शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 Final: 'विराट' विजयोत्सव! RCB चे जेतेपदाचे स्वप्न साकार, 'किंग कोहली'चा जयजयकार
2
हळव्या मनाचा विराट! पहिली IPL ट्रॉफी जिंकताच रडत-रडतच अनुष्काकडे वळला अन्... (VIDEO)
3
न्यूझीलंडच्या संसदेत महिला खासदाराने दाखवला स्वत:चा न्यूड फोटो; नेमकं काय घडलं?
4
युक्रेनचा रशियावर आणखी एक मोठा हल्ला, ११०० किलो स्फोटकांनी क्रिमिया पूल उडवला
5
IPL 2025 Final: अय्यरची विकेट अन् विराटसह RCB च्या ताफ्यात ट्रॉफी हाती आल्याचं फिल (VIDEO)
6
हेरगिरीच्या संशयावरून कारागृहात असलेल्या सुनीताच्या अटकेसाठी कारगिल पोलीस नागपुरात
7
RCB vs PBKS : विराटची विकेट पडली अन् अनुष्कासह कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेल्या एबीचा चेहरा पडला
8
"ट्रम्प यांच्या सांगण्यावरून मोदींनी सरेंडर केलं’’ काँग्रेस असती तर.., युद्धविरामावरून राहुल गांधींचा गंभीर आरोप   
9
राज्यात कोविडचे ४९४ सक्रिय रुग्ण, काय काळजी घ्याल?; आरोग्य विभागाने केलं आवाहन
10
IPL 2025 Final: 'टी-२० मध्ये कसोटी क्रिकेटचा आनंद लुटतोय' संथ खेळीमुळे विराट कोहली ट्रोल!
11
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम; आयपीएलमधील सर्वात मोठा विक्रम मोडला!
12
IPL 2025 Final : रजत पाटीदारनं सिक्सर मारला; मग Kyle Jamieson यानं असा घेतला बदला (VIDEO)
13
IPL 2025 Closing Ceremony : 'ऑपरेशन सिंदूर' थीम अन् भारतीय सैन्याच्या शौर्याला 'सलाम'
14
नागपुरातील लग्नघरात २४.६६ लाखांची चोरी; शेजाऱ्याने फोनमध्ये रेकॉर्ड केला व्हिडीओ
15
अनुसूचित जमाती आयोग, कामगार विमा महामंडळ...; राज्य मंत्रिमंडळाने घेतले चार महत्वाचे निर्णय
16
बेपत्ता मुलगी, ट्रॉली बॅगेत मृतदेह, २४०० किमी दूर मर्डर मिस्ट्री; २ राज्यांचे पोलीस हैराण
17
जर्सी RCB ची अन् पगडी पंजाबची; IPL फायनलमध्ये ख्रिस गेलचा दोन्ही संघांना फुल सपोर्ट
18
भारत-रशियाच्या भागीदारीमुळं ९ देशांचं टेन्शन वाढलं; ज्याचा विचार केला नव्हता ते घडलं
19
गंमतच झाली! इंग्लंडचा संघ सायकल चालवत ओव्हलला पोहोचला; वेस्ट इंडिजची टीम मात्र ट्रॅफिकमध्ये अडकली...

सर्रा व परिसरातील तलावांत पाण्याचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 21:25 IST

सर्रा, कोडेलोहारा, मारेगाव, मुरमाडी, सोमेखारी, नवेझरी सहित १० ते १५ गावात पावसाळ्याच्या पाण्याचे दगा दिल्याने नागरिकांना जीवन जगण्याची, पिण्याच्या पाण्याची, गुराढोरांच्या चाºयाची गंभीर समस्या निर्माण झाल्याने ...

