शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

पोट भरायचे की वीज बिल, सर्वसामान्यांची परिस्थिती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:22 IST

गोंदिया : कोरोना महामारीत सर्वसामान्यांना संसर्ग झाला व त्यात काहींचा जीव गेला. तर काही कोरोनाच्या महामारीतून बचावले. त्यात जीव ...

गोंदिया : कोरोना महामारीत सर्वसामान्यांना संसर्ग झाला व त्यात काहींचा जीव गेला. तर काही कोरोनाच्या महामारीतून बचावले. त्यात जीव वाचविण्यासाठी लाखो रूपयांचा खर्च झाला. कुणी लाखो रूपय खर्च करूनही जग सोडून गेले. कित्येकांचा व्यवसाय बुडाला तर कुणी नोकरी सोडली. आता रोजगार नसल्यामुळे आर्थिक परिस्थिती डामाडोल झाली. अशा सर्वसामान्य लोकांनी पोट भरायचे की वीज बिल अशी व्यथा सर्वसामान्य लोकांची झाली आहे.

सलग २ वर्षे निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. हाताला रोजगार नाही, पोटाची खळगी भरताना नाकीनऊ आलेल्या सर्वसामान्यांना वीज बिलाचा भार डोइजड झाला असून बिल कसे भरायचे, असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. कोरोनाकाळात ६ महिन्यांचे बीजबिल माफ करावे, या मागणीसाठी गतवर्षी आंदोलनाचे रान उठले. यंदाही अशीच स्थिती उद्भवल्याने सरकारने यंदा तरी बिलमाफीसाठी झुंजणाऱ्या वीज ग्राहकांना सवलतीचा डोस देऊन दिलासा देण्याची गरज आहे. सलग २ वर्षे लॉकडाउनमुळे व्यापार बंद आहे. त्यामुळे व्यवसायीक ग्राहकांचाही आता वीज बिलाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

औद्योगिक क्षेत्राचे तर कंबरडेच मोडले आहे. अशीच स्थिती घरगुती ग्राहकांची बनली आहे. सर्वसामान्यांच्या हातात पैैसा नसल्याने घरगुती ग्राहकांनाही वीज बिल कसे करावे, असा प्रश्न पडला आहे. गतवर्षी नागरिकांतील असंतोष कमी करण्यासाठी केवळ वीजतोडणी मोहीम स्थगित करून सर्वसामान्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार सरकारने केला. आता पुन्हा यंदाही कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांसह मध्यमवर्गीयांनाही फटका बसला आहे. रिक्षा चालकांपासून फेरीवाल्यांपर्यंत, खासगी नोकरदारांपासून मोठ्या उद्योजकांपर्यंत प्रत्येकास लॉकडाऊनची झळ बसली आहे. कोरोनाच्या धास्तीने सर्वसामान्यांची मानसिक, आर्थिक आणि शारीरिक स्थितीही बिघडली आहे.

अशावेळी सामान्यांना धीर देण्यासाठी राज्य सरकारने यंदातरी वीज बिलात सुट देऊन अथवा ६ महिन्यांचे बिल माफ करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. कोरोना काळात लॉकडाऊन असल्यामुळे सर्व व्यवसाय ठप्प पडले आहेत. त्याचा आर्थिक फटका मागील वर्षापासून सर्व सामान्यांवर बसत आहे. अशावेळी सर्व सामान्यांना वीज बिल कसे भरावे? असा प्रश्न पडत आहे.