शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
6
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
7
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
8
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
9
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
10
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
11
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
12
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
13
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
14
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
15
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
16
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
17
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
18
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
19
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
20
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा

आठवडी बाजार पन्नास टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:21 IST

गोंदिया : कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे आठवडी बाजार, गुरांचे बाजार तसेच कोचिंग क्लासेस, संगणक प्रशिक्षक केंद्र हे सर्व बंद ...

गोंदिया : कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे आठवडी बाजार, गुरांचे बाजार तसेच कोचिंग क्लासेस, संगणक प्रशिक्षक केंद्र हे सर्व बंद ठेवण्यात आले होते. आठवडी बाजार तीन महिन्यांपासून, तर कोचिंग क्लासेस मागील दीड वर्षांपासून बंद आहे. पण जिल्ह्यात आता कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असल्याने निर्बंध शिथिल करीत आठवडी बाजार ५० टक्के क्षमतेने, तर कोचिंग क्लासेस २० टक्के क्षमतेने सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी बुधवारी (दि.२३) काढले आहेत.

कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याने राज्य सरकारने रुग्णाचा पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडची संख्या या दोन बाबी लक्षात घेऊन पाच स्तरात निर्बंध शिथिल केले. गोंदिया जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी रेट १ टक्केच्या आतच असल्याने जिल्ह्याचा पहिल्याच स्तरात समावेश होता. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व व्यवहार अनलॉक करण्यात आले; तर दर गुरुवारी जिल्ह्यातील कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट लक्षात घेऊन निर्बंध कठोर अथवा शिथिल केले जात आहेत. मात्र संसर्ग आटोक्यात आला असला, तरी आठवडी बाजार आणि कोचिंग क्लासेस सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली नव्हती. त्यामुळे यावरील निर्बंध केव्हा शिथिल केले जातात, याकडे लक्ष लागले होते. बुधवारी जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवागी दिली, तर कोचिंग आणि संगणक क्लासेससुध्दा २० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे ग्रामपंचायती व कोचिंग क्लासेस संचालकांना दिलासा मिळाला; मात्र यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. यासाठी नगर परिषद आणि उपविभागीय कार्यालयाच्या पथकांची या सर्वांवर बारीक नजर राहणार आहे.

...............

तीन स्तरावर राहणार पथके

आठवडी बाजार, संगणक आणि कोचिंग क्लासेस सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. मात्र बाजारात गर्दी होऊन नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेवक, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना घ्यावी लागणार आहे; तर कोचिंग क्लासेसमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे उल्लंघन होणार नाही, यासाठी न. प. मुख्याधिकारी यांच्या नियंत्रणाखाली समिती व पथकाची नजर राहणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाणार आहे.

..............

संसर्ग वाढल्यास निर्बंध पुन्हा होणार कठोर

कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असून, याचा दर गुरुवारी आढावा घेतला जात आहे. पॉझिटिव्हिटी रेट वाढल्यास निर्बंध कठोर केले जातील, असे संकेत जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे संसर्ग वाढू न देण्यासाठी जिल्हावासीयांना नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.