शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
3
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
5
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
6
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
7
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
8
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
9
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
10
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
11
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
12
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
13
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
14
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
15
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
16
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
17
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
18
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
19
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
20
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात

विदर्भातच दारुबंदी का?

By admin | Updated: May 23, 2015 01:45 IST

महाराष्ट्राच्या राजकारणात विदर्भ वगळता इतर प्रादेशिक विभागांचा बोलबाला आहे. मद्यप्राशनाचा शौक राज्यात सर्वत्र आहे.

अर्जुनी मोरगाव : महाराष्ट्राच्या राजकारणात विदर्भ वगळता इतर प्रादेशिक विभागांचा बोलबाला आहे. मद्यप्राशनाचा शौक राज्यात सर्वत्र आहे. मात्र ज्यावेळी दारुबंदीचा विषय चर्चेला येतो तेव्हा विदर्भालाच टार्गेट बनविण्यात येते. विदर्भाशिवाय इतर प्रादेशिक विभागात दारुबंदी का नाही? असा सवाल बिअरबार असोसिएशनने करून हा विदर्भावर अन्याय असल्याचा आरोप केला आहे.राज्यात दिवसेंदिवस मद्यपी व मद्य विक्रीच्या दुकानात वाढ होत आहे. दारूबंदीच्या अनेक चळवळीसुद्धा सुरूच असतात. दारू व्यवसायापासून शासनाला अमाप महसूल मिळतो. मात्र ठराविक कारण नसतानासुद्धा केवळ एकाच प्रांतात विदर्भात दारुबंदी केली जाते. राज्यात एकीकडे राजकारणावर छाप पाडणाऱ्या नेत्यांचे व मोठ्या उद्योजकांचे दारूचे कारखाने आहेत. ते आपले व्यवसाय जपताना मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश व इतर विभागात दारुबंदी होऊ देत नाहीत. तर दुसरीकडे दारूबंदीचा सपाटा सुरु आहे. गडचिरोलीसारख्या आदिवासी जिल्ह्यात मोहफुले हे उदरनिर्वाहाचे साधन आहे. मोहफुले हे वनोपज असल्याने यावर बंदी आहे. मोहफुलांपासून उत्तम दारू तयार होते. गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असली तरी आदिवासी बांधव स्वत: पिण्यासाठी मोहफुलांपासून दारू तयार करतातच. मोहफुलांपासून दारु तयार करण्याची त्यांची प्रदीर्घ काळापासूनची मागणी आहे. अशा परिस्थितीत मोहफुलांपासून दारू बनविण्याची परवानगी का नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी जिल्हा या नावावर जर दारूबंदी झाली असेल तर राज्यात अनेक आदिवासी जिल्हे आहेत. काही जिल्हे विदर्भाबाहेरीलसुद्धा आहेत. पण तिथे दारूबंदी नाही. मग हा भेदभाव का केला जातो, असा सवाल विचारला जात आहे.आदिवासी जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याला जशी मान्यता आहे, तशीच त्याही जिल्ह्यांना आहे. शिवाय शासकीय योजना व निधीचा लाभही मिळतो. अशा परिस्थितीत केवळ गडचिरोली जिल्ह्यातच दारूबंदी का? तो विदर्भात मोडतो हा येथील रहिवाशांचा दोष आहे काय? हे प्रश्न निर्माण होतात. (तालुका प्रतिनिधी)विदर्भावर अन्याय- मेहतासंपूर्ण विदर्भात दारुबंदी करण्याचा एक सुनियोजित षडयंत्र रचला जात आहे. वर्धा जिल्ह्यात दारुबंदी झाली तेव्हा मद्य परवाना हा मंत्रालयाच्या पर्यटन विभागाकडून दिला जात होता. आबकारी व दारुबंदी मंत्रालय असताना गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी लागू झाली आणि आता राज्य उत्पादन शुल्क मंत्रालयात जेव्हा माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी महिलांच्या अधिकार सुधारणा कायदा केला, तेव्हा चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी लागू झाली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी निर्णायक १ आॅगस्ट १९४२ च्या भारत छोडो आंदोलनाचे आवाहन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी मुंबई सभेत केले. त्यांच्या नावावर वर्धा येथे दारुबंदी झाली, मुंबई येथे का नाही? चंद्रपूर येथे महिलांच्या मागणीवर झाले. वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्याानंतर आता यवतमाळ, अमरावती, गोंदिया, भंडारा जिल्ह्यात होत आहे. विदर्भाव्यतिरिक्त इतरत्र जिल्ह्यात का नाही, असा प्रश्न तालुका बिअरबार असोसिएशनचे अध्यक्ष घनश्याम मेहता यांनी उपस्थित केला आहे.