शहरं
Join us  
Trending Stories
1
Corona Virus : धोक्याची घंटा! कोरोना थैमान घालणार?, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
2
CPEC चा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत होणार, पाकिस्तानच्या सहकार्याने चीनचा नवी खेळी
3
ज्योती मल्होत्रा जिथे जिथे जाऊन आली तिथे तिथे पाकिस्तानचे ऑपरेशन सिंदूरवेळी हल्ले? गोल्डन टेंपल, पठाणकोट अन् काश्मीर...
4
“शिष्टमंडळ पाठवून काही फायदा नाही, चीन, श्रीलंका, तुर्कस्थानात कुणाला पाठवले का?”: संजय राऊत
5
चेक बाउन्स झाला तर आता काही खरं नाही! सरकारचे नवे नियम, दुप्पट दंड ते तुरुंगापर्यंतची शिक्षा!
6
कधीकाळी पाकिस्तानात राहत होते ज्योती मल्होत्राचे कुटुंब?; तपासात समोर आली नवी माहिती
7
IPL 2025: सीएसकेच्या पराभवानंतर माजी क्रिकेटपटू संजय बांगर धोनीवर भडकले, म्हणाले...
8
"बिहार निवडणुकीसाठी भाजपाची खेळी..."; पहलगाम हल्ल्यावर काय म्हणाले यशवंत सिन्हा?
9
“मुंबईकर उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवतील, मविआच्या ५० जागाही येणार नाही”; भाजपाचा दावा
10
सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २६ नक्षली ठार
11
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची पहिली झलक समोर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
12
मल्टीबॅगर शेअर, 75 देशांमध्ये Tejas चा व्यवसाय; आता मिळाली ₹1526 कोटींची ऑर्डर
13
अबुझमाडमध्ये २७ नक्षल्यांना कंठस्नान; पाेलीस शहीद, १ काेटी बक्षीस असलेल्या बसवा राजूचा खात्मा
14
तुर्की अन् अझरबैजानला धक्का; भारताने आर्मेनियासोबत केला आकाश 1-एस क्षेपणास्त्र करार
15
इंग्रजी फाडफाड येत नाही, प्रश्नच मिटला! तुम्ही बोला, गुगल समोरच्याला त्याच्या भाषेत ऐकवणार...
16
पूजा खेडकर हिला मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
17
Jyoti Malhotra : "पाकिस्तानात माझं लग्न करुन द्या"; ज्योती मल्होत्राचं अली हसनसोबतच व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल
18
सोनिया आणि राहुल गांधी यांना झाला १४२ कोटींचा फायदा, नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीचा कोर्टात आरोप   
19
मुलांचं लग्न जमवताना एकमेकांच्या प्रेमात पडले व्याही आणि विहीण! लग्नासाठी कोर्टात पोहोचले पण... 
20
डॉक्टर की कसाई...! ५० जणांच्या हत्येनंतरही हात थरथरले नाहीत; अंगावर काटा आणणारी थरारक घटना

तंटामुक्तीच्या बाटली बंद संस्कृतीवर पाणी फेरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:29 IST

गोंदिया: दारुच्या बाटलीमुळे अनेक संसार उद्ध्वस्त झालेत. अनेक संसार तुटण्याच्या मार्गावर असल्याचे पाहून जिल्ह्यातील महिला बचत गट व महात्मा ...

गोंदिया: दारुच्या बाटलीमुळे अनेक संसार उद्ध्वस्त झालेत. अनेक संसार तुटण्याच्या मार्गावर असल्याचे पाहून जिल्ह्यातील महिला बचत गट व महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील २४१ गावांत दारुबंदी झाली होती. दारुबंदीसोबतच गावांत चालणाऱ्या सट्टा, जुगार व इतर अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी तंटामुक्त समित्यांनी कंबर कसली होती. परंतु तंटामुक्त समित्यांनी केलेल्या बाटलीबंद संस्कृतीला पुन्हा सुरूवात झाली आहे.

दारूमुळे घराघरात होणारे भांडण, दारूपायी घरात आलेल्या दारिद्रयामुळे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. दारुपायी अनेक घरे भंगली आहेत. गावातील ही विदारक परिस्थिती पाहून गावाचे चित्र पालटण्यासाठी महिला महत्त्वाची भूमिका बजावितात. त्यामुळेच गावातील महिलांना हाताशी घेऊन महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी गावात दारूबंदी केली होती.? गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या दोन गावात, गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या २७ गावांत, आमगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ३६ गावात, सालेकसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १६ गावात, तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ४१ गावात, गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या १९ गावांत, डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत २१ गावांत, केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सात गावांत, अर्जुनी/मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ११ गावांत, नवेगावबांध पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या १४ गावांत, गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या आठ गावात, दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नऊ गावांत तर चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या १८ गावांत दारूबंदी करण्यात आली होती.? गावातील अवैध धंदे बंद करण्यासाठी तंटामुक्त गाव समितीचे पदाधिकारी जोमाने कार्य मात्र काही राजकारण्यांनी, गुंडानी त्यांना दडपण्याचा प्रयत्न केला. परंतु राजकारण्यांचे न ऐकता तंटामुक्त समित्यांनी गोंदिया जिल्ह्यातील २४१ गावात ठराव घेऊन दारूबंदी केली होती.?

.......

शासनाच्या धोरणाने समित्या थंडबस्त्यात

परंतु महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने समित्यांनी अवैध दारूबंदीकडे दुर्लक्ष केले आहे. दारुबंदी करणाऱ्या गावात मद्य प्राशन करून धिंगाणा घालणाऱ्यावर, दारू विक्री करताना आढळलेल्या इसमांवर दंड आकारला जात होता. दारू विक्रेत्यांची दारू पकडणाऱ्या गावकऱ्यांना बक्षीस देण्याची योजना अंमलात आणली होती. परंतु आता या संस्कृतीवर पाणी फेरण्यात आले. ग्रामीण भागात व तंटामुक्त समित्यांनी बदं केलेली दारू पुन्हा जोमाने सुरू झाली आहे.