शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
2
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
3
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
5
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
6
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
7
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
8
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
9
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
10
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
11
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
12
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
13
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
14
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
15
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
16
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
17
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
18
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
19
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
20
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”

वीज पुरवठ्याअभावी ‘जलसंकट’ ओढविणार

By admin | Updated: July 15, 2016 02:11 IST

चांदपुर जलाशयात बावनथडी नदी पात्रातून सोंड्याटोला प्रकल्पाद्वारे पाणी उपसा करण्याचा कालावधी सुरू झाला आहे.

चुल्हाड (सिहोरा) : चांदपुर जलाशयात बावनथडी नदी पात्रातून सोंड्याटोला प्रकल्पाद्वारे पाणी उपसा करण्याचा कालावधी सुरू झाला आहे. खंडीत वीज पुरवठा सुरू करण्यात आला नाही. यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांनी शासनाला पावसाळा संपल्यानंतर वीज पुरवठा सुरू करणार कां, असा संतप्त सवाल केला आहे. सिहोरा परिसरातील १४ हजार हेक्टर आर शेती ओलीताखाली आणण्यासाठी युती शासनाच्या काळात बावनथडी नदीवर सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प मंजुर करण्यात आला. या प्रकल्पाने नदी पात्रातून उपसा करण्यात आलेले पाणी चांदपुर जलाशयात साठवणूक करण्यात येत आहे. बावनथडी नदीचे पात्र बारमाही वाहणारे नसल्याने पावसाळ्यात प्रकल्पाच्या माध्यमातून पाण्याचा उपसा करण्याचे नियोजन आहे. जुलै महिन्यात नदी पात्रातून पाण्याचा उपसा करण्यासाठी धरणाचे दरवाजे बंद करण्यात येते. परंतु यंदा या प्रकल्पाचे भवितव्य व चित्र उलटे झाले आहे. वीज बिलाचे देयक करण्यात आले नसल्याने गेल्या वर्षापासून प्रकल्पाचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आलेला आहे. पावसाने चांदपुर जलाशय भरण्याची आशा मावळली आहे. ३५-४० कि़मी. अंतरपर्यंत लांब असणाऱ्या लाभनडोह नाल्यावर जागोजागी सिमेंट प्लग बंधारे बांधण्यात आले आहे. यामुळे जलाशयात येणारा पाणी या बंधाऱ्यांनी अडविला आहे. या शिवाय बावनथडी नदी पात्रात आठ महिनेपर्यंत वाहणारे पात्र महिन्यावर आले आहे. राजीव सागर धरणाने पाणी अडविले आहे. यामुळे नदीचे पात्रात वाहणाऱ्या पाण्याने स्त्रोत बंदावस्थेत आले आहे. नदीच्या काठालगत असणाऱ्या गावातून येणारे पाणी आता स्त्रोत झाले आहे. यामुळे अल्प असणारे पाणी अत्यंत आवश्यकतेचे झाले आहे. नैसर्गीक पावसावर शेतकरी धानाची रोवणी करीत असले तरी या धान पिकाला जलाशयाचे पाणी दोनदा वाटप करण्यात येत आहे. जुलै महिन्याचा पंधरवाडा संपला असताना चांदपुर जलाशयात ३५ फुट पाण्याची साठवणूक क्षमता असताना फक्त आठ फुट पाण्याची साठवणूक झाली आहे. यामुळे येत्या पाणी वाटपाच्या अंतिम कालावधीत शेतकऱ्यांना पाण्यासाठी संकटांचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे शासनाने याची वेळीच दखल घेवून वीज पुरवठा सुरू करावा. (वार्ताहर)