शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

लसच उपाय, जिल्ह्यात लसीकरणानंतर एकही मृत्यू नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:31 IST

गोंदिया : कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी लसीकरण हाच त्यावरील सर्वात प्रभावी उपाय आहे. त्यामुळे शासनानेदेखील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणाची ...

गोंदिया : कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी लसीकरण हाच त्यावरील सर्वात प्रभावी उपाय आहे. त्यामुळे शासनानेदेखील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणाची गती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. गोंदिया जिल्ह्याची लोकसंख्या १३ लाख ५० हजार असून लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील एकूण १ लाख २५ हजार नागरिकांना पहिला डोस देण्यात आला. तर, १५२३४ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १ लाख ४० हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरण केल्यानंतर एकही जण दगावल्याची नोंद जिल्ह्यात झालेली नाही. मात्र, लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्यानंतर ३४५ जण कोरोनाबाधित झाले आहे. यापैकी बरेच जण बरेदेखील झाले आहे. लसीकरणाच्या तुलनेत लसीचे दाेन्ही डोस घेतल्यानंतर पाॅझिटिव्ह येणाऱ्यांची संख्या ५ ते ६ टक्के आहे. पण, लसीकरणानंतर कोरोना प्रतिबंधात्मक उपायांचे पालन केल्याने अनेकांना कोरोनाला दूर ठेवण्यापासून मदत झाली आहे. त्यामुळे कोरोनावर लस हाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे लसीकरण झाल्यानंतरसुद्धा सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे.

.........

पहिल्या डोसनंतर केवळ पाच टक्के पाॅझिटिव्ह

- जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख २५ हजार जणांना कोरोनाचा पहिला डोस देण्यात आला. तर, १५ हजार नागरिकांना कोरोनाचा दुसरा डोस देण्यात आला आहे. पहिला डोस घेतल्यानंतर २४५ जण पॉझिटिव्ह आले, तर दोन्ही डोस घेतल्यानंतर १०० जण पॉझिटिव्ह आल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे.

- कोरोनाचा संसर्ग वाढत असून यापासून सुरक्षित राहण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे. लसीकरणानंतर कोरोनाबाधित येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तर, लस घेतलेल्या अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाला नाही.

- कोरोना लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्यानंतरसुद्धा मास्क, सॅनिटायझर यांचा नियमित वापर आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करणे गरजेचे आहे.

- लसीकरणासंदर्भात कुठलाही संभ्रम न बाळगता पुढे येत लसीकरण करून घ्यावे.

.....................

लस महत्त्वाची, मृत्यूचा धोका होतो कमी

जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४० हजार नागरिकांना काेरोना लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरण केल्यानंतर एकाही नागरिकाचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे नाही. त्यामुळे लसीकरणानंतर निश्चितच मृत्यूचा धोका कमी होताे. त्यामुळे सर्वांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा.

..........

दोन्ही डोस घेतल्यानंतर पॉझिटिव्ह येणाऱ्यांचे प्रमाण नगण्य

जिल्ह्यात १ लाख २५ हजार नागरिकांनी कोरोनाचा पहिला, तर १५ हजार नागरिकांनी कोरोनाचा पहिला आणि दुसरा डोस घेतला आहे. दोन्ही डोस घेतल्यानंतर केवळ १०० जण पॉझिटिव्ह आल्याची नोंद आहे. मात्र, हे प्रमाण नगण्य असून लसीकरण हे पूर्णपणे सुरक्षित आहे.

.......

कोट :

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे. लसीकरणानंतर कुणी दगावल्याची नोंद जिल्ह्यात झालेली नाही. लस पूर्णपणे सुरक्षित असून लसीकरणासाठी नागरिकांनी पुढे येण्याची गरज आहे.

- डॉ. संजय पांचाळ, लसीकरण मोहीम अधिकारी

....

एकूण रुग्ण :

एकूण कोरोनामुक्त :

एकूण कोरोनाबळी

...........

आतापर्यंत किती जणांना लस दिली : १ लाख ४० हजार

केवळ पहिला डोस किती जणांनी घेतला : १ लाख २५ हजार

दोन्ही डोस किती जणांनी घेतले : १५६४६