शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
3
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
4
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
5
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
6
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
7
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
8
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
9
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
10
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
11
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
13
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
14
प्रेमासाठी काय पण...! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
15
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
16
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
17
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
18
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
19
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
20
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!

आमगावची वैष्णवी शेेंडे जिल्ह्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2017 01:04 IST

उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने यावर्षी घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील ९०.४० टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळविले.

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने यावर्षी घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील ९०.४० टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळविले. आमगाव येथील आदर्श कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी वैष्णवी अशोक शेंडे हिने जिल्ह्यात सर्वाधिक ९५.५४ टक्के गुण घेऊन प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. तसेच अर्जुनी-मोरगाव येथील सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी भ्रमर संजय पुस्तोडे याने ९४.३० टक्के गुण घेऊन द्वितीय तर तिसरा क्रमांक आमगावच्या आदर्श कनिष्ठ विद्यालयातील कस्तूरी विनायक अंजनकर हिने ९३.६९ टक्के गुण घेऊन पटकाविला आहे. यंदा बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील २२ हजार ४३ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. मात्र प्रत्यक्षात २२ हजार ३१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १९ हजार ९१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालात नागपूर विभागीय मंडळात गोंदिया जिल्हा यावर्षी दुसऱ्या स्थानावर आहे. बारावीच्या एकूण विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक १० हजार ३८६ विद्यार्थी कला शाखेचे होते. त्यापैकी ८८०३ विद्यार्थी (८४.७६ टक्के) उत्तीर्ण झालेत. विज्ञान शाखेतून १० हजार २४८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ९९१९ (९६.७९ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. तसेच वाणिज्य शाखेतून ९६४ पैकी ८५८ (८९ टक्के) तर व्होकेशनल शाखेतून परीक्षा देणाऱ्या ४३३ पैकी ३३७ (७७.८३) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षीही मुलींनी बाजी मारत मुलांपेक्षा आम्ही सरस आहोत, हे सिद्ध केले. परीक्षा देणाऱ्या १० हजार ८७७ मुलांपैकी ९६३८ मुले उत्तीर्ण झाले आहेत. तर ११ हजार १५४ मुलींपैकी १० हजार २८९ मुलींनी यश मिळविले आहे. यंदा केवळ १२ शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून त्यात ग्रामीण भागातील शाळा जास्त आहेत. विशेष म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्हा चार टक्क्याने निकालात पुढे आला आहे. तर यामध्ये अर्जुनी-मोरगाव तालुक्यातून सर्वाधीक ९३.८३ टक्के निकाल लागला असून द्वितीय क्रमांकावर आमगाव तालुका ९३.५३ टक्यावर आहे. निकालाची टक्केवारी वाढल्यामुळे मागील वर्षी नागपूर विभागात तृतीय क्रमांकावर असलेला गोंदिया जिल्हा यंदा दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. वैष्णवी शेंडेला व्हायचयं डॉक्टर आमगाव : बारावी विज्ञान शाखेतून आदर्श कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी वैष्णवी अशोक शेंडे हिने डॉक्टर होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. वर्ग एक ते चार पर्यंतचे तिचे शिक्षण के.के.इंग्रजी शाळेत घेतले असून ती इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतचे शिक्षण आदर्श विद्यालयातच घेत आहे. कठीण परिश्रम व आत्मविश्वासाने प्रत्येक गोष्ट मिळविता येते असे वैष्णवीने लोकमतशी बोलताना सांगीतले. भवभूती शिक्षण संस्थेच्या रूपात स्वर्गीय लक्ष्मणराव मानकर गुरूजींनी लावलेले रोपटे आज विशाल वटवृक्ष झाले आहे. माजी आमदार केशवराव मानकर यांच्या नेतृत्वात तसेच सुरेशबाबू असाटी यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या या आदर्श विद्यालयाने डॉक्टर, इंजिनीयर, नेते, पत्रकार व सर्वोच्च पदावर जाणारी सर्वच माणसे घडविली आहे. आमगावच्या या विद्यालयातील विद्यार्थी अनेकदा जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान मिळवितात. उत्कृष्ट शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे येथील निकाल चांगला असतो. निकाल लागताच प्राचार्य दिनेश राऊत, उप प्राचार्य अश्वीनी जोशी, पर्यवेक्षक सि.बी.पारधी व शोभा येडे यांनी वैष्णवीच्या घरी जाऊन तिचा सत्कार केला.