शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

पोट भरायचे की वीज बिल, सर्वसामान्यांची परिस्थिती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:22 IST

गोंदिया : कोरोना महामारीत सर्वसामान्यांना संसर्ग झाला व त्यात काहींचा जीव गेला. तर काही कोरोनाच्या महामारीतून बचावले. त्यात जीव ...

गोंदिया : कोरोना महामारीत सर्वसामान्यांना संसर्ग झाला व त्यात काहींचा जीव गेला. तर काही कोरोनाच्या महामारीतून बचावले. त्यात जीव वाचविण्यासाठी लाखो रूपयांचा खर्च झाला. कुणी लाखो रूपय खर्च करूनही जग सोडून गेले. कित्येकांचा व्यवसाय बुडाला तर कुणी नोकरी सोडली. आता रोजगार नसल्यामुळे आर्थिक परिस्थिती डामाडोल झाली. अशा सर्वसामान्य लोकांनी पोट भरायचे की वीज बिल अशी व्यथा सर्वसामान्य लोकांची झाली आहे.

सलग २ वर्षे निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. हाताला रोजगार नाही, पोटाची खळगी भरताना नाकीनऊ आलेल्या सर्वसामान्यांना वीज बिलाचा भार डोइजड झाला असून बिल कसे भरायचे, असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. कोरोनाकाळात ६ महिन्यांचे बीजबिल माफ करावे, या मागणीसाठी गतवर्षी आंदोलनाचे रान उठले. यंदाही अशीच स्थिती उद्भवल्याने सरकारने यंदा तरी बिलमाफीसाठी झुंजणाऱ्या वीज ग्राहकांना सवलतीचा डोस देऊन दिलासा देण्याची गरज आहे. सलग २ वर्षे लॉकडाउनमुळे व्यापार बंद आहे. त्यामुळे व्यवसायीक ग्राहकांचाही आता वीज बिलाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

औद्योगिक क्षेत्राचे तर कंबरडेच मोडले आहे. अशीच स्थिती घरगुती ग्राहकांची बनली आहे. सर्वसामान्यांच्या हातात पैैसा नसल्याने घरगुती ग्राहकांनाही वीज बिल कसे करावे, असा प्रश्न पडला आहे. गतवर्षी नागरिकांतील असंतोष कमी करण्यासाठी केवळ वीजतोडणी मोहीम स्थगित करून सर्वसामान्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार सरकारने केला. आता पुन्हा यंदाही कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांसह मध्यमवर्गीयांनाही फटका बसला आहे. रिक्षा चालकांपासून फेरीवाल्यांपर्यंत, खासगी नोकरदारांपासून मोठ्या उद्योजकांपर्यंत प्रत्येकास लॉकडाऊनची झळ बसली आहे. कोरोनाच्या धास्तीने सर्वसामान्यांची मानसिक, आर्थिक आणि शारीरिक स्थितीही बिघडली आहे.

अशावेळी सामान्यांना धीर देण्यासाठी राज्य सरकारने यंदातरी वीज बिलात सुट देऊन अथवा ६ महिन्यांचे बिल माफ करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. कोरोना काळात लॉकडाऊन असल्यामुळे सर्व व्यवसाय ठप्प पडले आहेत. त्याचा आर्थिक फटका मागील वर्षापासून सर्व सामान्यांवर बसत आहे. अशावेळी सर्व सामान्यांना वीज बिल कसे भरावे? असा प्रश्न पडत आहे.