शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

निरंतर स्वच्छतेचा मंत्र गावकऱ्यांनी जपला पाहिजे

By admin | Updated: March 25, 2017 01:36 IST

प्रत्येकाने स्वच्छतेचे महत्त्व समजावून घेवून व्यक्तिगत जीवनाबरोबरच सामाजिक जीवनात सुद्धा स्वच्छता राखावी.

उषा मेंढे : ग्राम स्वच्छता समितीकडून गांधीटोला गावाची पाहणी ेसाखरीटोला : प्रत्येकाने स्वच्छतेचे महत्त्व समजावून घेवून व्यक्तिगत जीवनाबरोबरच सामाजिक जीवनात सुद्धा स्वच्छता राखावी. स्वच्छतेचे विविध फायदे असून गावागावांत स्वच्छता मोहीम राबविली जावी. यासाठी शासनाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सुरू केले असून स्वच्छता ही एका दिवसासाठी नाही तर निरंतर असावी म्हणून निरंतर स्वच्छतेचा मंत्र गावकऱ्यांनी जपला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हापरिषद अध्यक्ष उषा मेंढे यांनी केले. गांधीटोला येथे मंगळवारी (दि.२१) संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता जिल्हास्तरीय चमूने भेट देत पाहणी केली असता त्या बोलत होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जि.प. सदस्य लता दोनोडे, सभापती हिरालाल फाफनवाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बागडे, पत्रकार शर्मा, समाजकल्याण अधिकारी रामटेके, खंड विकास अधिकारी खांडे, सरपंच रेखा फुंडे, माजी पं.स. सभापती तुकाराम बोहरे, सातगावच्या सरपंच संगिता कुसराम, डॉ. सुषमा देशमुख, जेठभावडा ग्रामपंचायतचे सरपंच रहांगडाले, उपसरपंच भूमेश्वर मेंढे उपस्थित होते. गावात तपासणी चमू दाखल होताच फटाके फोडून तसेच पुष्पांचा वर्षाव करुन स्वागत करण्यात आले. जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी, स्वच्छतेचे दूत संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. उपसरपंच भूमेश्वर मेंढे यांनी प्रास्ताविकातून गांधीटोला गाव विकासाच्या दिशेने करीत असलेल्या वाटचालींचा आढावा मांडला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पुलकुंडवार यांनी, स्वच्छतेचे महत्व पटवून देताना उघड्यावर शौचास जाणे ही निंदनीय बाब आहे. यामुळे अनेक आजार जडतात. केवळ चमू येणार आहे म्हणून स्वच्छता न ठेवता गावकऱ्यांनी वर्षभर स्वच्छता राखावी. ही स्वच्छता आपल्यासाठीच आहे. आजारी पणाचे प्रमाण कमी होते. गोंदिया जिल्ह्याने शौचालय बांधकामाचे लक्ष्य पूर्ण केले असून फक्त घोषणा व्हायची आहे. पालकांनी आपल्या मुला-मुलींच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष द्यावे, असे मत मांडले. यावेळी तपासणी चमूने संपूर्ण गाव फिरुन स्वच्छतेची पाहणी केली. संचालन ग्रामसेवक एस.एस. रहांगडाले यांनी केले. आभार शिक्षक मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य, बचत गटाच्या महिला तसेच गावकऱ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)