शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

लसच उपाय, जिल्ह्यात लसीकरणानंतर एकही मृत्यू नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:31 IST

गोंदिया : कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी लसीकरण हाच त्यावरील सर्वात प्रभावी उपाय आहे. त्यामुळे शासनानेदेखील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणाची ...

गोंदिया : कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी लसीकरण हाच त्यावरील सर्वात प्रभावी उपाय आहे. त्यामुळे शासनानेदेखील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणाची गती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. गोंदिया जिल्ह्याची लोकसंख्या १३ लाख ५० हजार असून लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील एकूण १ लाख २५ हजार नागरिकांना पहिला डोस देण्यात आला. तर, १५२३४ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १ लाख ४० हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरण केल्यानंतर एकही जण दगावल्याची नोंद जिल्ह्यात झालेली नाही. मात्र, लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्यानंतर ३४५ जण कोरोनाबाधित झाले आहे. यापैकी बरेच जण बरेदेखील झाले आहे. लसीकरणाच्या तुलनेत लसीचे दाेन्ही डोस घेतल्यानंतर पाॅझिटिव्ह येणाऱ्यांची संख्या ५ ते ६ टक्के आहे. पण, लसीकरणानंतर कोरोना प्रतिबंधात्मक उपायांचे पालन केल्याने अनेकांना कोरोनाला दूर ठेवण्यापासून मदत झाली आहे. त्यामुळे कोरोनावर लस हाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे लसीकरण झाल्यानंतरसुद्धा सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे.

.........

पहिल्या डोसनंतर केवळ पाच टक्के पाॅझिटिव्ह

- जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख २५ हजार जणांना कोरोनाचा पहिला डोस देण्यात आला. तर, १५ हजार नागरिकांना कोरोनाचा दुसरा डोस देण्यात आला आहे. पहिला डोस घेतल्यानंतर २४५ जण पॉझिटिव्ह आले, तर दोन्ही डोस घेतल्यानंतर १०० जण पॉझिटिव्ह आल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे.

- कोरोनाचा संसर्ग वाढत असून यापासून सुरक्षित राहण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे. लसीकरणानंतर कोरोनाबाधित येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तर, लस घेतलेल्या अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाला नाही.

- कोरोना लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्यानंतरसुद्धा मास्क, सॅनिटायझर यांचा नियमित वापर आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करणे गरजेचे आहे.

- लसीकरणासंदर्भात कुठलाही संभ्रम न बाळगता पुढे येत लसीकरण करून घ्यावे.

.....................

लस महत्त्वाची, मृत्यूचा धोका होतो कमी

जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४० हजार नागरिकांना काेरोना लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरण केल्यानंतर एकाही नागरिकाचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे नाही. त्यामुळे लसीकरणानंतर निश्चितच मृत्यूचा धोका कमी होताे. त्यामुळे सर्वांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा.

..........

दोन्ही डोस घेतल्यानंतर पॉझिटिव्ह येणाऱ्यांचे प्रमाण नगण्य

जिल्ह्यात १ लाख २५ हजार नागरिकांनी कोरोनाचा पहिला, तर १५ हजार नागरिकांनी कोरोनाचा पहिला आणि दुसरा डोस घेतला आहे. दोन्ही डोस घेतल्यानंतर केवळ १०० जण पॉझिटिव्ह आल्याची नोंद आहे. मात्र, हे प्रमाण नगण्य असून लसीकरण हे पूर्णपणे सुरक्षित आहे.

.......

कोट :

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे. लसीकरणानंतर कुणी दगावल्याची नोंद जिल्ह्यात झालेली नाही. लस पूर्णपणे सुरक्षित असून लसीकरणासाठी नागरिकांनी पुढे येण्याची गरज आहे.

- डॉ. संजय पांचाळ, लसीकरण मोहीम अधिकारी

....

एकूण रुग्ण :

एकूण कोरोनामुक्त :

एकूण कोरोनाबळी

...........

आतापर्यंत किती जणांना लस दिली : १ लाख ४० हजार

केवळ पहिला डोस किती जणांनी घेतला : १ लाख २५ हजार

दोन्ही डोस किती जणांनी घेतले : १५६४६