शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

रायपूर ते दिल्ली सायकलवारी

By admin | Updated: November 19, 2016 00:48 IST

युवक- युवतींशी संबंधीत सामाजिक व राष्ट्रीय समस्या यासह स्वच्छता अभियान, बेटी बचाओ-बेटी पढाओ

सशक्तीकरण सायकल यात्रा : नऊ जणांचा यात्रेत समावेश गोंदिया : युवक- युवतींशी संबंधीत सामाजिक व राष्ट्रीय समस्या यासह स्वच्छता अभियान, बेटी बचाओ-बेटी पढाओ आदि विषयांची जनजागृती करण्याच्या उद्देशातून अजय भारत प्रकल्प अंतर्गत ९ जणांनी रायपूर ते दिल्ली सायकलवारी सुरू केली आहे. ‘सशक्त भारत यात्रा’ नावाने असलेली ही त्यांची सायकलवारी रायपूर (छत्तीसगड) येथून सुरू झाली असून दिल्ली संसदभवन येथे तिचा समारोप करण्यात येणार आहे. या रॅलीचे गुरूवारी (दि.१७) येथील बालाजी इन्स्टिट्युट आॅफ इन्फॉर्मेशन टेक्नालॉजी येथे आगमन होताच जोरदार स्वागत करण्यात आले. सदर सायकल यात्रेच्या स्वागत समारंभाच्या अध्यक्षस्थानी नमाद महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग प्रमुख व रासेयो जिल्हासमन्वयक प्रा. बबन मेश्राम होते. प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिय आईसेक्ट शाखेचे प्रबंधक जी.तिरूपतीराव, रैली प्रणेते व प्रमुख डॉ. प्रदीप व इतर मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक भाषणातून जी. तिरूपतीराव यांनी, आईसेक्ट द्वारा वर्ष २०१५ मध्ये अधिक प्रमाणात अनेक माध्यमांतून युवकांमध्ये जागरूकता अभियान संचालीत करण्यात आले होते. ज्यात प्रामुख्याने कौशल्य विकास यात्रा, विद्यार्थ्यांसाठी रोजगार मेळावा, महिला विकास व उद्योग संमेलन अशा विविध प्रकारच्या रोजगार भिमुख गतिविधी आयोजित करण्यात आल्या. यांचाच एक भाग म्हणून आईसेक्ट युवा सशक्तीकरण सायकल यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगीतले. डॉ. अजय यांनी, ही यात्रा १५ नोव्हेंबर रोजी रायपूर येथून सुरू झाली असून १९ डिसेंबर रोजी दिल्ली येथे यात्रेचा समारोप होणार आहे. युवक- युवतींशी संबंधीत सामाजिक व राष्ट्रीय समस्या विषयक जनजागृती करणे हे या यात्रेचे उद्देश असल्याचे सांगीतले. संचालन श्रध्दा उद्गावकर यांनी केले. आभार पूर्वा पटेल यांनी मानले. कार्यक्रमासाठी तुषार चव्हाण, खुमेश पटले, निर्णय गणविर, निधी भगत, सुहासणी बोरला, वनश्री वाघाडे, श्वेता भगत, संदीप डोडाणे, अमोल पुस्तोडे, शुभम बत्रा, दामीनी पारधी यांनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)सौंदड येथेही यात्रेचे स्वागत सौंदड : नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आॅफ इंडिया व अजय भारत प्रकल्प यांच्या माध्यमातून ९ तरूण सायकल रॅलीतून स्वच्छता अभियान, बेटी बचाओ-बेटी पढाओ, स्कील इंडियाचा संदेश देत आहेत. ही रॅली रायपूर संसदभवातून सुरू झाली असून दिल्ली संसदभवन येथे डिसेंबर महिन्यात तिचा समारोप होणार आहे. रॅलीने सौंदड या गावाला भेट दिली असता त्यांचे स्वागत करण्यात आले. (वार्ताहर)