शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
2
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
3
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
4
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
5
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
6
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
7
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
8
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
9
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
10
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
11
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
12
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
13
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
14
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
15
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
16
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
17
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
18
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
19
Sports Events Schedule 2026 : क्रीडा प्रेमींसाठी नवे वर्ष आहे एकदम खास! कारण...
20
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
Daily Top 2Weekly Top 5

पथदिवे बंद असल्याने गाव रात्रीला अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:33 IST

नवेगावबांध : गावातील पथदिव्यांचे बिल न भरल्यामुळे वीज वितरण कंपनीने गावातील पथदिव्यांची जोडणी ७ जुलै रोजी कापली आहे. परिणामी ...

नवेगावबांध : गावातील पथदिव्यांचे बिल न भरल्यामुळे वीज वितरण कंपनीने गावातील पथदिव्यांची जोडणी ७ जुलै रोजी कापली आहे. परिणामी आता रात्रीला गाव अंधारात राहत असून गावकऱ्यांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात आता विषारी कीटकांचा धोका वाढला असून ग्रामपंचायतने व शासनाने त्वरित तोडगा काढून पथदिवे सुरू करावे, अशी मागणी गावकरी करीत आहेत.

पूर्वी पथदिव्यांचा वीजबिल भरणा जिल्हा परिषद करीत होती. राज्य शासनाने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींकडून आकारण्यात येणाऱ्या विविध कर व विकास निधीतून वीज वितरण कंपनीला वीजबिलाची रक्कम वळती करण्याबाबतचा निर्णय अलीकडेच घेतला होता. १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतीमधील पथदिव्यांचे थकीत आणि बंदीत अनुदानातून पाणीपुरवठ्याचे वीजबिल ग्रामपंचायतने भरावे, असे शासनाने आदेशित केले होते. परंतु असे केल्यास ग्रामपंचायत अंतर्गत इतर विकासकामांना निधी उरणार नसून गावातील विकासकामांवर निधी खर्च करता येणार नाही, असे जिल्हा सरपंच सेवा संघाचे म्हणणे आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे मोलमजुरी नाही, हाताला काम नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिक, रोजंदारी मजूर व छोटे-मोठे व्यापारी या सर्वांचेच आर्थिक हाल झाले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतकडे येणारे विविध प्रकारचे कर नागरिकांनी भरले नसून ग्रामपंचायतची आर्थिक स्थिती खराब आहे. त्यामुळे पथदिव्यांचे वीजबिल भरण्यात आले नाही. त्यात गेल्या काही दिवसांपासून गावात भुरट्या चोऱ्यादेखील झाल्या आहेत व गावात अंधार असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याकडे ग्रामपंचायतने लक्ष देऊन पथदिवे त्वरित सुरू करावे, अशी मागणी गावकरी करीत आहेत.

--------------------------------

वीजबिल शासनाने भरावे

नवेगावबांध ग्रामपंचायतकडे १२ बिलांचे ४१ लाख १२ हजार ९५४ रुपये थकीत आहेत. यासाठी वीज वितरण कंपनीकडून १७ जून रोजी ग्रामपंचायतला बिल भरण्यासाठी नोटीस देऊन १५ दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र बिल न भरल्याने वीज वितरण कंपनीने पथदिव्यांची जोडणी कापली. गावातील वीजबिलांचा भरणा झाल्याने वीज जोडणी कापण्याचे प्रकार राज्यातच घडत आहेत. त्यामुळे आता राज्य शासनाने वीजबिल भरावे व यासाठी आमदारांनी राज्य सरकारकडे हा प्रश्न लावून धरणे गरजेचे आहे, अशी मागणी सरपंच अनिरुद्ध शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार तसेच समस्त ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे.