शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

परतून आलेल्या पावसाची धो-धो

By admin | Updated: September 8, 2014 00:33 IST

दडी मारून बसलेल्या पावसाने अचानक आपली हजेरी लाऊन शेतकऱ्यांसह सर्वांना सुखावून सोडले. मागील चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस परतून आला आहे.

गोंदिया : दडी मारून बसलेल्या पावसाने अचानक आपली हजेरी लाऊन शेतकऱ्यांसह सर्वांना सुखावून सोडले. मागील चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस परतून आला आहे. मात्र शनिवारी (दि.६) रात्री पासून बरसत असलेल्या पावसाने रविवारीही (दि.७) हजेरी लावली. जिल्ह्यातील आठही तालुक्यात हा पाऊस बरसत होता. धान पिकासाठी पाण्याची खूप गरज असतानाच जिल्ह्यात शनिवारी (दि.६) पडलेल्या पावसाने शेतकरी सुखावले आहेत. काही दिवसांपासून पाऊस न आल्याने पीक हातून जाणार की काय, या चिंतेने शेतकरी त्रस्त झाले होते.मात्र मागील चार-पाच दिवसांपासून वरूणराज पुन्हा बरसू लागले. त्यात मागील २४ तासात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत हलका पाऊस नोंदविण्यात आला आहे. रविवारी (दि.७) सकाळी ८ वाजतापर्यंत गोंदिया तालुक्यात ७.२ मिमी., गोरेगाव येथे ७, तिरोडा येथे ३, अर्जुनी/मोरगाव येथे ३, देवरी येथे ३०, आमगाव येथे ९.४, सालेकसा येथे २१ व सडक/अर्जुनी येथे २५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण १०५ मिमी. पाऊस नोंद करण्यात आला आहे. त्याची सरासरी १३.२ मिमी आहे. या पावसामुळे ज्या क्षेत्रात सिंचनाची सोय नाही त्या क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या धानपिकांना लाभ होणार आहे. विशेष म्हणजे रविवारच्या पावसाने अवघ्या जिल्ह्याला झोडपून काढले आहे. देवरी तालुक्यात पावसाची रिमझीम वगळल्यास अन्य सातही तालुक्यांत चांगला पाऊस बरसल्याची माहिती आहे. रात्रीपर्यंत पावसाची ही रिपरिप सुरूच होती. या पावसामुळे शेतकरी सुखावला असतानाच जिल्ह्यातील धरणांतही पाण्याच्या साठ्यात वाढ होण्यात मदत होणार आहे. (शहर प्रतिनिधी)