शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
3
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
4
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
5
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
6
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
7
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
8
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
9
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
10
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
11
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
12
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
13
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
14
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
15
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
16
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
17
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
18
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
19
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

चुलबंद जलाशयातील पाण्याचा अपव्यय

By admin | Updated: August 13, 2014 23:57 IST

सडक/अर्जुनी तालुक्यातील चुलबंद जलाशयाचे पाणी चुलबंद ते बिर्सी व पांढरी ते म्हसवाणी कालव्याच्या माध्यमातून जात असते. चुलबंद जलाशय सध्या ८० ते ८५ टक्के पुर्ण भरलेले आहे.

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : शेतकरी व मासेमाऱ्यांना फटका पांढरी : सडक/अर्जुनी तालुक्यातील चुलबंद जलाशयाचे पाणी चुलबंद ते बिर्सी व पांढरी ते म्हसवाणी कालव्याच्या माध्यमातून जात असते. चुलबंद जलाशय सध्या ८० ते ८५ टक्के पुर्ण भरलेले आहे. पण रपट्यावरुन पाणी व्यर्थ वाया जात असल्याचे चित्र आहे. हे पाणी शेतीच्या उपयोगात न येता नाल्यात वाहत जात असून त्याचा अपव्यय होत आहे. या गंभीर प्रकाराकडे मात्र येथील अभियंता बघ्याची भूमिका घेत आहेत. मागील १० वर्षांपासून कालव्याची सफाई करण्यात आली नसल्याने पांढरी ते म्हसवानी जाणारा कालवा पहिल्या पाण्यामुळे फोडला गेला. त्यामुळे पांढरी परिसरातील शेतकऱ्यांचे रोवणे व परे वाहून गेले. याचा जबाबदार कोण? याचा मोबदला चुलबंद जलाशय विभाग करणार काय? या परिसरामध्ये पुर्वी अभियंता झा कार्यरत असताना कालव्याची व रपट्याची सफाई होत असत. परंतु ते गेल्यानंतर येथे येणारे अभियंता मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. सुरूवातीपासूनच कालवा फुटलेला आहे. हे मात्र त्यांच्या नजरेत येत नाही. चुलबंद जलाशयामध्ये मोठ्या प्रमाणात मत्स व्यवसाय चालत असतो. रपट्यावरुन पाणी जात असल्यामुळे येथील मासे सुद्धा नाल्यात वाहून जात आहे. यामुळे मात्र या जलाशयात मासे टाकणाऱ्या मत्स संस्थांचे चांगलेच नुकसान होत आहे. अगोरदरच मत्स्य व्यवसाय डबघाईस निघालेला असताना अशा प्रकारे मासेमारांचे नुकसान होत असल्याचे दिसते. यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या सर्व प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. तसेच लवकरात लवकर दुरूस्ती करून पाण्याचा अपव्यय थांबावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे (वार्ताहर)