शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
3
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
4
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
5
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
6
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
7
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
8
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
9
मुंबई ते लंडन... लवकरच बोहल्यावर चढणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची संपत्ती किती? तुमचाही विश्वास नाही बसणार
10
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!
11
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
12
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
13
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
15
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
16
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
17
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
18
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
19
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
20
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."

लोककला लुप्त होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: May 22, 2014 01:17 IST

जीवन जगताना मानवाला मनोरंजनाचीही गरज भासली. यातून काही लोककला अस्तित्वात आल्यात.

गोंदिया : जीवन जगताना मानवाला मनोरंजनाचीही गरज भासली. यातून काही लोककला अस्तित्वात आल्यात. या कलाच पुढे मनोरंजनाची साधने झालीत. तमाशा, लावणी, दंडार, नाटके आदी कला पारंपरिक रुपात सादर केल्या जायच्या. पुढे २१ व्या शतकाच्या आधुनिक काळात खासगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरणाच्या या युगात मनोरंजनाची व समाजप्रबोधनाची विविध साधने उपलब्ध आहेत. मात्र विदर्भ व महाराष्ट्राची वैभव असलेली पारंपरिक लोककला आता लुप्त होण्याच्या मार्गावर आल्या आहेत.

आता सद्यस्थितीत तान्हुल्याला झोपविण्यासाठीदेखील आईला टीव्हीवरची गाणी सुरु करावी लागतात. अशावेळी जुन्या प्राचीन लोककलांची आठवण येणे स्वाभाविक आहे. परंतु महाराष्ट्रातील व झाडीपट्टीतील अनेक प्रबोधनपर लोककला संपल्या सारख्याच झाल्या असून त्यांच्या संवर्धनाची गरज येवून ठेवली आहे. अन्यथा या लोककला नामशेष व्हायला वेळ लागणार नाही.

हे संगणक युग रिमिक्सचे असल्यामुळे अनेक लोककलांचे रिमिक्स होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शायरी, तमाशा, पोवाडा, लावणी, भारुड, गोंधळ, ड्रामा, दंडार, सोंग, झडत्या, पांगूळ, कलापथक, नाटके, कीर्तन अशा अनेक लोककलांद्वारे मनोरंजनातून समाजप्रबोधन व जनजागृती केली जात असे. तमाशा, लावणी, दंडार, नाटके, कीर्तन आजही थोड्याफार प्रमाणात होत आहेत. परंतु फक्त ग्रामीण क्षेत्रातच. तमाशासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात महिला शाहिरांनीसुद्धा आज आपला वेगळा ठसा झाडपट्टीत उमटविणे सुरु केले आहे, हे मात्र विशेष. लावणीमध्ये रिमिक्स केले जात आहे. त्यामुळे खर्‍या लावण्या आजकाल होताना दिसत नाही. लावणी कलावंतांच्या तालासाठी वादक वर्ग सोबतीला असे. आता कॅसेट्स, सीडी लावून लावणी सादर होते. दंडारी फक्त मंडईमध्येच दिसतात. तेही फार कमी कलावंत दंडार करतात. बोटावर मोजता येतील एवढेच दंडार आता शिल्लक आहेत. नाट्यक्षेत्राचेही तेच झाले. झाडीपट्टीत आपापल्या नाट्यकंपन्या सुरु झाल्या. आधीच्या काळी सामाजिक, धार्मिक, लावणीप्रधान नाटके व्हायची. फिरते रंगमंच बनविले जात. रंगमंदिरे होती.

रात्रभर जागून तालीम घेतल्या जात होत्या. आता कंपनीच्या नाटकांनी वचस्व प्रस्थापित केले आहे. नाचू कीर्तनाचे रंगी म्हणत किर्तने होत. गाडगेबाबांनी कीर्तनाच्या माध्यमातून क्रांती केली. बहुजन समाजाला जागविले. अशी कीर्तने आजकाल होताना दिसत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पोवाडे व्हायचे. तानाजी मालुसरे आधारित पोवाडे प्रसिद्ध होते. शाहिरांच्या हातातील डफ आता फक्त जुन्या चित्रफितीमध्ये दिसते. लोककला जिवंत राहाव्यात म्हणून कलाप्रेमींनी प्रयत्न करण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)