शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

परतून आलेल्या पावसाची धो-धो

By admin | Updated: September 8, 2014 00:33 IST

दडी मारून बसलेल्या पावसाने अचानक आपली हजेरी लाऊन शेतकऱ्यांसह सर्वांना सुखावून सोडले. मागील चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस परतून आला आहे.

गोंदिया : दडी मारून बसलेल्या पावसाने अचानक आपली हजेरी लाऊन शेतकऱ्यांसह सर्वांना सुखावून सोडले. मागील चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस परतून आला आहे. मात्र शनिवारी (दि.६) रात्री पासून बरसत असलेल्या पावसाने रविवारीही (दि.७) हजेरी लावली. जिल्ह्यातील आठही तालुक्यात हा पाऊस बरसत होता. धान पिकासाठी पाण्याची खूप गरज असतानाच जिल्ह्यात शनिवारी (दि.६) पडलेल्या पावसाने शेतकरी सुखावले आहेत. काही दिवसांपासून पाऊस न आल्याने पीक हातून जाणार की काय, या चिंतेने शेतकरी त्रस्त झाले होते.मात्र मागील चार-पाच दिवसांपासून वरूणराज पुन्हा बरसू लागले. त्यात मागील २४ तासात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत हलका पाऊस नोंदविण्यात आला आहे. रविवारी (दि.७) सकाळी ८ वाजतापर्यंत गोंदिया तालुक्यात ७.२ मिमी., गोरेगाव येथे ७, तिरोडा येथे ३, अर्जुनी/मोरगाव येथे ३, देवरी येथे ३०, आमगाव येथे ९.४, सालेकसा येथे २१ व सडक/अर्जुनी येथे २५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण १०५ मिमी. पाऊस नोंद करण्यात आला आहे. त्याची सरासरी १३.२ मिमी आहे. या पावसामुळे ज्या क्षेत्रात सिंचनाची सोय नाही त्या क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या धानपिकांना लाभ होणार आहे. विशेष म्हणजे रविवारच्या पावसाने अवघ्या जिल्ह्याला झोडपून काढले आहे. देवरी तालुक्यात पावसाची रिमझीम वगळल्यास अन्य सातही तालुक्यांत चांगला पाऊस बरसल्याची माहिती आहे. रात्रीपर्यंत पावसाची ही रिपरिप सुरूच होती. या पावसामुळे शेतकरी सुखावला असतानाच जिल्ह्यातील धरणांतही पाण्याच्या साठ्यात वाढ होण्यात मदत होणार आहे. (शहर प्रतिनिधी)