शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

पाणीपुरवठा योजनेतून केव्हा होणार पाणीपुरवठा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:26 IST

राजेश मुनिश्वर सडक अर्जुनी : तालुक्यातील १७ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी १५ वर्षांपूर्वी पुतळी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली ...

राजेश मुनिश्वर

सडक अर्जुनी : तालुक्यातील १७ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी १५ वर्षांपूर्वी पुतळी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली हाेती. पण, नियोजनाअभावी या योजनेचे तीनतेरा वाजले आहेत. या योजनेकडे अद्यापही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष गेले नाही. त्यामुळे कोेट्यवधी रुपये खर्चून तयार केलेल्या पाणीपुरवठा योजनेतून शुद्ध पाण्याचा पुरवठा केव्हा सुरळीत होणार, असा सवाल गावकरी करीत आहेत.

पाणीपुरवठा योजनेच्या पंप हाउसकडे जाणाऱ्या मार्गावर गेल्या काही महिन्यांपूर्वी खडीकरणाचे काम करण्यात आले होते. पण तेसुद्धा अल्पावधीत उखडले आहे. सडक अर्जुनी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ ३५ वर्षांपूर्वी एका पाणी टाकीचे बांधकाम करण्यात आले होते. पण, ती टाकीसुद्धा आता पूर्णपणे जीर्ण झाली आहे. या पाणी टाकीची अद्यापही दुरुस्ती करण्यात आली नाही. जीर्ण टाकीतूनच शहरवासीयांना पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे यातून मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

.......

चार काॅलनीतील नागरिक शुद्ध पाण्यापासून वंचित

कोदामेडी परिसरातील नाल्याजवळ असलेल्या विहिरीतून सडक अर्जुनी शहरातील नागरिकांना नळ योजनेद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. तर कस्तुरीदेवी नगर, प्रगती कॉलनी, लहरी नगर, शिक्षक कॉलनी, गोयल नगरमध्ये नळ योजनेचे जाळे नसल्याने शुद्ध पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यामुळे त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे.

......

वॉटर फिल्टरची गरज

सडक अर्जुनी शहरातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्यासाठी मोठे वॉटर फिल्टर प्लांट लावण्याची गरज आहे. वॉटर फिल्टर नसल्यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे नगर पंचायतने वॉटर फिल्टर लावण्याची मागणी शहरवासीयांनी केला आहे.

.....

वृक्षारोपण केलेली झाडे वाळली

शहरातील प्रत्येकच वॉर्डात ३३ कोटी वृक्ष लागवडी योजनेंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले होते. पण वृक्षारोपण केल्यानंतर त्यांच्या देखभालीकडे नगर पंचायतचे दुर्लक्ष झाल्याने वृक्षारोपण केलेली सर्व झाडे वाळली आहेत.

....

सडक अर्जुनी शहरातील पंप हाउसकडे जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण काही दिवसांपूर्वीच करण्यात आले होते. पण, हा रस्ता पुन्हा उखडला असल्याने या रस्त्याची पुन्हा दुरुस्ती करण्यात आली नाही.

- राजीव जाधव, कनिष्ट अभियंता, नगर पंचायत

...

शहरातील समस्या सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. आरोग्य, पिण्याचे शुद्ध पाणी या मूलभूत सुविधा नागरिकांना मिळणे आवश्यक आहे.

- रेखा मुनिश्वर, नागरिक.