शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

कुजबुज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:34 IST

राजकारणात एकमेकांवर कुरघाेडी करण्याचा प्रयत्न सत्ताधारी आणि विरोधक हे दोघेही सोडत नाहीत. त्यातच केंद्रात भाजपचे तर राज्यात महाविकास आघाडीचे ...

राजकारणात एकमेकांवर कुरघाेडी करण्याचा प्रयत्न सत्ताधारी आणि विरोधक हे दोघेही सोडत नाहीत. त्यातच केंद्रात भाजपचे तर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने केंद्र विरुद्ध राज्य असा संघर्ष सातत्याने पहायला मिळतो. सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याची एकही संधी विरोधक सोडत नाहीत. सध्या विरोधात असलेले कधी काळी सत्तेवर होते याचा देखील त्यांना विसर पडत आहे. यातच सरकारला कोंडीत पकडण्याची लगीनघाई विरोधकांना झाली आहे. मागील पंधरा ते वीस दिवस जिल्ह्यात पाऊस झाला नव्हता. त्यामुळे धानपीक संकटात आले होते. याचीच संधी साधत आणि शेतकऱ्यांची सहानुभूती कॅश करण्याच्या नादात भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी करून टाकली. मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन पाठवून भाजपने शेतकऱ्यांप्रती कळवळा दाखवला. त्यांची ही मागणी रास्त असली तरी कदाचित ती निसर्गाला पटली नसावी. त्यामुळे दुष्काळाचे निवेदन देताच लगेच दोन तीन दिवसांनी जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कोरड्या दुष्काळाचे जिल्ह्यावरील संकट तूर्तास तरी टळले आहे. शेवटी मागणी कुणाचीही असो पाऊस आला हे महत्त्वाचे.