शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

धापेवाड्याचे पाणी जाणार वाया?

By admin | Updated: June 3, 2016 01:37 IST

तिरोडा येथील धापेवाडा सिंचन प्रकल्पाच्या टप्पा १ च्या बॅरेजमध्ये सध्याच्या स्थितीत १.८४ दलघमी पाणी शिल्लक आहे.

साठा असूनही उपयोग नाही : १.३ दलघमी पाणी अतिरिक्तगोंदिया : तिरोडा येथील धापेवाडा सिंचन प्रकल्पाच्या टप्पा १ च्या बॅरेजमध्ये सध्याच्या स्थितीत १.८४ दलघमी पाणी शिल्लक आहे. बावनथडीतून दोन वेळा पाणी सोडल्यामुळे वैनगंगेच्या वाहत्या पाण्याचा तिथे जलसंचय सुरूच आहे. मात्र येथील अतिरिक्त ठरणारे पाणी इतर कोणत्याही उपयोगात न आणता केवळ पिण्यासाठीच वापरल्या जात असल्यामुळे ते पाणी बिनकामाचे ठरणार आहे.तिरोडा शहर आणि परिसराला ३० जूनपर्यंत पिण्याकरिता केवळ ०.५ दलघमी पाण्याची आवश्यकता आहे. जून अखेरपर्यंत जिल्ह्यात पावसाचे पाणी बरसणार आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे नियोजन करताना जून अखेरपर्यंत पाणी पुरवठा करता येईल एवढ्या पाण्याची व्यवस्था केली जाते. त्यानुसार धापेवाडा प्रकल्पात पिण्याचे पाणी राखीव ठेवल्यानंतर १.३ दलघमी पाणी शिल्लक राहते. सध्या शेतात खरीप हंगामाचे नियोजन केले जात असल्यामुळे शेतीला पाण्याची गरज नाही. अशा परिस्थितीत हे पाणी वीज निर्मितीसाठी अदानी उद्योग समुहाला दिल्यास काही प्रमाणात राज्याची विजेची गरज पूर्ण होऊ शकते. मात्र त्यादृष्टीने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाकडून कोणताही पुढाकार घेतला जात नसल्याचे दिसून येत आहे.वास्तविक उन्हाळ्यातील विजेची गरज लक्षात घेता अदानी प्रकल्पातील वीज निर्मिती बंद पडू नये म्हणून मुख्यमंत्र्यांसह जलसंपदा विभागाच्या यंत्रणेने मध्यप्रदेश सरकारला विनंती करून बावनथडी प्रकल्पाचे पाणी दोन वेळा वैनगंगेच्या पात्रात सोडले. सुरूवातीला सोडलेले पाणी धापेवाडापर्यंत पोहोचण्याआधीच मुरले. मात्र नंतरचे पाणी बऱ्याच प्रमाणात धापेवाड्यात दाखल झाले. त्यानंतरही वैनगंगेचे वाहते पाणी धापेवाड्यात येणे सुरूच असल्यामुळे पाणीसाठा वाढत असल्याचे धापेवाडा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे पिण्यासाठी राखीव ठेवूनही अदानी प्रकल्पाच्या वीज निर्मितीसाठी पाणी देणे शक्य होणार आहे. पिण्यासाठी राखीव ठेवल्यानंतर शिल्लक राहणारे १.३ दलघमी पाणी कोणत्याच उपयोगात न आणल्यास त्यातील बहुतांश पाणी बाष्पिभवन होऊन वाया जाणार आहे. त्याऐवजी ते वीज निर्मितीच्या उपयोगात आणल्यास राज्याला वीज मिळेल, अशी अपेक्षा अनेक सुज्ञ लोक व्यक्त करीत आहेत.यासंदर्भात विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून त्यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी मोबाईल कॉल स्वीकारलाच नाही. या प्रकरणी जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)