शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
6
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
7
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
8
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
9
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
10
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
11
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
12
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
13
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
14
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
15
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
16
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
17
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
18
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
19
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
20
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ

आठवडी बाजार पन्नास टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:21 IST

गोंदिया : कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे आठवडी बाजार, गुरांचे बाजार तसेच कोचिंग क्लासेस, संगणक प्रशिक्षक केंद्र हे सर्व बंद ...

गोंदिया : कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे आठवडी बाजार, गुरांचे बाजार तसेच कोचिंग क्लासेस, संगणक प्रशिक्षक केंद्र हे सर्व बंद ठेवण्यात आले होते. आठवडी बाजार तीन महिन्यांपासून, तर कोचिंग क्लासेस मागील दीड वर्षांपासून बंद आहे. पण जिल्ह्यात आता कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असल्याने निर्बंध शिथिल करीत आठवडी बाजार ५० टक्के क्षमतेने, तर कोचिंग क्लासेस २० टक्के क्षमतेने सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी बुधवारी (दि.२३) काढले आहेत.

कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याने राज्य सरकारने रुग्णाचा पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडची संख्या या दोन बाबी लक्षात घेऊन पाच स्तरात निर्बंध शिथिल केले. गोंदिया जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी रेट १ टक्केच्या आतच असल्याने जिल्ह्याचा पहिल्याच स्तरात समावेश होता. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व व्यवहार अनलॉक करण्यात आले; तर दर गुरुवारी जिल्ह्यातील कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट लक्षात घेऊन निर्बंध कठोर अथवा शिथिल केले जात आहेत. मात्र संसर्ग आटोक्यात आला असला, तरी आठवडी बाजार आणि कोचिंग क्लासेस सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली नव्हती. त्यामुळे यावरील निर्बंध केव्हा शिथिल केले जातात, याकडे लक्ष लागले होते. बुधवारी जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवागी दिली, तर कोचिंग आणि संगणक क्लासेससुध्दा २० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे ग्रामपंचायती व कोचिंग क्लासेस संचालकांना दिलासा मिळाला; मात्र यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. यासाठी नगर परिषद आणि उपविभागीय कार्यालयाच्या पथकांची या सर्वांवर बारीक नजर राहणार आहे.

...............

तीन स्तरावर राहणार पथके

आठवडी बाजार, संगणक आणि कोचिंग क्लासेस सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. मात्र बाजारात गर्दी होऊन नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेवक, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना घ्यावी लागणार आहे; तर कोचिंग क्लासेसमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे उल्लंघन होणार नाही, यासाठी न. प. मुख्याधिकारी यांच्या नियंत्रणाखाली समिती व पथकाची नजर राहणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाणार आहे.

..............

संसर्ग वाढल्यास निर्बंध पुन्हा होणार कठोर

कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असून, याचा दर गुरुवारी आढावा घेतला जात आहे. पॉझिटिव्हिटी रेट वाढल्यास निर्बंध कठोर केले जातील, असे संकेत जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे संसर्ग वाढू न देण्यासाठी जिल्हावासीयांना नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.