ठळक मुद्देपाऊस पडलाच नाही : जानेवारी महिन्यातच पाणी पेटणार

लोकमत न्यूज नेटवर्ककाचेवानी : सर्रा, कोडेलोहारा, मारेगाव, मुरमाडी, सोमेखारी, नवेझरी सहित १० ते १५ गावात पावसाळ्याच्या पाण्याचे दगा दिल्याने नागरिकांना जीवन जगण्याची, पिण्याच्या पाण्याची, गुराढोरांच्या चाºयाची गंभीर समस्या निर्माण झाल्याने गाव सोडून पळण्याची पाळी तर येणार नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. सर्रा सह परिसरातील गावात असलेले तळे कोरडे पडले असल्याने जानेवारी महिन्यातच पाणी पेटणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.तिरोडा तालुक्यातील साकोली मार्गावर असलेला सर्रा गावात पाण्याअभावी श्रीकृष्ण जन्माष्टमीला कोरड्या तलावात कान्होबा विसर्जनासाठी ठेवण्यात आले होते. शेवटी पावसाळ्यात पाऊस आलाच नाही. त्यामुळे आजपर्यंत जशीच्यातशी अवस्था आहे. गणपती आणि नवदुर्गा कोरड्या तळ्यात ठेवून बाहेरील पाणी आणून विसर्जित करण्यात आले होते.सर्रा गावासहित अनेक गावातील शेतात धान पिकाची लागवड करण्यात आली नाही. तळ्यात थेंब भर पाणी दिसून येत नाही. पावसाळा लागण्यापुर्वी गाव तळ्याची स्थिती जशी होती आज पावसाळा संपला तरी तशीच आहे. संपूर्ण पावसाळा गेला तरी तळ््यात खेंब भर पाणी जमा झाले नाही असे नागरिकांनी ‘लोकमत’ला सांगितले आहे.गणपती आणि नवदुर्गा विसर्जना करिता थेंब भर पाणी नसल्याने कोरड्या तळ्यात मुर्ती ठेवून जवळच्या देवानंद गोसाई यांच्या बोअरवेल मधून पाईपद्वारे पाण्याची व्यवस्था करून विसर्जनाची प्रक्रिया पार पाडण्यात आली होती. पिण्याच्या पाण्याची समस्या आतापासूनच चिंतेची बाब ठरली आहे. जल स्वराजमधून तयार झालेली विहिर बंद होण्याच्या स्थितीत आहे. पाण्याचा ढोला दोन तासांमध्ये भरत असे मात्र पाण्याची पातळी खाली गेल्याने आजत्याला पाच तास लागत आहेत. ढोल्याचे पाणी पिण्याकरिता तर घरच्या विहिरींचे पाणी गुराढोरांकरिता उपयोगात आणायचे आहे. कसेबसे उपलब्ध होणारे पाणी डिसेंबर-जानेवारीपर्यंत पुरेल यानंतर गंभीर संकट निर्माण होणार असल्याचे सरपंच घासीराम पटले यांनी सांगीतले.इंदिरानगराची समस्या गंभीरइंदिरानगर (सर्राटोली) येथे ५० घरांची वस्ती असून पिण्याच्या पाण्यासाठी आजही कठीण स्थिती आहे. या ठिकाणी विहिरी व अनेक बोअरवेल खोदण्यात आल्या. परंतु कोठेही पाणी लागले नाही. सर्रा गावात दोन एकर शेती लावण्यात आली होती. ती सुद्धा पाण्याअभावी नष्ट झाली.अधिकाºयांची भेट नाहीकान्होबा विसर्जनावेळी माजी आमदार दिलीप बन्सोड यांनी गावाला भेट दिली होती. यावेळी पं.स.सभापती उषा किंदरले आणि जि.प. सदस्या सुनीता मडावी यांनी भेट दिली होती. त्यानंतर कोणत्याही अधिकाºयांनी भेट तर दूर साधी विचारपूस करण्यात आली नाही असे सरपंच पटले यांनी सांगितले.रोजगार उपलब्ध करावेसतत दोन वर्षापासून सर्रा गावासहित परिसरात दुष्काळाचे संकट नागरिक झेलत आहेत. शेतात धान्य नसल्याने प्रशासनाने तात्काळ रोजगार उपलब्ध करुन दयावे अशी मागणी उपसरपंच पुष्पराज पारधी, सदस्य हस्तकला येडे, जयदेव गौतम, कंठीलाल पटले, पो.पा. कुंवरलाल पटले, भाऊदास पटले आणि तंमुस अध्यक्ष पुरनलाल पारधी यांनी केली आहे.