शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

जिल्ह्यातील १६०० अंगणवाड्यांत उन्हाळ्यापूर्वीच जलसंकट (डमी)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:39 IST

गोंदिया: चिमुकल्या बालकांना शिक्षणाची गोडी लागावी, यासाठी त्यांना दोन अडीच वर्षातच अंगणवाडीत पाठविले जाते. परंतु अंगणवाडीत जाणाऱ्या चिमुकल्या मुलांना ...

गोंदिया: चिमुकल्या बालकांना शिक्षणाची गोडी लागावी, यासाठी त्यांना दोन अडीच वर्षातच अंगणवाडीत पाठविले जाते. परंतु अंगणवाडीत जाणाऱ्या चिमुकल्या मुलांना शुद्ध पाणी मिळत नसल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. चिमुकल्या कळ्यांना बहरण्यासाठी पोषक वातावरण देण्यापेक्षा दूषित पाण्यातून त्यांची वाढ करण्याचा प्रकार जिल्ह्यातून दिसून येत आहे. जिल्ह्यातील १८०५ अंगणवाड्यांपैकी तब्बल १६०० अंगणवाड्यांमध्ये नळ जोडणी केलेल्या नसल्यामुळे हातपंप, विहिरी किंवा अन्य स्त्रोतातून चिमुकल्यांची तहान भागवावी लागत आहे. जिल्ह्यातील १८०५ अंगणवाडीपैकी २०५ अंगणवाडीमध्ये नळ जोडण्या करण्यात आलेल्या आहेत. तर १ हजार ६०० अंगणवाड्यांना नळ जोडणी केलेली नाही. त्यामुळे या चिमुकल्यांना शुद्ध पाणी कसे मिळेल असा प्रश्न उपस्थित होत आहे. उन्हाळ्यापूर्वीच जिल्ह्यातील १६०० अंगणवाडीत जलसंकट निर्माण झाले आहे. त्यात गोंदिया तालुक्यातील ३४३ अंगणवाड्यांमध्ये नळजोडणी नाही. अर्जुनी- मोरगाव तालुक्यातील २०३, सालेकसा तालुक्यातील १८०, देवरी तालुक्यातील १९१, सडक अर्जुनी तालुक्यातील १६५, आमगाव तालुक्यातील १५३, तिरोडा तालुक्यातील १८२, गोरेगाव तालुक्यातील १८४ असे एकूण १६०० अंगणवाड्यात नळजोडणी करण्यात आली नाही.

बॉक्स

तालुका अंगणवाड्या नळ जोडण्या नसलेल्या अंगणवाड्या

गोंदिया १ २०९ - १९२

गोंदिया-२ १६१ १५१

सालेकसा २०१ २०३

अर्जुनी-मोरगाव २३० १८०

देवरी २१९ १९१

सडक-अर्जुनी १८९ १६४

आमगाव १७८ १५३

तिरोडा २१४ १८२

गोरेगाव २०४ १८४

एकूण १८०५ १६००

.........

एकूण आंगणवाड्या १८०५

नळ जोडणी नसलेल्या आंगणवाड्या १६००

.......