शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

वीज पुरवठ्याअभावी ‘जलसंकट’ ओढविणार

By admin | Updated: July 15, 2016 02:11 IST

चांदपुर जलाशयात बावनथडी नदी पात्रातून सोंड्याटोला प्रकल्पाद्वारे पाणी उपसा करण्याचा कालावधी सुरू झाला आहे.

चुल्हाड (सिहोरा) : चांदपुर जलाशयात बावनथडी नदी पात्रातून सोंड्याटोला प्रकल्पाद्वारे पाणी उपसा करण्याचा कालावधी सुरू झाला आहे. खंडीत वीज पुरवठा सुरू करण्यात आला नाही. यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांनी शासनाला पावसाळा संपल्यानंतर वीज पुरवठा सुरू करणार कां, असा संतप्त सवाल केला आहे. सिहोरा परिसरातील १४ हजार हेक्टर आर शेती ओलीताखाली आणण्यासाठी युती शासनाच्या काळात बावनथडी नदीवर सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प मंजुर करण्यात आला. या प्रकल्पाने नदी पात्रातून उपसा करण्यात आलेले पाणी चांदपुर जलाशयात साठवणूक करण्यात येत आहे. बावनथडी नदीचे पात्र बारमाही वाहणारे नसल्याने पावसाळ्यात प्रकल्पाच्या माध्यमातून पाण्याचा उपसा करण्याचे नियोजन आहे. जुलै महिन्यात नदी पात्रातून पाण्याचा उपसा करण्यासाठी धरणाचे दरवाजे बंद करण्यात येते. परंतु यंदा या प्रकल्पाचे भवितव्य व चित्र उलटे झाले आहे. वीज बिलाचे देयक करण्यात आले नसल्याने गेल्या वर्षापासून प्रकल्पाचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आलेला आहे. पावसाने चांदपुर जलाशय भरण्याची आशा मावळली आहे. ३५-४० कि़मी. अंतरपर्यंत लांब असणाऱ्या लाभनडोह नाल्यावर जागोजागी सिमेंट प्लग बंधारे बांधण्यात आले आहे. यामुळे जलाशयात येणारा पाणी या बंधाऱ्यांनी अडविला आहे. या शिवाय बावनथडी नदी पात्रात आठ महिनेपर्यंत वाहणारे पात्र महिन्यावर आले आहे. राजीव सागर धरणाने पाणी अडविले आहे. यामुळे नदीचे पात्रात वाहणाऱ्या पाण्याने स्त्रोत बंदावस्थेत आले आहे. नदीच्या काठालगत असणाऱ्या गावातून येणारे पाणी आता स्त्रोत झाले आहे. यामुळे अल्प असणारे पाणी अत्यंत आवश्यकतेचे झाले आहे. नैसर्गीक पावसावर शेतकरी धानाची रोवणी करीत असले तरी या धान पिकाला जलाशयाचे पाणी दोनदा वाटप करण्यात येत आहे. जुलै महिन्याचा पंधरवाडा संपला असताना चांदपुर जलाशयात ३५ फुट पाण्याची साठवणूक क्षमता असताना फक्त आठ फुट पाण्याची साठवणूक झाली आहे. यामुळे येत्या पाणी वाटपाच्या अंतिम कालावधीत शेतकऱ्यांना पाण्यासाठी संकटांचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे शासनाने याची वेळीच दखल घेवून वीज पुरवठा सुरू करावा. (वार्ताहर)