शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
3
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
4
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
5
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
6
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
7
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
8
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
9
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
10
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल
11
Ashadhi Ekadashi Vrat 2025: आषाढी एकादशीला 'अशी' करा विधिवत पूजा; जाणून घ्या नियम आणि शुभ मुहूर्त!
12
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
13
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
14
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
15
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
16
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
17
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
18
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
19
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
20
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर

‘गावची शाळा’ प्रकल्प थंडावला

By admin | Updated: August 31, 2015 01:31 IST

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी तसेच शाळांच्या भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी...

बैठका झाल्याच नाही : शाळांमध्ये स्पर्धेचा अभावगोंदिया : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी तसेच शाळांच्या भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून ‘गावाची शाळा आमची शाळा’ प्रकल्प गेल्या चार वर्षांपासून राबविला जात आहे, यातून अनेक शाळांचा दर्जाही सुधारला, परंतु या मोहीमेकडे आता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे व शाळांचेही दुर्लक्ष झाले आहे.शाळांमध्ये वर्गखोल्या, ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालय, बसण्यासाठी पुरेशी जागा, शाळेचे मैदान, व इतर सर्व सोयी सुविधा असण्यासाठी तसेच शाळेला लोेकप्रतिनिधींच्या भेटी, गावकऱ्यांच्या भेटी, शिक्षणाचा दर्जा अश्या सर्व ७५ मुद्यांच्या आधारे मुल्यांकण करण्यात आले. २०० गुणांच्या आधारे मुल्यांकण करण्यात येते. या मुल्यांकणात सर्वाधिक गुण घेणाऱ्या शाळांना प्रभागांतर्गत प्रथम, द्वितीय, तृतीय त्यानंतर तालुकास्तरीय प्रथम, द्वितीय व तृतीय तर जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार देण्यात येते. सुरूवातीला फक्त एकच गटात पुरस्कार दिला जात होता. मात्र त्यात तक्रारी आल्याने वर्ग १ ते ४ असणाऱ्या शाळांचा एक गट तर वर्ग १ ते ७ चा असणारा दुसरा गट तयार करण्यात आला. मागील वर्षीपासून या दोन्ही गटांना पुरस्कार देण्यात येत आहे. दरवर्षी या मोहीमेची अमंलबजावणी सुरूवातीपासून होत होती. परंतु यावर्षी या मोहीमेबाबत विद्यार्थी, शिक्षक मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी व जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग उदासिन आहे. शाळा सुरू झाल्यापासून दोन महिन्याचा कालावधी लोटला तरी त्या मोहीमेसंदर्भात शिक्षण विभागाने एकही बैठक घेतली नाही. दरवर्षी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीत सभा होत होत्या. परंतु यावर्षी एकही सभा न घेतल्यामुळे गावची शाळा आमची शाळा उपक्रम सुरू आहे किंवा नाही असा संभ्रम मुख्याध्यापक व शिक्षकांमध्ये निर्माण झाला आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही मोहीम सुरू राहणार आहे. परंतु या मोहीमेच्या अमंलबजावणीसाठी शिक्षण विभाग कामाला लागला नसून उदासिन आहे. (तालुका प्रतिनिधी)२० लाख रूपयांची तरतूदगावची शाळा आमची शाळा या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी सन २०१५-१६ या वर्षासाठी २६ आॅगस्ट रोजी गटशिक्षणाधिकाऱ्यांची सभा घेण्यात आली. या सभेत जिल्हा निधीतून २० लाख रूपये या मोहीमेसाठी देण्यात आल्याचे सांगण्यात आल्याचे सांगण्यात आले. शाळा उदासीनसुरूवातीला या मोहीमेत रस घेऊन पुरस्कार घेण्यासाठी शाळांमध्ये चुरस दिसत करीत होती. परंतु आता गावची शाळा आमची शाळा या मोहीमेसंदर्भात उदासीनता पसरली आहे. पुरस्कार घेणाऱ्या शाळाही उदासीन आहेत.