शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
4
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
5
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
6
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
7
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
8
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
12
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
13
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
14
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
15
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
16
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
17
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
18
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
19
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
20
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी

चुलबंद जलाशयातील पाण्याचा अपव्यय

By admin | Updated: August 13, 2014 23:57 IST

सडक/अर्जुनी तालुक्यातील चुलबंद जलाशयाचे पाणी चुलबंद ते बिर्सी व पांढरी ते म्हसवाणी कालव्याच्या माध्यमातून जात असते. चुलबंद जलाशय सध्या ८० ते ८५ टक्के पुर्ण भरलेले आहे.

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : शेतकरी व मासेमाऱ्यांना फटका पांढरी : सडक/अर्जुनी तालुक्यातील चुलबंद जलाशयाचे पाणी चुलबंद ते बिर्सी व पांढरी ते म्हसवाणी कालव्याच्या माध्यमातून जात असते. चुलबंद जलाशय सध्या ८० ते ८५ टक्के पुर्ण भरलेले आहे. पण रपट्यावरुन पाणी व्यर्थ वाया जात असल्याचे चित्र आहे. हे पाणी शेतीच्या उपयोगात न येता नाल्यात वाहत जात असून त्याचा अपव्यय होत आहे. या गंभीर प्रकाराकडे मात्र येथील अभियंता बघ्याची भूमिका घेत आहेत. मागील १० वर्षांपासून कालव्याची सफाई करण्यात आली नसल्याने पांढरी ते म्हसवानी जाणारा कालवा पहिल्या पाण्यामुळे फोडला गेला. त्यामुळे पांढरी परिसरातील शेतकऱ्यांचे रोवणे व परे वाहून गेले. याचा जबाबदार कोण? याचा मोबदला चुलबंद जलाशय विभाग करणार काय? या परिसरामध्ये पुर्वी अभियंता झा कार्यरत असताना कालव्याची व रपट्याची सफाई होत असत. परंतु ते गेल्यानंतर येथे येणारे अभियंता मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. सुरूवातीपासूनच कालवा फुटलेला आहे. हे मात्र त्यांच्या नजरेत येत नाही. चुलबंद जलाशयामध्ये मोठ्या प्रमाणात मत्स व्यवसाय चालत असतो. रपट्यावरुन पाणी जात असल्यामुळे येथील मासे सुद्धा नाल्यात वाहून जात आहे. यामुळे मात्र या जलाशयात मासे टाकणाऱ्या मत्स संस्थांचे चांगलेच नुकसान होत आहे. अगोरदरच मत्स्य व्यवसाय डबघाईस निघालेला असताना अशा प्रकारे मासेमारांचे नुकसान होत असल्याचे दिसते. यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या सर्व प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. तसेच लवकरात लवकर दुरूस्ती करून पाण्याचा अपव्यय थांबावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे (वार्ताहर)