राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षांचे मिळूून महाविकास आघाडीचे सरकार असले तरी ही आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कायम राहणार नाही की याचे भाकीत आता वर्तविणे कठीण आहे. जिल्हा परिषद, नगर परिषद, नगर पंचायत निवडणुका डिसेंबर अथवा जानेवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. राज्यात सत्तेवर असलेल्या तिन्ही पक्षांच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांनी या निवडणुका स्वबळावर लढण्याची पूर्ण तयारी केली आहे. ग्रामीण भागात दौरे करून नेेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एकला चलो रे चा कानमंत्र देत आहेत, तर काही निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले भावी उमेदवार आपले तिकीट पक्के झाल्याचे समजून आतापासून भाऊ लक्ष असू द्या म्हणायला सुरुवात केली आहे. असे असले तरी राजकारणात केव्हा काय होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे भाईजी, भाऊ आणि साहेब यावर काय निर्णय घेतात यावरच एकीने की बेकीने हे कळणार आहे.
- अंकुश गुंडावार