शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

पोट भरायचे की वीज बिल, सर्वसामान्यांची परिस्थिती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:22 IST

गोंदिया : कोरोना महामारीत सर्वसामान्यांना संसर्ग झाला व त्यात काहींचा जीव गेला. तर काही कोरोनाच्या महामारीतून बचावले. त्यात जीव ...

गोंदिया : कोरोना महामारीत सर्वसामान्यांना संसर्ग झाला व त्यात काहींचा जीव गेला. तर काही कोरोनाच्या महामारीतून बचावले. त्यात जीव वाचविण्यासाठी लाखो रूपयांचा खर्च झाला. कुणी लाखो रूपय खर्च करूनही जग सोडून गेले. कित्येकांचा व्यवसाय बुडाला तर कुणी नोकरी सोडली. आता रोजगार नसल्यामुळे आर्थिक परिस्थिती डामाडोल झाली. अशा सर्वसामान्य लोकांनी पोट भरायचे की वीज बिल अशी व्यथा सर्वसामान्य लोकांची झाली आहे.

सलग २ वर्षे निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. हाताला रोजगार नाही, पोटाची खळगी भरताना नाकीनऊ आलेल्या सर्वसामान्यांना वीज बिलाचा भार डोइजड झाला असून बिल कसे भरायचे, असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. कोरोनाकाळात ६ महिन्यांचे बीजबिल माफ करावे, या मागणीसाठी गतवर्षी आंदोलनाचे रान उठले. यंदाही अशीच स्थिती उद्भवल्याने सरकारने यंदा तरी बिलमाफीसाठी झुंजणाऱ्या वीज ग्राहकांना सवलतीचा डोस देऊन दिलासा देण्याची गरज आहे. सलग २ वर्षे लॉकडाउनमुळे व्यापार बंद आहे. त्यामुळे व्यवसायीक ग्राहकांचाही आता वीज बिलाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

औद्योगिक क्षेत्राचे तर कंबरडेच मोडले आहे. अशीच स्थिती घरगुती ग्राहकांची बनली आहे. सर्वसामान्यांच्या हातात पैैसा नसल्याने घरगुती ग्राहकांनाही वीज बिल कसे करावे, असा प्रश्न पडला आहे. गतवर्षी नागरिकांतील असंतोष कमी करण्यासाठी केवळ वीजतोडणी मोहीम स्थगित करून सर्वसामान्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार सरकारने केला. आता पुन्हा यंदाही कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांसह मध्यमवर्गीयांनाही फटका बसला आहे. रिक्षा चालकांपासून फेरीवाल्यांपर्यंत, खासगी नोकरदारांपासून मोठ्या उद्योजकांपर्यंत प्रत्येकास लॉकडाऊनची झळ बसली आहे. कोरोनाच्या धास्तीने सर्वसामान्यांची मानसिक, आर्थिक आणि शारीरिक स्थितीही बिघडली आहे.

अशावेळी सामान्यांना धीर देण्यासाठी राज्य सरकारने यंदातरी वीज बिलात सुट देऊन अथवा ६ महिन्यांचे बिल माफ करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. कोरोना काळात लॉकडाऊन असल्यामुळे सर्व व्यवसाय ठप्प पडले आहेत. त्याचा आर्थिक फटका मागील वर्षापासून सर्व सामान्यांवर बसत आहे. अशावेळी सर्व सामान्यांना वीज बिल कसे भरावे? असा प्रश्न पडत आहे.