शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आमगावची वैष्णवी शेेंडे जिल्ह्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2017 01:04 IST

उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने यावर्षी घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील ९०.४० टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळविले.

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने यावर्षी घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील ९०.४० टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळविले. आमगाव येथील आदर्श कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी वैष्णवी अशोक शेंडे हिने जिल्ह्यात सर्वाधिक ९५.५४ टक्के गुण घेऊन प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. तसेच अर्जुनी-मोरगाव येथील सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी भ्रमर संजय पुस्तोडे याने ९४.३० टक्के गुण घेऊन द्वितीय तर तिसरा क्रमांक आमगावच्या आदर्श कनिष्ठ विद्यालयातील कस्तूरी विनायक अंजनकर हिने ९३.६९ टक्के गुण घेऊन पटकाविला आहे. यंदा बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील २२ हजार ४३ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. मात्र प्रत्यक्षात २२ हजार ३१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १९ हजार ९१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालात नागपूर विभागीय मंडळात गोंदिया जिल्हा यावर्षी दुसऱ्या स्थानावर आहे. बारावीच्या एकूण विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक १० हजार ३८६ विद्यार्थी कला शाखेचे होते. त्यापैकी ८८०३ विद्यार्थी (८४.७६ टक्के) उत्तीर्ण झालेत. विज्ञान शाखेतून १० हजार २४८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ९९१९ (९६.७९ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. तसेच वाणिज्य शाखेतून ९६४ पैकी ८५८ (८९ टक्के) तर व्होकेशनल शाखेतून परीक्षा देणाऱ्या ४३३ पैकी ३३७ (७७.८३) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षीही मुलींनी बाजी मारत मुलांपेक्षा आम्ही सरस आहोत, हे सिद्ध केले. परीक्षा देणाऱ्या १० हजार ८७७ मुलांपैकी ९६३८ मुले उत्तीर्ण झाले आहेत. तर ११ हजार १५४ मुलींपैकी १० हजार २८९ मुलींनी यश मिळविले आहे. यंदा केवळ १२ शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून त्यात ग्रामीण भागातील शाळा जास्त आहेत. विशेष म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्हा चार टक्क्याने निकालात पुढे आला आहे. तर यामध्ये अर्जुनी-मोरगाव तालुक्यातून सर्वाधीक ९३.८३ टक्के निकाल लागला असून द्वितीय क्रमांकावर आमगाव तालुका ९३.५३ टक्यावर आहे. निकालाची टक्केवारी वाढल्यामुळे मागील वर्षी नागपूर विभागात तृतीय क्रमांकावर असलेला गोंदिया जिल्हा यंदा दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. वैष्णवी शेंडेला व्हायचयं डॉक्टर आमगाव : बारावी विज्ञान शाखेतून आदर्श कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी वैष्णवी अशोक शेंडे हिने डॉक्टर होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. वर्ग एक ते चार पर्यंतचे तिचे शिक्षण के.के.इंग्रजी शाळेत घेतले असून ती इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतचे शिक्षण आदर्श विद्यालयातच घेत आहे. कठीण परिश्रम व आत्मविश्वासाने प्रत्येक गोष्ट मिळविता येते असे वैष्णवीने लोकमतशी बोलताना सांगीतले. भवभूती शिक्षण संस्थेच्या रूपात स्वर्गीय लक्ष्मणराव मानकर गुरूजींनी लावलेले रोपटे आज विशाल वटवृक्ष झाले आहे. माजी आमदार केशवराव मानकर यांच्या नेतृत्वात तसेच सुरेशबाबू असाटी यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या या आदर्श विद्यालयाने डॉक्टर, इंजिनीयर, नेते, पत्रकार व सर्वोच्च पदावर जाणारी सर्वच माणसे घडविली आहे. आमगावच्या या विद्यालयातील विद्यार्थी अनेकदा जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान मिळवितात. उत्कृष्ट शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे येथील निकाल चांगला असतो. निकाल लागताच प्राचार्य दिनेश राऊत, उप प्राचार्य अश्वीनी जोशी, पर्यवेक्षक सि.बी.पारधी व शोभा येडे यांनी वैष्णवीच्या घरी जाऊन तिचा सत्कार केला.