शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजनेतून केव्हा होणार पाणीपुरवठा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:26 IST

राजेश मुनिश्वर सडक अर्जुनी : तालुक्यातील १७ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी १५ वर्षांपूर्वी पुतळी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली ...

राजेश मुनिश्वर

सडक अर्जुनी : तालुक्यातील १७ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी १५ वर्षांपूर्वी पुतळी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली हाेती. पण, नियोजनाअभावी या योजनेचे तीनतेरा वाजले आहेत. या योजनेकडे अद्यापही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष गेले नाही. त्यामुळे कोेट्यवधी रुपये खर्चून तयार केलेल्या पाणीपुरवठा योजनेतून शुद्ध पाण्याचा पुरवठा केव्हा सुरळीत होणार, असा सवाल गावकरी करीत आहेत.

पाणीपुरवठा योजनेच्या पंप हाउसकडे जाणाऱ्या मार्गावर गेल्या काही महिन्यांपूर्वी खडीकरणाचे काम करण्यात आले होते. पण तेसुद्धा अल्पावधीत उखडले आहे. सडक अर्जुनी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ ३५ वर्षांपूर्वी एका पाणी टाकीचे बांधकाम करण्यात आले होते. पण, ती टाकीसुद्धा आता पूर्णपणे जीर्ण झाली आहे. या पाणी टाकीची अद्यापही दुरुस्ती करण्यात आली नाही. जीर्ण टाकीतूनच शहरवासीयांना पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे यातून मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

.......

चार काॅलनीतील नागरिक शुद्ध पाण्यापासून वंचित

कोदामेडी परिसरातील नाल्याजवळ असलेल्या विहिरीतून सडक अर्जुनी शहरातील नागरिकांना नळ योजनेद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. तर कस्तुरीदेवी नगर, प्रगती कॉलनी, लहरी नगर, शिक्षक कॉलनी, गोयल नगरमध्ये नळ योजनेचे जाळे नसल्याने शुद्ध पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यामुळे त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे.

......

वॉटर फिल्टरची गरज

सडक अर्जुनी शहरातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्यासाठी मोठे वॉटर फिल्टर प्लांट लावण्याची गरज आहे. वॉटर फिल्टर नसल्यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे नगर पंचायतने वॉटर फिल्टर लावण्याची मागणी शहरवासीयांनी केला आहे.

.....

वृक्षारोपण केलेली झाडे वाळली

शहरातील प्रत्येकच वॉर्डात ३३ कोटी वृक्ष लागवडी योजनेंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले होते. पण वृक्षारोपण केल्यानंतर त्यांच्या देखभालीकडे नगर पंचायतचे दुर्लक्ष झाल्याने वृक्षारोपण केलेली सर्व झाडे वाळली आहेत.

....

सडक अर्जुनी शहरातील पंप हाउसकडे जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण काही दिवसांपूर्वीच करण्यात आले होते. पण, हा रस्ता पुन्हा उखडला असल्याने या रस्त्याची पुन्हा दुरुस्ती करण्यात आली नाही.

- राजीव जाधव, कनिष्ट अभियंता, नगर पंचायत

...

शहरातील समस्या सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. आरोग्य, पिण्याचे शुद्ध पाणी या मूलभूत सुविधा नागरिकांना मिळणे आवश्यक आहे.

- रेखा मुनिश्वर, नागरिक.