शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाणी टंचाई कृती आराखडा फिस्कटला

By admin | Updated: May 11, 2014 23:49 IST

उन्हाळ््यात जिल्ह्यातील ग्रामीण भागात निर्माण होणार्‍या पाणी टंचाईला लक्षात घेता जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने पाणी टंचाईसदृश गावांसाठी पाणी टंचाई कृती आराखडा तयार केला होता.

गोंदिया : उन्हाळ््यात जिल्ह्यातील ग्रामीण भागात निर्माण होणार्‍या पाणी टंचाईला लक्षात घेता जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने पाणी टंचाईसदृश गावांसाठी पाणी टंचाई कृती आराखडा तयार केला होता. जिल्ह्यातील ८२ गावे व २२ वाड्यांसाठी १११ उपाययोजनांचा या आराखड्यात समावेश होता. मात्र धक्कादायक बाब अशी की, या आराखड्याचे सर्वेक्षणच अद्याप पूर्ण झालेले नाही. यामुळे यंदाचा हा कृती आराखडा फिस्कटल्याचे चित्र असून पावसाळा सुरू झाल्यावर यावरील कृतीचा गावकर्‍यांना काय लाभ मिळणार, असा सवाल येथे उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यात उन्हाळा चांगलाच तापतो व ग्रामीण भागात कित्येक गावांत पाणी पेटत असते. यावर जिल्हा परिषद ग्रामीण पुरवठा विभाग पंचायत समित्यांकडून पाणी टंचाई निर्माण होणार्‍या गावांची यादी मागविते. पंचायत समित्यांकडून आलेल्या यादीच्या आधारे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने जिल्ह्याचा पाणी टंचाई कृती आराखडा तयार केला. यामध्ये ८२ गावे व २२ वाड्यांसाठी १११ उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये नवीन विंधन विहीर, नळ योजना विशेष दुरूस्ती, विहीर खोलीकरण/इनवेल बोअर, खासगी विहीर अधिग्रहण आदी उपाययोजना करावयाच्या आहेत. आराखड्यात समाविष्ट गावे व वाड्यांची तालुकानिहाय आकडेवारी बघितल्यास, गोंदिया तालुक्यात १६ गावे व ४ वाड्या, गोरेगाव ७ गावे व ४ वाड्या, सडक अर्जुुनी ४ गावे व ३ वाड्या, अर्जुनी मोरगाव १८ गावे, तिरोडा १० गावे, सालेकसा ५ वाड्या, देवरी १७ गावे व ३ वाड्या तर आमगाव तालुक्यात ९ गावे व २ वाड्यांचा समावेश आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने तयार केलेल्या या आराखड्यातील गावांचे प्रथम विभागाच्या भूवैज्ञानिकांकडून सर्वेक्षण करवून खरच या गावांत उपाययोजनांची गरज आहे काय जाणून घेतले जाते. यासाठी विभागाकडे सहायक भूवैज्ञानिक रेखा गजभिये, कनिष्ठ भूवैज्ञानिक विशाल मंत्री व अमोल बालपांडे असे तीन कर्मचारी आहेत. ते गरज असलेल्या ठिकाणी उपाययोजना असल्याची शिफारस अथवा केलेली मागणी रद्द करतात. भूवैज्ञानिकांनी तयार केलेला हा अहवाल अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकार्‍यांकडे जातो व त्यांच्या मंजुरीनंतर त्यावर खर्‍या अर्थाने उपाययोजना करण्यास सुरूवात होते. येथे मात्र विभागाच्या भूवैज्ञानिकांकडून आराखड्यातील गावांचे सर्वेक्षण अद्याप पूर्ण झालेच नसल्याची माहिती आहे. मध्यंतरी आलेल्या लोकसभा निवडणूक व निवडणुकीच्या आचारसंहितेचा तसाही सर्वच शासकीय कार्यालयांकडे एक बहाणा यंदा उपलब्ध आहे. त्यानुसार यांनीही आपले उत्तर दिलेच आहे. ते काही असो, मात्र आता पावसाळा तोंडावर आला असून कधी सर्वेक्षण पूर्ण होणार व त्यांचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांकडे जाणार. शिवाय त्यावर जिल्हाधिकारी कधी मंजुरी देणार ही एक लांबलचक प्रक्रिया अद्याप शिल्लक आहे. अशात मात्र पावसाळा आता तोंडावर आला असून पाऊस सुरू झाल्यावर आपोआपच विंधन विहीर व विहिरींना पाणी लागून गावातील पाणी टंचाई संपुष्टात येणार. तर या आराखड्याच्या खटाटोपाचा अर्थच काय निघणार. यावरून यंदाचा पाणी टंचाई कृती आराखडा चक्क फिस्कटला असून ग्रामीणांचे तोंड बंद ठेवण्यासाठी चालविलेला एक खेळच असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. (शहर प्रतिनिधी)