शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

‘गावची शाळा’ प्रकल्प थंडावला

By admin | Updated: August 31, 2015 01:31 IST

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी तसेच शाळांच्या भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी...

बैठका झाल्याच नाही : शाळांमध्ये स्पर्धेचा अभावगोंदिया : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी तसेच शाळांच्या भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून ‘गावाची शाळा आमची शाळा’ प्रकल्प गेल्या चार वर्षांपासून राबविला जात आहे, यातून अनेक शाळांचा दर्जाही सुधारला, परंतु या मोहीमेकडे आता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे व शाळांचेही दुर्लक्ष झाले आहे.शाळांमध्ये वर्गखोल्या, ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालय, बसण्यासाठी पुरेशी जागा, शाळेचे मैदान, व इतर सर्व सोयी सुविधा असण्यासाठी तसेच शाळेला लोेकप्रतिनिधींच्या भेटी, गावकऱ्यांच्या भेटी, शिक्षणाचा दर्जा अश्या सर्व ७५ मुद्यांच्या आधारे मुल्यांकण करण्यात आले. २०० गुणांच्या आधारे मुल्यांकण करण्यात येते. या मुल्यांकणात सर्वाधिक गुण घेणाऱ्या शाळांना प्रभागांतर्गत प्रथम, द्वितीय, तृतीय त्यानंतर तालुकास्तरीय प्रथम, द्वितीय व तृतीय तर जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार देण्यात येते. सुरूवातीला फक्त एकच गटात पुरस्कार दिला जात होता. मात्र त्यात तक्रारी आल्याने वर्ग १ ते ४ असणाऱ्या शाळांचा एक गट तर वर्ग १ ते ७ चा असणारा दुसरा गट तयार करण्यात आला. मागील वर्षीपासून या दोन्ही गटांना पुरस्कार देण्यात येत आहे. दरवर्षी या मोहीमेची अमंलबजावणी सुरूवातीपासून होत होती. परंतु यावर्षी या मोहीमेबाबत विद्यार्थी, शिक्षक मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी व जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग उदासिन आहे. शाळा सुरू झाल्यापासून दोन महिन्याचा कालावधी लोटला तरी त्या मोहीमेसंदर्भात शिक्षण विभागाने एकही बैठक घेतली नाही. दरवर्षी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीत सभा होत होत्या. परंतु यावर्षी एकही सभा न घेतल्यामुळे गावची शाळा आमची शाळा उपक्रम सुरू आहे किंवा नाही असा संभ्रम मुख्याध्यापक व शिक्षकांमध्ये निर्माण झाला आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही मोहीम सुरू राहणार आहे. परंतु या मोहीमेच्या अमंलबजावणीसाठी शिक्षण विभाग कामाला लागला नसून उदासिन आहे. (तालुका प्रतिनिधी)२० लाख रूपयांची तरतूदगावची शाळा आमची शाळा या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी सन २०१५-१६ या वर्षासाठी २६ आॅगस्ट रोजी गटशिक्षणाधिकाऱ्यांची सभा घेण्यात आली. या सभेत जिल्हा निधीतून २० लाख रूपये या मोहीमेसाठी देण्यात आल्याचे सांगण्यात आल्याचे सांगण्यात आले. शाळा उदासीनसुरूवातीला या मोहीमेत रस घेऊन पुरस्कार घेण्यासाठी शाळांमध्ये चुरस दिसत करीत होती. परंतु आता गावची शाळा आमची शाळा या मोहीमेसंदर्भात उदासीनता पसरली आहे. पुरस्कार घेणाऱ्या शाळाही उदासीन आहेत.