शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातच दारुबंदी का?

By admin | Updated: May 23, 2015 01:45 IST

महाराष्ट्राच्या राजकारणात विदर्भ वगळता इतर प्रादेशिक विभागांचा बोलबाला आहे. मद्यप्राशनाचा शौक राज्यात सर्वत्र आहे.

अर्जुनी मोरगाव : महाराष्ट्राच्या राजकारणात विदर्भ वगळता इतर प्रादेशिक विभागांचा बोलबाला आहे. मद्यप्राशनाचा शौक राज्यात सर्वत्र आहे. मात्र ज्यावेळी दारुबंदीचा विषय चर्चेला येतो तेव्हा विदर्भालाच टार्गेट बनविण्यात येते. विदर्भाशिवाय इतर प्रादेशिक विभागात दारुबंदी का नाही? असा सवाल बिअरबार असोसिएशनने करून हा विदर्भावर अन्याय असल्याचा आरोप केला आहे.राज्यात दिवसेंदिवस मद्यपी व मद्य विक्रीच्या दुकानात वाढ होत आहे. दारूबंदीच्या अनेक चळवळीसुद्धा सुरूच असतात. दारू व्यवसायापासून शासनाला अमाप महसूल मिळतो. मात्र ठराविक कारण नसतानासुद्धा केवळ एकाच प्रांतात विदर्भात दारुबंदी केली जाते. राज्यात एकीकडे राजकारणावर छाप पाडणाऱ्या नेत्यांचे व मोठ्या उद्योजकांचे दारूचे कारखाने आहेत. ते आपले व्यवसाय जपताना मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश व इतर विभागात दारुबंदी होऊ देत नाहीत. तर दुसरीकडे दारूबंदीचा सपाटा सुरु आहे. गडचिरोलीसारख्या आदिवासी जिल्ह्यात मोहफुले हे उदरनिर्वाहाचे साधन आहे. मोहफुले हे वनोपज असल्याने यावर बंदी आहे. मोहफुलांपासून उत्तम दारू तयार होते. गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असली तरी आदिवासी बांधव स्वत: पिण्यासाठी मोहफुलांपासून दारू तयार करतातच. मोहफुलांपासून दारु तयार करण्याची त्यांची प्रदीर्घ काळापासूनची मागणी आहे. अशा परिस्थितीत मोहफुलांपासून दारू बनविण्याची परवानगी का नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी जिल्हा या नावावर जर दारूबंदी झाली असेल तर राज्यात अनेक आदिवासी जिल्हे आहेत. काही जिल्हे विदर्भाबाहेरीलसुद्धा आहेत. पण तिथे दारूबंदी नाही. मग हा भेदभाव का केला जातो, असा सवाल विचारला जात आहे.आदिवासी जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याला जशी मान्यता आहे, तशीच त्याही जिल्ह्यांना आहे. शिवाय शासकीय योजना व निधीचा लाभही मिळतो. अशा परिस्थितीत केवळ गडचिरोली जिल्ह्यातच दारूबंदी का? तो विदर्भात मोडतो हा येथील रहिवाशांचा दोष आहे काय? हे प्रश्न निर्माण होतात. (तालुका प्रतिनिधी)विदर्भावर अन्याय- मेहतासंपूर्ण विदर्भात दारुबंदी करण्याचा एक सुनियोजित षडयंत्र रचला जात आहे. वर्धा जिल्ह्यात दारुबंदी झाली तेव्हा मद्य परवाना हा मंत्रालयाच्या पर्यटन विभागाकडून दिला जात होता. आबकारी व दारुबंदी मंत्रालय असताना गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी लागू झाली आणि आता राज्य उत्पादन शुल्क मंत्रालयात जेव्हा माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी महिलांच्या अधिकार सुधारणा कायदा केला, तेव्हा चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी लागू झाली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी निर्णायक १ आॅगस्ट १९४२ च्या भारत छोडो आंदोलनाचे आवाहन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी मुंबई सभेत केले. त्यांच्या नावावर वर्धा येथे दारुबंदी झाली, मुंबई येथे का नाही? चंद्रपूर येथे महिलांच्या मागणीवर झाले. वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्याानंतर आता यवतमाळ, अमरावती, गोंदिया, भंडारा जिल्ह्यात होत आहे. विदर्भाव्यतिरिक्त इतरत्र जिल्ह्यात का नाही, असा प्रश्न तालुका बिअरबार असोसिएशनचे अध्यक्ष घनश्याम मेहता यांनी उपस्थित केला आहे.