शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

बोअरमुळे वाढणार पाणी टंचाईची समस्या

By admin | Updated: March 6, 2015 01:45 IST

शासनाने गावा-गावात पाणी समस्या निर्माण होऊ नये म्हणून विविध उपाययोजनांच्या माध्यमातून जलस्त्रोत विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे.

केशोरी : शासनाने गावा-गावात पाणी समस्या निर्माण होऊ नये म्हणून विविध उपाययोजनांच्या माध्यमातून जलस्त्रोत विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक शेतकरी विनापरवानगी एका शेतात दोन-तीन ठिकाणी मशीनव्दारे बोअर करून पाण्याचा उपसा अधिक प्रमाणात करीत आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी वापरात येणाऱ्या गावातील विहिरींची पाण्याची पातळी कमी होऊन त्या आटत चालल्या आहेत. या प्रकाराने उन्हाळ्यात केशोरी येथे पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.या परिसरात पाण्याची सिंचन व्यवस्था नसतानासुध्दा या भागातील शेतकरी उन्हाळी धानपीक घेतात. धानासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी वापरण्यात येत आहे. तसेच एका बोअरवेलमधून पाणी पुरत नसल्याचे सांगून एक शेतकरी एका शेतावर दोन-दोन, तीन-तीन मशीनव्दारे बोअर करून जमिनीच्या भूगर्भातील पाण्याचा उपसा आवश्यकतेपेक्षा अधिक करीत आहेत.केशोरी येथील पिण्याच्या पाण्यासाठी वापरात असलेल्या विहिरीतील पाण्याची पातळी कमी होवून विहिरी पूर्णत: आटत चालल्या आहेत. आता फक्त मार्च महिना सुरू आहे. पूर्ण उन्हाळा अजून शिल्लक आहे. आताच विहिरीमधील पाणी आटत चालल्याने वेळीच प्रशासनाने याची दखल घेणे अपेक्षित आहे. अन्यथा मोठ्या भिषण संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही व पाण्यासाठी वनवन भटकावे लागेल.विनापरवानगीने शेतात बोअर खोदण्याऱ्या शेतकऱ्यांना जमिनीतील पाण्याचा उपसा करण्यास बंदी घालण्यात यावी आणि गावाशेजारी लागून असलेल्या जमिनीमध्ये बोअर मारण्यास शासनाने परवानगी देऊ नये, अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. (वार्ताहर)