शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
4
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
5
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
6
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
7
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
8
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
9
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
10
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
11
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
12
Gold Rates 13 May : एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
13
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
14
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
15
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
16
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
17
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
18
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
19
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
20
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...

पाणीपुरवठा योजनेतून केव्हा होणार पाणीपुरवठा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:26 IST

राजेश मुनिश्वर सडक अर्जुनी : तालुक्यातील १७ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी १५ वर्षांपूर्वी पुतळी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली ...

राजेश मुनिश्वर

सडक अर्जुनी : तालुक्यातील १७ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी १५ वर्षांपूर्वी पुतळी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली हाेती. पण, नियोजनाअभावी या योजनेचे तीनतेरा वाजले आहेत. या योजनेकडे अद्यापही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष गेले नाही. त्यामुळे कोेट्यवधी रुपये खर्चून तयार केलेल्या पाणीपुरवठा योजनेतून शुद्ध पाण्याचा पुरवठा केव्हा सुरळीत होणार, असा सवाल गावकरी करीत आहेत.

पाणीपुरवठा योजनेच्या पंप हाउसकडे जाणाऱ्या मार्गावर गेल्या काही महिन्यांपूर्वी खडीकरणाचे काम करण्यात आले होते. पण तेसुद्धा अल्पावधीत उखडले आहे. सडक अर्जुनी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ ३५ वर्षांपूर्वी एका पाणी टाकीचे बांधकाम करण्यात आले होते. पण, ती टाकीसुद्धा आता पूर्णपणे जीर्ण झाली आहे. या पाणी टाकीची अद्यापही दुरुस्ती करण्यात आली नाही. जीर्ण टाकीतूनच शहरवासीयांना पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे यातून मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

.......

चार काॅलनीतील नागरिक शुद्ध पाण्यापासून वंचित

कोदामेडी परिसरातील नाल्याजवळ असलेल्या विहिरीतून सडक अर्जुनी शहरातील नागरिकांना नळ योजनेद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. तर कस्तुरीदेवी नगर, प्रगती कॉलनी, लहरी नगर, शिक्षक कॉलनी, गोयल नगरमध्ये नळ योजनेचे जाळे नसल्याने शुद्ध पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यामुळे त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे.

......

वॉटर फिल्टरची गरज

सडक अर्जुनी शहरातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्यासाठी मोठे वॉटर फिल्टर प्लांट लावण्याची गरज आहे. वॉटर फिल्टर नसल्यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे नगर पंचायतने वॉटर फिल्टर लावण्याची मागणी शहरवासीयांनी केला आहे.

.....

वृक्षारोपण केलेली झाडे वाळली

शहरातील प्रत्येकच वॉर्डात ३३ कोटी वृक्ष लागवडी योजनेंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले होते. पण वृक्षारोपण केल्यानंतर त्यांच्या देखभालीकडे नगर पंचायतचे दुर्लक्ष झाल्याने वृक्षारोपण केलेली सर्व झाडे वाळली आहेत.

....

सडक अर्जुनी शहरातील पंप हाउसकडे जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण काही दिवसांपूर्वीच करण्यात आले होते. पण, हा रस्ता पुन्हा उखडला असल्याने या रस्त्याची पुन्हा दुरुस्ती करण्यात आली नाही.

- राजीव जाधव, कनिष्ट अभियंता, नगर पंचायत

...

शहरातील समस्या सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. आरोग्य, पिण्याचे शुद्ध पाणी या मूलभूत सुविधा नागरिकांना मिळणे आवश्यक आहे.

- रेखा मुनिश्वर, नागरिक.