. मात्र यावर्षी २९ युनिट्सच्या विक्रीतून ३४ कोटी महसूल मिळाला. त्यामुळे पुढील वर्षाकरिता वनहक्क मंजूर ग्रामसभांना तेंदुपत्त्याचा जो दर मिळाला तो कमी असल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे. वास्तविक शासनाने गु्रप आॅफ ग्रामसभांना वनौपजाच्या विक्रीचे अधिकार दिले असताना शासनाने पुन्हा ई-टेंडरिंग करण्याची घेतलेली भूमिका कितपत योग्य आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)