शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

सर्रा व परिसरातील तलावांत पाण्याचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 21:25 IST

सर्रा, कोडेलोहारा, मारेगाव, मुरमाडी, सोमेखारी, नवेझरी सहित १० ते १५ गावात पावसाळ्याच्या पाण्याचे दगा दिल्याने नागरिकांना जीवन जगण्याची, पिण्याच्या पाण्याची, गुराढोरांच्या चाºयाची गंभीर समस्या निर्माण झाल्याने ...

ठळक मुद्देपाऊस पडलाच नाही : जानेवारी महिन्यातच पाणी पेटणार

लोकमत न्यूज नेटवर्ककाचेवानी : सर्रा, कोडेलोहारा, मारेगाव, मुरमाडी, सोमेखारी, नवेझरी सहित १० ते १५ गावात पावसाळ्याच्या पाण्याचे दगा दिल्याने नागरिकांना जीवन जगण्याची, पिण्याच्या पाण्याची, गुराढोरांच्या चाºयाची गंभीर समस्या निर्माण झाल्याने गाव सोडून पळण्याची पाळी तर येणार नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. सर्रा सह परिसरातील गावात असलेले तळे कोरडे पडले असल्याने जानेवारी महिन्यातच पाणी पेटणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.तिरोडा तालुक्यातील साकोली मार्गावर असलेला सर्रा गावात पाण्याअभावी श्रीकृष्ण जन्माष्टमीला कोरड्या तलावात कान्होबा विसर्जनासाठी ठेवण्यात आले होते. शेवटी पावसाळ्यात पाऊस आलाच नाही. त्यामुळे आजपर्यंत जशीच्यातशी अवस्था आहे. गणपती आणि नवदुर्गा कोरड्या तळ्यात ठेवून बाहेरील पाणी आणून विसर्जित करण्यात आले होते.सर्रा गावासहित अनेक गावातील शेतात धान पिकाची लागवड करण्यात आली नाही. तळ्यात थेंब भर पाणी दिसून येत नाही. पावसाळा लागण्यापुर्वी गाव तळ्याची स्थिती जशी होती आज पावसाळा संपला तरी तशीच आहे. संपूर्ण पावसाळा गेला तरी तळ््यात खेंब भर पाणी जमा झाले नाही असे नागरिकांनी ‘लोकमत’ला सांगितले आहे.गणपती आणि नवदुर्गा विसर्जना करिता थेंब भर पाणी नसल्याने कोरड्या तळ्यात मुर्ती ठेवून जवळच्या देवानंद गोसाई यांच्या बोअरवेल मधून पाईपद्वारे पाण्याची व्यवस्था करून विसर्जनाची प्रक्रिया पार पाडण्यात आली होती. पिण्याच्या पाण्याची समस्या आतापासूनच चिंतेची बाब ठरली आहे. जल स्वराजमधून तयार झालेली विहिर बंद होण्याच्या स्थितीत आहे. पाण्याचा ढोला दोन तासांमध्ये भरत असे मात्र पाण्याची पातळी खाली गेल्याने आजत्याला पाच तास लागत आहेत. ढोल्याचे पाणी पिण्याकरिता तर घरच्या विहिरींचे पाणी गुराढोरांकरिता उपयोगात आणायचे आहे. कसेबसे उपलब्ध होणारे पाणी डिसेंबर-जानेवारीपर्यंत पुरेल यानंतर गंभीर संकट निर्माण होणार असल्याचे सरपंच घासीराम पटले यांनी सांगीतले.इंदिरानगराची समस्या गंभीरइंदिरानगर (सर्राटोली) येथे ५० घरांची वस्ती असून पिण्याच्या पाण्यासाठी आजही कठीण स्थिती आहे. या ठिकाणी विहिरी व अनेक बोअरवेल खोदण्यात आल्या. परंतु कोठेही पाणी लागले नाही. सर्रा गावात दोन एकर शेती लावण्यात आली होती. ती सुद्धा पाण्याअभावी नष्ट झाली.अधिकाºयांची भेट नाहीकान्होबा विसर्जनावेळी माजी आमदार दिलीप बन्सोड यांनी गावाला भेट दिली होती. यावेळी पं.स.सभापती उषा किंदरले आणि जि.प. सदस्या सुनीता मडावी यांनी भेट दिली होती. त्यानंतर कोणत्याही अधिकाºयांनी भेट तर दूर साधी विचारपूस करण्यात आली नाही असे सरपंच पटले यांनी सांगितले.रोजगार उपलब्ध करावेसतत दोन वर्षापासून सर्रा गावासहित परिसरात दुष्काळाचे संकट नागरिक झेलत आहेत. शेतात धान्य नसल्याने प्रशासनाने तात्काळ रोजगार उपलब्ध करुन दयावे अशी मागणी उपसरपंच पुष्पराज पारधी, सदस्य हस्तकला येडे, जयदेव गौतम, कंठीलाल पटले, पो.पा. कुंवरलाल पटले, भाऊदास पटले आणि तंमुस अध्यक्ष पुरनलाल पारधी यांनी केली आहे.